शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

केळी पिकास न देता गावासाठी दिले शेतातील विहिरीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:16 IST

यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे.

ठळक मुद्देयावल तालुक्यातील नावरे येथील स्तुत्य उपक्रमप्रभारी सरपंच समाधान पाटील यांचे कौतुकगावास दररोज २० मिनिटे पाणीपुरवठा करणे झाले शक्यगुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. यामुळे सध्या तरी नावरेकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.या वर्षात तालुक्यातील अनेक गावांना इतिहासात कधी नव्हे अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना दोन दिवसांपासून तर २० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.तालुक्यातील नावरे येथील पाणीपुरवठा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळे शिवारातील विहिरीवरून होतो. ते पाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये आणून गावास पाणीपुरवठा होत असतो. मात्र सध्या बोराळे शिवारातील विहिरीची जलपातळी खालावली आहे. यामुळे गावातील पाण्याच्या दोन टाक्या भरल्या जात नाही. परिणामी गावात पाणीटंचाई निर्माण झाली.यावर तोडगा म्हणून प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी गावालगत असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन नावरे गावात येत असलेल्या पाईपलाईनशी जोडला आणि पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला. त्यामुळे शासनास कोणाचीही विहीर अधिग्रहीत करावी लागली नाही. त्यामुळे आता गावास दररोज सुमारे २० मिनिटे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. गुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खालावली. यातूनच संपूर्ण गावास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. गावचे सरपंच म्हणून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे गरजेचे वाटले आणि सरपंच म्हणून निर्णय घेत माझ्या शेतातून येत असलेल्या सार्वजनिक पाईपलाईन शेतातील विहिरीची पाईपलाईन जोडली. त्यामुळे आता दोन विहिरी मिळून गावाचा प्रश्न मिटला आहे. यासंदर्भात तहसीलदार जितें्रद कुवर यांच्याशी चर्चा करून सांगितले आहे, असे प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल