शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:59 IST

नागरिक त्रस्त : ग्रामीण भागात ६ ते ७ तास वीज पुरवठा खंडीत

जळगाव : कोरोनामुळे चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, अनेक नागरिक शासन व प्रशासनाचे आदेश मानत लॉकडाऊन पाळत आहेत. मात्र, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरीभागासह ग्रामीण भागात तब्बल ६ ते ७ तास वीजपुरवठा खंडीत राहत असल्याने नागरिकांना जबरदस्त उकाड्यामुळे घरात थांबणे देखील कठीण झाले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणने आता अघोषित भारनियमनच जाहीर केल्याचे चित्र दिसून येत आहे.लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत. त्यातच जिल्ह्यात तापमानाचा पारा दररोज नवनवीन विक्रमी पल्ले गाठत असताना, दुसरीक डे महावितरणकडून दररोज वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे आधीच तापमानाचा कहर सहन करण्यापलीकडे त्यातच वीजपुरवठा खंडीत होत असल्याने घरात थांबणेही कठीण झाले आहे.महावितरणने मान्सूनपुर्व कामांना सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात मुख्य वीजतारांजवळील वृक्षांच्या फांदा तोडणे, वीजेचे खराब झालेले खांब नव्याने लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेदरम्यान वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचे महावितरणे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. मात्र, प्रत्यक्षात वीज पुरवठा ५ तास न जाता ६ ते ७ तास खंडीत ठेवला जात आहे.विशेष म्हणजे ज्या भागात दुरुस्तीचे काम झाले आहे. त्या भागात देखील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.-दरम्यान, महावितरणतर्फे देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी विज पुरवठा खंडित होण्याचे कारण सांगण्यात येत असले तरी हा पुरवठा दिलेल्या वेळेत सुरु न होता, दोन ते तीन तास उशिराने सुरू होत असल्यामुळे नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.एका गावाच्या कामाला आठ दिवसमहावितरणकडून दरवर्षी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येत असतात. मात्र, या कामांची गती अतिशय संथ असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर्षाची परिस्थिती इतर वर्षांच्या तुलनेत जरा वेगळी आहे. कारण लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरातच थांबून आहेत. तसेच इलेक्ट्रिकची दुकाने बंद असल्याने कुलर देखील नागरिक खरेदी करू शकलेले नाहीत. प्रचंड तापमानामुळे घरातील पंखे देखील गरम हवा सोडत आहेत. अशा परिस्थिती वीज पुरवठा सात ते आठ तास खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील आव्हाणे, वडली, वावडदा, वडनगरी, फुफनगरी, खेडी, कानळदा या भागात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव