शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हाधिकाऱ्यांची धडपड कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:56 IST

विश्लेषण

-सुशील देवकरजळगाव- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनमध्ये झालेल्या टंचाई आढावा बैठकीत बसण्याची परवानगी स्वत: पालकमंत्र्यांनी दिल्यानंतरही जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी पत्रकारांना या बैठकीतून उठून जायला भाग पाडले. त्यामुळे बैठकीतील चर्चा दडविणे, हाच जिल्हाधिकाºयांचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले. बैठकीतील चर्चा दडविण्याची धडपड कशासाठी? ही माहिती पत्रकारांना समजली तर काय होईल? अशी भिती जिल्हाधिकाºयांना वाटण्याचे कारण काय? असे अनेक सवाल यामुळे उपस्थित झाले आहे.जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडून नेहमीच गोपनीयतेचे धोरण राबविले जाते. कुठलीही माहिती त्यांना विचारली की ती देण्यास सोयीस्करपणे टाळाटाळ केली जाते. वेळप्रसंगी ‘नो-कॉमेंटस्’ म्हणून थेट नकार देतात. त्या उलट कुठल्याही वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध न करणाºया काहींना मात्र सोयीस्करपणे आतील खबरा देण्याचे कामही करीत असतात. मग या व्यक्ती सोशलमिडीयावरून या बाबी जाहीर करीत असतात. याबाबत पत्रकारांनी वेळोवेळी थेट जिल्हाधिकाºयांकडेच जाहीरपणे नाराजी व्यक्तही केली आहे. मात्र तरीही परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांना त्यांचे प्रशासन चालविण्यापेक्षाही राजकारण करण्यातच अधिक रस आहे की काय? अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.शनिवार, १ डिसेंबर रोजी तर स्वत: पालकमंत्र्यांनी पत्रकारांना बैठकीस बसू देण्याची सूचना करूनही जिल्हाधिकारी मात्र अस्वस्थ होते. त्यांनी त्यांच्या हाताखालच्या अधिकाºयांमार्फत पत्रकारांना बैठकीतून निघून जाण्याबाबत वारंवार सूचना केल्याने अखेर पत्रकारांना सुरू असलेल्या बैठकीतून बाहेर पडावे लागले. मात्र त्याचवेळी सभागृहातच प्रवेशद्वाराजवळ सर्वसामान्य नागरिक मात्र उपस्थित होते. म्हणजेच बैठकीतील चर्चा त्या नागरिकांनी ऐकली तर चालेल मात्र पत्रकारांनी ऐकायला नको. कारण त्याचा आधार घेऊन ते ‘पोलखोल’ करतील, अशी भिती तर जिल्हाधिकाºयांना वाटत नाही ना? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.