शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

अहिल्याबाई होळकर काळातील विहिरींचे जतन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:36 IST

धरणगावातील ऐतिहासिक विहिरी पाणी टंचाईवर ठरू शकतात उपाय

शरदकुमार बन्सी।धरणगाव: थोरसमाज सुधारक आणि पशु-पक्ष्यांसह मानवाच्या अन्न पाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पाणीदार विहिरींचे सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.धरणगाव शहरातील या विहिरी पाणी टंचाईवर प्रभावी उपाय ठरू शकतात,असे जाणकारांचे मत आहे.अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात गावागावात दगडी पाय विहीरींचे निर्माण केल्याने अनेक वर्षे त्या त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी या विहीरींचा आधार मिळाला होता. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या काळात या विहिरींनी पाणी टंचाई दूर होण्यास गावाला हातभार लावला होता.मात्र आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुरातन विहिरींची दूरवस्स्था झाल्याचे दिसत आहे.धरणगाव शहरात धर्मशाळेलगत, सांडेश्वर मंदिराजवळ, गुराई भागात साखर विहिर,गांधी उद्यानात व गावातील इतर ठिकाणी असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन विहिरी पाणी असूनही भग्नाअवस्थेत पडून आहेत. या विहीरींचा उपयोग काही ठिकाणी शहरवासीय कपडे धुणे आणि भांडी घासण्यासाघी करीत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, काही ठिकाणच्या या विहिरी गाळ व कचºयाने भरल्या आहेत. विहिरींना कुंपण न.पा. प्रशासनाने न घातल्याने या विहिरी कचरा कुंड्या झाल्या आहेत. विहिरींमध्ये आज पावेतो काही दुर्घटना झालेल्या नसल्याने त्या उघड्या अवस्थेत पडून आहेत. चार वषार्पासून शहराला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.तीन वर्षापूर्वी गांधी उद्यानालगतच्या व्दारकादास (भांगकुवा) विहिरीने शहराची तहान भागवली होती. पाणीपुरवठा योजना अपयशी ठरलेल्या काळात भांगकुवाने या शहराला तारल्याचा इतिहास आहे.गाळ काढून नूतनीकरण कराधरणगाव नगरपालिका प्रशासनाने गावातील या सर्व अहिल्याबाई यांच्या काळातील विहिरींमधील गाळ काढून त्यांचे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आता तरी या विषयाची प्रशासनाने दखल घेवून भविष्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी धरणगाव शहर आणि परिसतील पुरातन व दुर्लक्षीत विहिरींमधील गाळ,कचरा काढून त्यांचे पूर्नज्जीवन करुन त्यातील पाण्याचा उपाययोजना शहरवासीयांसाठी करावा,अशी अपेक्षा शहरातून व्यक्त केली जात आहे.शहतील पाणी टंचाईवर हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तसे नियोजन करण्याची गरज आहे.टंचाई काळात भांगकुवाने भागवली तहानधरणगाव शहरात असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील भरपूर पाणी असलेल्या विहिरींची दूरवस्था झाली आहे. यातीलच एक भांगकुवा नावाने ओळखल्या जाणाºया विहिरीने पाणी टंचाईच्या काळात धरणगावकरांची तहान भागविल्याच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत. सध्या शहरात भीषण पाणी टंचाई आहे. शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.अशावेळी पाण्याच्या विहिरी स्वच्छ करुन त्याचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.पुरातन काळातीन अनेक विहिरी गाळ व कचºयाने भरल्यामुळे दुर्लक्षित आहे.पाणी टंचाई काळात विहिरींची दूरवस्था दूर करण्याची गरज आहे.पाणी टंचाई निधीतून प्रशासनाकडून मदत घेता येईल. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांसह तहसीलदारांची भेट घेवून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे.-अंजली भानुदास विसावे, उपनगराध्यक्षा, धरणगाव.