शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:59 IST

नागरिक त्रस्त : ग्रामीण भागात ६ ते ७ तास वीज पुरवठा खंडीत

जळगाव : कोरोनामुळे चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, अनेक नागरिक शासन व प्रशासनाचे आदेश मानत लॉकडाऊन पाळत आहेत. मात्र, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरीभागासह ग्रामीण भागात तब्बल ६ ते ७ तास वीजपुरवठा खंडीत राहत असल्याने नागरिकांना जबरदस्त उकाड्यामुळे घरात थांबणे देखील कठीण झाले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणने आता अघोषित भारनियमनच जाहीर केल्याचे चित्र दिसून येत आहे.लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत. त्यातच जिल्ह्यात तापमानाचा पारा दररोज नवनवीन विक्रमी पल्ले गाठत असताना, दुसरीक डे महावितरणकडून दररोज वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे आधीच तापमानाचा कहर सहन करण्यापलीकडे त्यातच वीजपुरवठा खंडीत होत असल्याने घरात थांबणेही कठीण झाले आहे.महावितरणने मान्सूनपुर्व कामांना सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात मुख्य वीजतारांजवळील वृक्षांच्या फांदा तोडणे, वीजेचे खराब झालेले खांब नव्याने लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेदरम्यान वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचे महावितरणे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. मात्र, प्रत्यक्षात वीज पुरवठा ५ तास न जाता ६ ते ७ तास खंडीत ठेवला जात आहे.विशेष म्हणजे ज्या भागात दुरुस्तीचे काम झाले आहे. त्या भागात देखील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.-दरम्यान, महावितरणतर्फे देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी विज पुरवठा खंडित होण्याचे कारण सांगण्यात येत असले तरी हा पुरवठा दिलेल्या वेळेत सुरु न होता, दोन ते तीन तास उशिराने सुरू होत असल्यामुळे नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.एका गावाच्या कामाला आठ दिवसमहावितरणकडून दरवर्षी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येत असतात. मात्र, या कामांची गती अतिशय संथ असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर्षाची परिस्थिती इतर वर्षांच्या तुलनेत जरा वेगळी आहे. कारण लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरातच थांबून आहेत. तसेच इलेक्ट्रिकची दुकाने बंद असल्याने कुलर देखील नागरिक खरेदी करू शकलेले नाहीत. प्रचंड तापमानामुळे घरातील पंखे देखील गरम हवा सोडत आहेत. अशा परिस्थिती वीज पुरवठा सात ते आठ तास खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील आव्हाणे, वडली, वावडदा, वडनगरी, फुफनगरी, खेडी, कानळदा या भागात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव