शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अहिल्याबाई होळकर काळातील विहिरींचे जतन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:36 IST

धरणगावातील ऐतिहासिक विहिरी पाणी टंचाईवर ठरू शकतात उपाय

शरदकुमार बन्सी।धरणगाव: थोरसमाज सुधारक आणि पशु-पक्ष्यांसह मानवाच्या अन्न पाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पाणीदार विहिरींचे सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.धरणगाव शहरातील या विहिरी पाणी टंचाईवर प्रभावी उपाय ठरू शकतात,असे जाणकारांचे मत आहे.अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात गावागावात दगडी पाय विहीरींचे निर्माण केल्याने अनेक वर्षे त्या त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी या विहीरींचा आधार मिळाला होता. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या काळात या विहिरींनी पाणी टंचाई दूर होण्यास गावाला हातभार लावला होता.मात्र आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुरातन विहिरींची दूरवस्स्था झाल्याचे दिसत आहे.धरणगाव शहरात धर्मशाळेलगत, सांडेश्वर मंदिराजवळ, गुराई भागात साखर विहिर,गांधी उद्यानात व गावातील इतर ठिकाणी असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन विहिरी पाणी असूनही भग्नाअवस्थेत पडून आहेत. या विहीरींचा उपयोग काही ठिकाणी शहरवासीय कपडे धुणे आणि भांडी घासण्यासाघी करीत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, काही ठिकाणच्या या विहिरी गाळ व कचºयाने भरल्या आहेत. विहिरींना कुंपण न.पा. प्रशासनाने न घातल्याने या विहिरी कचरा कुंड्या झाल्या आहेत. विहिरींमध्ये आज पावेतो काही दुर्घटना झालेल्या नसल्याने त्या उघड्या अवस्थेत पडून आहेत. चार वषार्पासून शहराला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.तीन वर्षापूर्वी गांधी उद्यानालगतच्या व्दारकादास (भांगकुवा) विहिरीने शहराची तहान भागवली होती. पाणीपुरवठा योजना अपयशी ठरलेल्या काळात भांगकुवाने या शहराला तारल्याचा इतिहास आहे.गाळ काढून नूतनीकरण कराधरणगाव नगरपालिका प्रशासनाने गावातील या सर्व अहिल्याबाई यांच्या काळातील विहिरींमधील गाळ काढून त्यांचे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आता तरी या विषयाची प्रशासनाने दखल घेवून भविष्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी धरणगाव शहर आणि परिसतील पुरातन व दुर्लक्षीत विहिरींमधील गाळ,कचरा काढून त्यांचे पूर्नज्जीवन करुन त्यातील पाण्याचा उपाययोजना शहरवासीयांसाठी करावा,अशी अपेक्षा शहरातून व्यक्त केली जात आहे.शहतील पाणी टंचाईवर हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तसे नियोजन करण्याची गरज आहे.टंचाई काळात भांगकुवाने भागवली तहानधरणगाव शहरात असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील भरपूर पाणी असलेल्या विहिरींची दूरवस्था झाली आहे. यातीलच एक भांगकुवा नावाने ओळखल्या जाणाºया विहिरीने पाणी टंचाईच्या काळात धरणगावकरांची तहान भागविल्याच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत. सध्या शहरात भीषण पाणी टंचाई आहे. शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.अशावेळी पाण्याच्या विहिरी स्वच्छ करुन त्याचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.पुरातन काळातीन अनेक विहिरी गाळ व कचºयाने भरल्यामुळे दुर्लक्षित आहे.पाणी टंचाई काळात विहिरींची दूरवस्था दूर करण्याची गरज आहे.पाणी टंचाई निधीतून प्रशासनाकडून मदत घेता येईल. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांसह तहसीलदारांची भेट घेवून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे.-अंजली भानुदास विसावे, उपनगराध्यक्षा, धरणगाव.