शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST

नियमांचे उल्लंघन : दीड महिन्यानंतर मोबाईल दुकाने उघडल्याने ग्राहकांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ...

नियमांचे उल्लंघन : दीड महिन्यानंतर मोबाईल दुकाने उघडल्याने ग्राहकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून शासनाने लावलेले निर्बंध १ जून पासून काहीसे शिथील करण्यात आल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची सकाळपासून गर्दी होत आहे. त्यात, मुख्य म्हणजे मोबाईलच्या दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. बहुतांश दुकानांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही नियम पाळले जात नसल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आली.

१ जून पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी सवलत दिल्याने बाजार पेठेतील सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. शासनाच्या सूचनेनुसार व्यावसायिकांकडून नियमांचे पालन करण्यात येत असले तरी ग्राहक नियम धाब्यावर बसवून गर्दी करतांना दिसून येत आहे. विशेषतः मोबाईल दुकानांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. दीड महिन्या पासून दुकाने बंद असल्याने, कुणाला मोबाईलची बॉडी बदलायची आहे, कुणाला स्क्रीन बोर्ड बदलायचा आहे तर कुणाला नवा मोबाईल खरेदी करायचा आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारच्या ग्राहकांची मोबाईल दुकानांमध्ये गर्दी झालेली दिसून येत आहे.

इन्फो :

मोबाईलचे कारण काय :

१) स्क्रीन गार्ड खराब झाले.

२) मोबाईल बॉडी बदलायची आहे.

३) मोबाईलची स्क्रिन नवीन टाकायची आहे

४) मोबाईलची सिम प्लेट बदलायची आहे.

५) मोबाईल मध्ये नवीन बॅटरी टाकायची आहे.

६) मोबाईलची सर्व्हीसिंग करायची आहे, तर कुणाला फाॅरमेट करायचा आहे.

७) कुणाला नवीन मोबाईल खरेदी करायचा आहे.

अशा प्रकारच्या विविध ग्राहकांची मोबाईल दुकानांवर गर्दी दिसून येत आहे.

इन्फो :

दीड महिन्यापासून बाजार बंद

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला १५ एप्रिलला संचारबंदी लागू केली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने शासनाने पुन्हा १ मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. तब्बल ३१ मे पर्यत कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ पुर्णतः बंद होती. दरम्यान, यामुळे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

इन्फो :

दीड महिन्यापासून मोबाईल दुकानेही बंद

शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्ये इतर बाजारपेठांप्रमाणे शहरातील मोबाईल मार्केट ही बंद होते. शहरातील गोलाणी मार्केट मध्ये मोबाईलची १०० हुन अधिक दुकाने असून ही सर्व दुकाने बंद होती. तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे सर्व्हिस सेंटरही बंद असल्याने, मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. तर दुसरीकडे मोबाईल व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

इन्फो :

मोबाईल महत्वाचाच, पण आरोग्याचे काय?

१) माझ्या मोबाईलची स्क्रीन तुटल्यामुळे ती बदलावायला आलो होतो. स्क्रीन व्यवस्थित दिसत नसल्याने, मोबाईल दुरुस्त करणे गरजेचे आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी, मी मास्क व सॅनिटाइजरचा वापर करत आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही.

यश पाटे, ग्राहक

मोबाईल ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे. त्यात बिघाड झाला म्हणजे लगेच दुरुस्ती करावाच लागतो. माझ्या मोबाईललाही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. कोरोना असला तरी, किती दिवस कोरोनाची भीती बाळगणार आहे.

सुनील येवले, ग्राहक

इन्फो :

दीड महिन्या पासून मोबाईल दुकान बंद असल्याने, ग्राहकांची कामे अडून पडलेली होती. त्यामुळे ग्राहक मोबाईलच्या कामासाठी गर्दी करत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे मी पालन करत आहे. दुकानात गर्दी होऊ नये, म्हणून सोशल डिस्टनिंगचे पालन करून ग्राहकांना दुकानात सोडण्यात येत आहे.

उमेश कोतकर, मोबाईल व्यवसायिक

खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आम्ही मास्क वापरणे व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याबाबत वारंवार आवाहन करत असतो. यात काही ग्राहक ऐकतात तर काही ऐकत नाही. मात्र, शक्य तितकी आम्ही काळजी घेतच असतो.

सनी आहुजा, मोबाईल व्यावसायिक