शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

बारावीची परीक्षा रद्द आता पुढील प्रवेश प्रक्रिये काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST

- डमी - स्टार - ७७९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूने कहर माजविल्यानंतर दहावीनंतर आता बारावीची परीक्षा ...

- डमी

- स्टार - ७७९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूने कहर माजविल्यानंतर दहावीनंतर आता बारावीची परीक्षा सुध्दा रद्द झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पध्दतीने होणार? वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार, असा सवाल बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपत आला तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे शासराने परीक्षेसंदर्भात तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तेवढ्यात सीबीएसई बारावी परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला. अखेर राज्य शासनाने सुध्दा बैठक घेवून बारावीची परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मूल्यमापन कसे होणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर गेली तरी ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती आता रद्द झाली आहे. आता प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाईल, हा संभ्रम अजून आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय व्हावा.

- संदीप पवार, विद्यार्थी

---------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला तो योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकरात लवकर जाहीर करून पुढील प्रक्रियाचे नियोजन स्पष्ट करावे.

- निलीमा सैंदाणे, विद्यार्थिनी

======

ऑनलाइन परीक्षा घेत आली असती. पण, आता शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणा-या हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय होणार आहे. त्यामुळे योग्य पध्दतीने मूल्यमापन केले जावे.

- पंकज सोनार, पालक

---------

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावीची परीक्षा ही अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे ऑनलाईन का असेना परीक्षा घ्यायला हवी होती. पण, आता परीक्षा रद्द केली असल्यामुळे मूल्यमापन योग्य पध्दतीने करावे व पुढील प्रक्रिया कशी राबविणार हे सुध्दा स्पष्ट करावे.

- कमलेश पाटील, पालक

======

निकाल व पुढील प्रक्रिये संदर्भात अद्याप शासनाचे कुठलेही पत्र प्राप्त झालेले नाही. परीक्षा रद्दबाबत सुध्दा अधिकृत पत्र महाविद्यालयाला प्राप्त झालेले नाही. शासनाच्या सूचना आल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल.

- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय

--------

शासनाने बारावीची परीक्षा रद्द केली आहे. शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठस्तरावरून प्रवेश प्रक्रियाबाबत पुढील नियोजन केले जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाकडून ऑनलाइन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. अजूनही शासनाचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.

- एल.पी.देशमुख, प्राचार्य, नुतन मराठा महाविद्यालय

========

बारावीचे एकूण विद्यार्थी

- ४९ हजार ४०३

- विज्ञान

२० हजार १९४

- कला

२० हजार ४९१

- वाणिज्य

६ हजार २९५

- एमसीव्हीसी

२ हजार ४२३