शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेची कास धरल्यावरच आपण पुढे जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं ...

जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं व तो अहिंसेचा विचार, मार्ग आपल्याला दाखवला. अहिंसेची कास धरल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. असे विचार जेष्ठ नाटककार व परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी ''फुले-आंबेडकर आणि आपण'' या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक येथील पुरोगामी विचार मंच आयोजित या महात्मा फुले जयंती निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या साहित्याचा, विचारांचा सामाजिक कार्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील सामाजिक चळवळी वर परिणाम झाला. मराठी रंगभूमीची सुरुवात तंजावरी नाटकांपासून झाली असून,या परंपरेत महात्मा फुले यांचे तृतीय रत्न हे मराठी रंगभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे नाटक असल्याचे सांगितले. फुले यांनी लिहिलेले ''अखंड'' सत्यशोधकी परंपरा, आंबेडकरी जलसे यासारख्या सांस्कृतिक बाबींकडे सुद्धा शंभू पाटलांनी लक्ष वेधले. क्रांतीचा विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हजारो वर्षांच्या आपल्या समाजावर च्या अन्यायाला वाचा फोडतात आणि या चळवळीत ते तथागत बुद्धाचे बोट पकडतात. बुद्धाचा अहिंसेचा विचार पुढे नेतात बाबासाहेबांचा हाच विचार आपल्याला पुढे न्यावा लागणार आहे म्हणून आपल्याला अहिंसेची कास धरल्याशिवाय आपलं उत्थान होऊ शकत नाही. या साठीच आपल्याला महात्मा गांधी , रामायण , महाभारत पण समजून घ्यावे लागणार असल्याचेही शंभू पाटील यांनी सांगितले.