शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

केळी पिकास न देता गावासाठी दिले शेतातील विहिरीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:16 IST

यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे.

ठळक मुद्देयावल तालुक्यातील नावरे येथील स्तुत्य उपक्रमप्रभारी सरपंच समाधान पाटील यांचे कौतुकगावास दररोज २० मिनिटे पाणीपुरवठा करणे झाले शक्यगुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. यामुळे सध्या तरी नावरेकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.या वर्षात तालुक्यातील अनेक गावांना इतिहासात कधी नव्हे अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना दोन दिवसांपासून तर २० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.तालुक्यातील नावरे येथील पाणीपुरवठा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळे शिवारातील विहिरीवरून होतो. ते पाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये आणून गावास पाणीपुरवठा होत असतो. मात्र सध्या बोराळे शिवारातील विहिरीची जलपातळी खालावली आहे. यामुळे गावातील पाण्याच्या दोन टाक्या भरल्या जात नाही. परिणामी गावात पाणीटंचाई निर्माण झाली.यावर तोडगा म्हणून प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी गावालगत असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन नावरे गावात येत असलेल्या पाईपलाईनशी जोडला आणि पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला. त्यामुळे शासनास कोणाचीही विहीर अधिग्रहीत करावी लागली नाही. त्यामुळे आता गावास दररोज सुमारे २० मिनिटे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. गुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खालावली. यातूनच संपूर्ण गावास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. गावचे सरपंच म्हणून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे गरजेचे वाटले आणि सरपंच म्हणून निर्णय घेत माझ्या शेतातून येत असलेल्या सार्वजनिक पाईपलाईन शेतातील विहिरीची पाईपलाईन जोडली. त्यामुळे आता दोन विहिरी मिळून गावाचा प्रश्न मिटला आहे. यासंदर्भात तहसीलदार जितें्रद कुवर यांच्याशी चर्चा करून सांगितले आहे, असे प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल