शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

लालकृष्ण अडवाणी यांचे पाळधी येथे स्वागत नेमके कधी केले ? - गुलाबराव पाटील यांना उदय भालेराव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:37 IST

कोणत्या आठवणींना उजाळा

जळगाव : ‘राम मंदिर शिलान्यासाच्या वेळी पाळधी येथे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मी स्वागत केले होते’, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामध्ये अडवाणी हे पाळधीला कधी आले व त्यांचे स्वागत केव्हा केले असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव यांनी उपस्थित केला आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर ४ आॅगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत यासाठी आम्ही तिघे भाऊ तुरुंगात गेलो होतो, असे सांगत राम मंदिरासाठी आमच्या वडिलांनीही त्याग केला आहे. आमच्यावर त्यावेळी ३०२ चा गुन्हा दाखल झाला होता, असे सांगितले होते. तसेच भाजपच्या काळात राम मंदिर होतय असे नाही, त्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी झालेले काही आरोप आपल्यावर घेतले. त्या साहेबांचे आम्ही मावळे आहोत. भूमिपूजनाच्या या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी, कल्याणसिंग, मुरली मनोहर जोशी यांना भाजपने निमंत्रण दिले नाही. त्यांनाही हे लोक विसरले मग रामाला काय लक्षात ठेवतील असा टोलाही पाटील यांनी लगावला होता. या दरम्यान त्यांनी राम मंदिर शिलान्यास वेळी पाळधी येथे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे स्वागत करणारा मी एकमेव होतो, असाही दावा केला होता. पाटील यांच्या या वक्तव्याचा उदय भालेराव यांनी समाचार घेत पालकमंत्र्यांचे वक्तव्य वाचून मस्त करमणूक झाली, असे नमूद केले. तसेच अडवाणी हे जिल्ह्यात कधी व कोठे-कोठे येऊन गेले याचे उदाहरणे देत लालकृष्ण अडवाणी यांचे पाळधी येथे स्वागत नेमके कधी केले ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच संपूर्ण रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात अडवाणी जळगाव जिल्ह्यात आलेलेच नाहीत, मग गुलाबराव पाटील यांनी आडवाणींचे स्वागत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही भालेराव यांनी म्हटले आहे. या सोबत खास गुलाबराव पाटील यांच्या माहितीसाठी, अडवाणी आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कोणकोणत्या वर्षी व जिल्ह्यात नेमके कोणत्या तालुक्यात आलेले आहेत याचा तपशीलही दिला. -अडवाणी जिल्ह्यात आलेले वर्ष व स्थळ- १९७४ मध्ये जनसंघाचे अध्यक्ष असताना जळगावात- १९९० मध्ये एकनाथराव खडसे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगर येथे- १९९१ मध्ये जून महिन्यात डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या प्रचारार्थ जळगावात- १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामनेर, वरणगाव, सावदा आणि भुसावळ येथे.- १९९६ मध्ये स्वर्णजयंती यात्रेच्या निमित्ताने चाळीसगावला- २००४ मध्ये धरणगाव येथे रेल्वे विद्युतीकरण उद््घाटन समारंभासाठी ( हेलिकॉप्टरने )वरील प्रमाणे अडवाणी हे जिल्ह्यात आले असताना मग पाळधी येथे गुलाबराव पाटील यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे स्वागत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही भालेराव यांचे म्हणणे आहे.
टॅग्स :Jalgaonजळगाव