शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

..अन्य संशयितांचे काय ?

By admin | Updated: December 4, 2014 14:58 IST

जिल्हा दूध सहकारी संघातर्फे विक्री करण्यात येणार्‍या दुधातील भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ विक्रम आहाळे यांना आरोपी केले आहे.

जळगाव : जिल्हा दूध सहकारी संघातर्फे विक्री करण्यात येणार्‍या दुधातील भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ विक्रम आहाळे यांना आरोपी केले आहे. आहाळे यांना यात मदत करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्या संशयितांवर काय कारवाई करणार?.. या आशयाचे पत्र शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहे.
अन्न विश्लेषकांच्या मते दूध असुरक्षित
जिल्हा दूध संघातून मुंबई येथील पथकाने १८ नोव्हेंबर रोजी टोण्ड व म्हशीच्या दुधाचे नमुने घेतले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या दुधामध्ये मिल्क फॅट कमी, स्किम मिल्क पावडर आणि साखर आढळून आल्याने अन्न सुरक्षा मानके कायदा २00६ चे तरतुदीनुसार खाण्यास व पिण्यास असुरक्षित असल्याचे मत अन्न वेिषकांनी नोंदविले आहे.
एकटे आहाळे दोषी कसे?..
जिल्हा दूध संघात शेतकर्‍याकडून दूध घेतल्यानंतर ते दूध संघात येत असते. त्यानंतर गुणवत्ता व नियंत्रण विकास अधिकार्‍यांनी मान्यता दिल्यानंतर त्याची पॅकिंग केली जात असते. त्यानंतर पुन्हा हे दूध गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले जाते. त्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असते. या प्रक्रियेत वरिष्ठांचा सहभाग असल्याशिवाय एकटे आहाळे हे दुधातील भेसळीचा निर्णय घेणे शक्य नसल्याच्या निष्कर्षापर्यंत तपासाधिकारी किसनराव नजन पाटील हे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात एकटे आहाळे हे आरोपी कसे, असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध विभागाकडे स्पष्टीकरण मागविले आहे.
 
आवक व जावक सारखी, तर लोणी आले कोठून?
पोलिसांनी जिल्हा दूध संघात शेतकर्‍यांकडून आलेल्या दुधाच्या १८ नोव्हेंबरच्या नोंदीचे रेकॉर्ड तपासले आहे. त्यात २८ हजार लीटर गायीचे, तर १५ हजार लीटर म्हशीचे दूध शेतकर्‍यांकडून घेण्यात आले आहे. या दुधावर प्रक्रिया केल्यानंतर तितकेच दूध विक्रीसाठी बाहेर पडलेले आहे. जेवढे दूध आले तितकेच दूध विक्रीला पाठविले आहे तर मग त्या दिवशी तयार केलेले लोणी कोणत्या दुधाद्वारे बनविले? अशी विचारणा पोलिसांनी केली आहे. मुंबईच्या पथकाने ज्या दुधाचे नमुने घेतले होते, ते दूध विक्रीच्या शेवटच्या टप्प्याला असल्याने त्याची जळगाव, धुळे व नाशिक या भागात विक्री झालेली आहे. 
 
परवाना कशाचा?
जिल्हा दूध संघाने शेतकर्‍यांकडून आलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचा परवाना घेतला आहे की, दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्री करण्याचा परवाना घेतला आहे? अशी विचारणा करणारे पत्र पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहे. जिल्हा दूध संघातर्फे सध्या लोणी, श्रीखंड, तूप तयार करून त्याची विक्री सुरू केली आहे.
 
दूध भेसळीच्या दोन पर्यायांचा निष्कर्ष
मुंबईच्या पथकाने पाठविलेल्या अहवालात जिल्हा दूध संघातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये फॅट कमी आहे, साखर आहे, तसेच दुधाची पावडर टाकण्यात आली आहे असे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहे. त्या आधारावर पोलिसांनी भेसळच्या दोन शक्यता वर्तविल्या आहेत. त्यात शेतकर्‍यांकडून आलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्यातील लोणी काढले जात असावे. दुधातील लोणी काढल्यामुळे दुधातील फॅट कमी होत असावे अशी शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी की, शेतकर्‍यांकडून दूध आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्यात पाणी मिसळले जात असावे. दुधाची फॅट वाढविण्यासाठी त्यात साखर व दुधाची पावडर मिसळण्यात येत असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.