शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची परीक्षा रद्द आता पुढील प्रवेश प्रक्रिये काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST

- डमी - स्टार - ७७९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूने कहर माजविल्यानंतर दहावीनंतर आता बारावीची परीक्षा ...

- डमी

- स्टार - ७७९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूने कहर माजविल्यानंतर दहावीनंतर आता बारावीची परीक्षा सुध्दा रद्द झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पध्दतीने होणार? वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार, असा सवाल बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपत आला तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे शासराने परीक्षेसंदर्भात तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तेवढ्यात सीबीएसई बारावी परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला. अखेर राज्य शासनाने सुध्दा बैठक घेवून बारावीची परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मूल्यमापन कसे होणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर गेली तरी ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती आता रद्द झाली आहे. आता प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाईल, हा संभ्रम अजून आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय व्हावा.

- संदीप पवार, विद्यार्थी

---------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला तो योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकरात लवकर जाहीर करून पुढील प्रक्रियाचे नियोजन स्पष्ट करावे.

- निलीमा सैंदाणे, विद्यार्थिनी

======

ऑनलाइन परीक्षा घेत आली असती. पण, आता शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणा-या हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय होणार आहे. त्यामुळे योग्य पध्दतीने मूल्यमापन केले जावे.

- पंकज सोनार, पालक

---------

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावीची परीक्षा ही अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे ऑनलाईन का असेना परीक्षा घ्यायला हवी होती. पण, आता परीक्षा रद्द केली असल्यामुळे मूल्यमापन योग्य पध्दतीने करावे व पुढील प्रक्रिया कशी राबविणार हे सुध्दा स्पष्ट करावे.

- कमलेश पाटील, पालक

======

निकाल व पुढील प्रक्रिये संदर्भात अद्याप शासनाचे कुठलेही पत्र प्राप्त झालेले नाही. परीक्षा रद्दबाबत सुध्दा अधिकृत पत्र महाविद्यालयाला प्राप्त झालेले नाही. शासनाच्या सूचना आल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल.

- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय

--------

शासनाने बारावीची परीक्षा रद्द केली आहे. शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठस्तरावरून प्रवेश प्रक्रियाबाबत पुढील नियोजन केले जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाकडून ऑनलाइन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. अजूनही शासनाचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.

- एल.पी.देशमुख, प्राचार्य, नुतन मराठा महाविद्यालय

========

बारावीचे एकूण विद्यार्थी

- ४९ हजार ४०३

- विज्ञान

२० हजार १९४

- कला

२० हजार ४९१

- वाणिज्य

६ हजार २९५

- एमसीव्हीसी

२ हजार ४२३