शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

अहिंसेची कास धरल्यावरच आपण पुढे जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं ...

जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं व तो अहिंसेचा विचार, मार्ग आपल्याला दाखवला. अहिंसेची कास धरल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. असे विचार जेष्ठ नाटककार व परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी ''फुले-आंबेडकर आणि आपण'' या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक येथील पुरोगामी विचार मंच आयोजित या महात्मा फुले जयंती निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या साहित्याचा, विचारांचा सामाजिक कार्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील सामाजिक चळवळी वर परिणाम झाला. मराठी रंगभूमीची सुरुवात तंजावरी नाटकांपासून झाली असून,या परंपरेत महात्मा फुले यांचे तृतीय रत्न हे मराठी रंगभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे नाटक असल्याचे सांगितले. फुले यांनी लिहिलेले ''अखंड'' सत्यशोधकी परंपरा, आंबेडकरी जलसे यासारख्या सांस्कृतिक बाबींकडे सुद्धा शंभू पाटलांनी लक्ष वेधले. क्रांतीचा विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हजारो वर्षांच्या आपल्या समाजावर च्या अन्यायाला वाचा फोडतात आणि या चळवळीत ते तथागत बुद्धाचे बोट पकडतात. बुद्धाचा अहिंसेचा विचार पुढे नेतात बाबासाहेबांचा हाच विचार आपल्याला पुढे न्यावा लागणार आहे म्हणून आपल्याला अहिंसेची कास धरल्याशिवाय आपलं उत्थान होऊ शकत नाही. या साठीच आपल्याला महात्मा गांधी , रामायण , महाभारत पण समजून घ्यावे लागणार असल्याचेही शंभू पाटील यांनी सांगितले.