शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

केळी पिकास न देता गावासाठी दिले शेतातील विहिरीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:16 IST

यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे.

ठळक मुद्देयावल तालुक्यातील नावरे येथील स्तुत्य उपक्रमप्रभारी सरपंच समाधान पाटील यांचे कौतुकगावास दररोज २० मिनिटे पाणीपुरवठा करणे झाले शक्यगुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. यामुळे सध्या तरी नावरेकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.या वर्षात तालुक्यातील अनेक गावांना इतिहासात कधी नव्हे अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना दोन दिवसांपासून तर २० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.तालुक्यातील नावरे येथील पाणीपुरवठा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळे शिवारातील विहिरीवरून होतो. ते पाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये आणून गावास पाणीपुरवठा होत असतो. मात्र सध्या बोराळे शिवारातील विहिरीची जलपातळी खालावली आहे. यामुळे गावातील पाण्याच्या दोन टाक्या भरल्या जात नाही. परिणामी गावात पाणीटंचाई निर्माण झाली.यावर तोडगा म्हणून प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी गावालगत असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन नावरे गावात येत असलेल्या पाईपलाईनशी जोडला आणि पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला. त्यामुळे शासनास कोणाचीही विहीर अधिग्रहीत करावी लागली नाही. त्यामुळे आता गावास दररोज सुमारे २० मिनिटे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. गुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खालावली. यातूनच संपूर्ण गावास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. गावचे सरपंच म्हणून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे गरजेचे वाटले आणि सरपंच म्हणून निर्णय घेत माझ्या शेतातून येत असलेल्या सार्वजनिक पाईपलाईन शेतातील विहिरीची पाईपलाईन जोडली. त्यामुळे आता दोन विहिरी मिळून गावाचा प्रश्न मिटला आहे. यासंदर्भात तहसीलदार जितें्रद कुवर यांच्याशी चर्चा करून सांगितले आहे, असे प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल