शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

नावात काय नाही? सर्व काही आहे की !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 16:57 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांचा लेख ‘नावात काय नाही?’

मराठवाडय़ात माणसांना मामा तर त्याच माणसाच्या बायकोला मावशी म्हणतात, हे ऐकून कोणालाही सहज ‘मामा’ बनवता येतं. हे वाचून मनात विचार आला की, नात्यात काय असतं? एका कवीचं लग्न झालं. नववधूला खूश करण्यासाठी तो म्हणाला, ‘प्रिये, तुच माझी कविता, तुच माझी प्रतिभा, तुच माझी भावना न तुच माझी प्रेरणा.’ हे ऐकून नववधूनेही लाजत लाजत उत्तर दिले, ‘तुच माझा सुरेश, तुच माझा रमेश, तुच माझा विकास न तुच माझा प्रकाश..’ तिची ही सत्यवाणी ऐकून कवीची प्रतिभा उडत गेली हा भाग वेगळा. पण मग मनात विचार आला, नावात काय नाही.? घरातील सर्व मुली-मुलांची नावं एकाच अद्याक्षरावरूनही ठेवली जातात. माङया एका मित्राचे नाव ‘स’वरून आहे म्हणून त्याच्या तीनही मुलांची नावे त्याने ‘स’वरूनच ठेवलीत. पहिल्याचे नाव ‘संग्राम,’ दुस:याचे ‘समाधान’ अन् तिस:याचे ‘संयम’. आयुष्यभर संग्राम करून त्याला समाधान मिळाले तरीही तिस:यांदा त्याने ‘संयम’ सोडला. मी त्याला गमतीने म्हणालो, ‘मित्रा, तिसरी मुलगी असती तर तिचे नाव काय ठेवले असते?’ तो शांतपणे म्हणाला, ‘समाधी’. टीव्ही मालिकांमध्ये संत, पंत आणि तंत काळातील नावे ऐकायला मिळतात. केवळ कानाला ऐकायला गोड आहे किंवा नावीन्य आहे म्हणून ही नावे आपल्याकडे ठेवण्याचीही प्रथा आहे. मागे एका मालिकेतील ‘शुभम’ हे नाव इतके फेमस झाले की, गल्ली बोळातील मुलांची नावे शुभम ठेवण्याची चढाओढ सुरू झाली. कुठल्या नावात काय असेल हे काही सांगता येत नाही. कधी तर अतिशय किडमिडीत असणा:या मुलाचे नाव ‘विकास’ असते. नेमक्या लोडशेडिंगमध्ये जन्माला येणारा ‘प्रकाश’ असतो. जिने कधी कविता वाचली नाही ती ‘कविता’ असते. प्रेम कसं करावं हे जिला समजत नाही तिचं नाव नेमकं ‘प्रीती’ असतं. पूर्वीच्या काळी मुलं जगायची नाही म्हणून त्यांची नावे दगडय़ा-धोंडय़ा, शेनपडय़ा, चिंधा, धुडका अशी ठेवली जायची आणि आश्चर्य म्हणजे या नावाची मुलं जगायचीसुद्धा. पत्रिकेत नाव छापले नाही म्हणून लग्नात विघ्न आणणारे आणि नेत्यांच्या चेल्यांनी दांगडो केल्याचे आपण पाहातोच. हे सर्व नावावरून चालतं. नवरा-बायको चित्रपट पाहून घरी परतले. पाहतात ते काय घराचे कुलूप तुटलेले. घरातले सामान अस्ताव्यस्त झालेले होते. नवरा म्हणाला, ‘कावं, हाई कोनी करं आसीन.?’ बायको हात वर करून बोलली, ‘आवं माय हाई माले काय माहीत, तो वरना नारायणले माहीत.!’ तेवढय़ात वर चढून बसलेल्या चोराने खाली उडी मारली आणि म्हणाला, ‘मन्ह नाव तुमले कसं माहीत.?’ नावावरून चोर आयताच सापडला. आपल्या घराबाहेर मोठय़ा बल्बवर ऑईलपेन्टने बापाचे नाव लिहून ‘बापका नाम रोशन’ करणा:या मुलांची काही कमी नाही. म्हणून लोक नावं ठेवतात, नाव घेतात आणि नाव बदनामही करतात. कारण नावात काय नाही.?