शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

नावात काय नाही? सर्व काही आहे की !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 16:57 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांचा लेख ‘नावात काय नाही?’

मराठवाडय़ात माणसांना मामा तर त्याच माणसाच्या बायकोला मावशी म्हणतात, हे ऐकून कोणालाही सहज ‘मामा’ बनवता येतं. हे वाचून मनात विचार आला की, नात्यात काय असतं? एका कवीचं लग्न झालं. नववधूला खूश करण्यासाठी तो म्हणाला, ‘प्रिये, तुच माझी कविता, तुच माझी प्रतिभा, तुच माझी भावना न तुच माझी प्रेरणा.’ हे ऐकून नववधूनेही लाजत लाजत उत्तर दिले, ‘तुच माझा सुरेश, तुच माझा रमेश, तुच माझा विकास न तुच माझा प्रकाश..’ तिची ही सत्यवाणी ऐकून कवीची प्रतिभा उडत गेली हा भाग वेगळा. पण मग मनात विचार आला, नावात काय नाही.? घरातील सर्व मुली-मुलांची नावं एकाच अद्याक्षरावरूनही ठेवली जातात. माङया एका मित्राचे नाव ‘स’वरून आहे म्हणून त्याच्या तीनही मुलांची नावे त्याने ‘स’वरूनच ठेवलीत. पहिल्याचे नाव ‘संग्राम,’ दुस:याचे ‘समाधान’ अन् तिस:याचे ‘संयम’. आयुष्यभर संग्राम करून त्याला समाधान मिळाले तरीही तिस:यांदा त्याने ‘संयम’ सोडला. मी त्याला गमतीने म्हणालो, ‘मित्रा, तिसरी मुलगी असती तर तिचे नाव काय ठेवले असते?’ तो शांतपणे म्हणाला, ‘समाधी’. टीव्ही मालिकांमध्ये संत, पंत आणि तंत काळातील नावे ऐकायला मिळतात. केवळ कानाला ऐकायला गोड आहे किंवा नावीन्य आहे म्हणून ही नावे आपल्याकडे ठेवण्याचीही प्रथा आहे. मागे एका मालिकेतील ‘शुभम’ हे नाव इतके फेमस झाले की, गल्ली बोळातील मुलांची नावे शुभम ठेवण्याची चढाओढ सुरू झाली. कुठल्या नावात काय असेल हे काही सांगता येत नाही. कधी तर अतिशय किडमिडीत असणा:या मुलाचे नाव ‘विकास’ असते. नेमक्या लोडशेडिंगमध्ये जन्माला येणारा ‘प्रकाश’ असतो. जिने कधी कविता वाचली नाही ती ‘कविता’ असते. प्रेम कसं करावं हे जिला समजत नाही तिचं नाव नेमकं ‘प्रीती’ असतं. पूर्वीच्या काळी मुलं जगायची नाही म्हणून त्यांची नावे दगडय़ा-धोंडय़ा, शेनपडय़ा, चिंधा, धुडका अशी ठेवली जायची आणि आश्चर्य म्हणजे या नावाची मुलं जगायचीसुद्धा. पत्रिकेत नाव छापले नाही म्हणून लग्नात विघ्न आणणारे आणि नेत्यांच्या चेल्यांनी दांगडो केल्याचे आपण पाहातोच. हे सर्व नावावरून चालतं. नवरा-बायको चित्रपट पाहून घरी परतले. पाहतात ते काय घराचे कुलूप तुटलेले. घरातले सामान अस्ताव्यस्त झालेले होते. नवरा म्हणाला, ‘कावं, हाई कोनी करं आसीन.?’ बायको हात वर करून बोलली, ‘आवं माय हाई माले काय माहीत, तो वरना नारायणले माहीत.!’ तेवढय़ात वर चढून बसलेल्या चोराने खाली उडी मारली आणि म्हणाला, ‘मन्ह नाव तुमले कसं माहीत.?’ नावावरून चोर आयताच सापडला. आपल्या घराबाहेर मोठय़ा बल्बवर ऑईलपेन्टने बापाचे नाव लिहून ‘बापका नाम रोशन’ करणा:या मुलांची काही कमी नाही. म्हणून लोक नावं ठेवतात, नाव घेतात आणि नाव बदनामही करतात. कारण नावात काय नाही.?