शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST

नियमांचे उल्लंघन : दीड महिन्यानंतर मोबाईल दुकाने उघडल्याने ग्राहकांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ...

नियमांचे उल्लंघन : दीड महिन्यानंतर मोबाईल दुकाने उघडल्याने ग्राहकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून शासनाने लावलेले निर्बंध १ जून पासून काहीसे शिथील करण्यात आल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची सकाळपासून गर्दी होत आहे. त्यात, मुख्य म्हणजे मोबाईलच्या दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. बहुतांश दुकानांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही नियम पाळले जात नसल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आली.

१ जून पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी सवलत दिल्याने बाजार पेठेतील सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. शासनाच्या सूचनेनुसार व्यावसायिकांकडून नियमांचे पालन करण्यात येत असले तरी ग्राहक नियम धाब्यावर बसवून गर्दी करतांना दिसून येत आहे. विशेषतः मोबाईल दुकानांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. दीड महिन्या पासून दुकाने बंद असल्याने, कुणाला मोबाईलची बॉडी बदलायची आहे, कुणाला स्क्रीन बोर्ड बदलायचा आहे तर कुणाला नवा मोबाईल खरेदी करायचा आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारच्या ग्राहकांची मोबाईल दुकानांमध्ये गर्दी झालेली दिसून येत आहे.

इन्फो :

मोबाईलचे कारण काय :

१) स्क्रीन गार्ड खराब झाले.

२) मोबाईल बॉडी बदलायची आहे.

३) मोबाईलची स्क्रिन नवीन टाकायची आहे

४) मोबाईलची सिम प्लेट बदलायची आहे.

५) मोबाईल मध्ये नवीन बॅटरी टाकायची आहे.

६) मोबाईलची सर्व्हीसिंग करायची आहे, तर कुणाला फाॅरमेट करायचा आहे.

७) कुणाला नवीन मोबाईल खरेदी करायचा आहे.

अशा प्रकारच्या विविध ग्राहकांची मोबाईल दुकानांवर गर्दी दिसून येत आहे.

इन्फो :

दीड महिन्यापासून बाजार बंद

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला १५ एप्रिलला संचारबंदी लागू केली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने शासनाने पुन्हा १ मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. तब्बल ३१ मे पर्यत कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ पुर्णतः बंद होती. दरम्यान, यामुळे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

इन्फो :

दीड महिन्यापासून मोबाईल दुकानेही बंद

शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्ये इतर बाजारपेठांप्रमाणे शहरातील मोबाईल मार्केट ही बंद होते. शहरातील गोलाणी मार्केट मध्ये मोबाईलची १०० हुन अधिक दुकाने असून ही सर्व दुकाने बंद होती. तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे सर्व्हिस सेंटरही बंद असल्याने, मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. तर दुसरीकडे मोबाईल व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

इन्फो :

मोबाईल महत्वाचाच, पण आरोग्याचे काय?

१) माझ्या मोबाईलची स्क्रीन तुटल्यामुळे ती बदलावायला आलो होतो. स्क्रीन व्यवस्थित दिसत नसल्याने, मोबाईल दुरुस्त करणे गरजेचे आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी, मी मास्क व सॅनिटाइजरचा वापर करत आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही.

यश पाटे, ग्राहक

मोबाईल ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे. त्यात बिघाड झाला म्हणजे लगेच दुरुस्ती करावाच लागतो. माझ्या मोबाईललाही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. कोरोना असला तरी, किती दिवस कोरोनाची भीती बाळगणार आहे.

सुनील येवले, ग्राहक

इन्फो :

दीड महिन्या पासून मोबाईल दुकान बंद असल्याने, ग्राहकांची कामे अडून पडलेली होती. त्यामुळे ग्राहक मोबाईलच्या कामासाठी गर्दी करत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे मी पालन करत आहे. दुकानात गर्दी होऊ नये, म्हणून सोशल डिस्टनिंगचे पालन करून ग्राहकांना दुकानात सोडण्यात येत आहे.

उमेश कोतकर, मोबाईल व्यवसायिक

खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आम्ही मास्क वापरणे व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याबाबत वारंवार आवाहन करत असतो. यात काही ग्राहक ऐकतात तर काही ऐकत नाही. मात्र, शक्य तितकी आम्ही काळजी घेतच असतो.

सनी आहुजा, मोबाईल व्यावसायिक