शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कशाला हवे 'ते' अंतर्गत गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:18 IST

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़

गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़ फक्त गणित, विज्ञानासाठी ते दिले जातात़ पण जेव्हा दहावीचा निकाल लागला आणि इतर परीक्षा मंडळापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागलेला दिसला़ तेव्हा खरी आरडाओरड सुरू झाली आणि गुणवत्ता हा विषय गृहीत धरला तरी अंतर्गत गुण बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासारखे आहे, असे मत मांडले गेले़ आता सहामाहिचे वा पुर्व परीक्षांचे पेपर हे ८० गुणांचे काढायचे की शंभर गुणांचे? हेही विचारले गेले़ जुलै अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांना सुचविले गेले. अंतर्गत गुणासंबधी जी चर्चा होते तशी गुणवत्ता यादी हवी कशाला? यासंबंधीही चर्चा झाली होती़ गुणवत्ता यादीमागचे नेमके प्रयोजन कोणते ? व ती ज्या पद्धतीने तयार केली जाते त्यात अपेक्षित उद्देश साध्य होतो का? यावरही चर्चा होते ती गुणवत्ता यादी बाद ठरवली गेली़ आज नेमकी हीच, म्हणजे 'गुणवत्तेचा फुगवटा' 'फुकटाचे वीस गुण' हे विषय समोर येत अंतर्गत गुणांची 'सोय' बंद करण्यात आलीय, जी गोष्ट कुणावरती अन्याय करणारी वा स्पर्धेतून बाहेर काढणारी नाही, उरला प्रश्न प्रश्नपत्रिका ८० कि १०० गुणांची ? जर अंतर्गत गुणबंदच केलेय तर प्रश्नपत्रिका शंभर गुणांचीच सोडवावी लागेल़ भाषा, समाजशास्त्र या विषयांची अंतर्गत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डाच्या तुलनेत दहावीला कमी गुण मिळतील ही जी भिती निर्माण केली जाते त्यांनी दोन तीन वर्षातील निकाल व अकरावी प्रवेशासंबधीचा खोलवर अभ्यास करावा. - चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, केसीई सोसायटी.

टॅग्स :Jalgaonजळगाव