शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राम कार्याशिवाय आता आम्हाला विश्रांती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ‘राम काज बिन मोहे, अब आराम नही’, अशा शब्दात साधू, संत-महंत, कीर्तनकार आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - ‘राम काज बिन मोहे, अब आराम नही’, अशा शब्दात साधू, संत-महंत, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी राम मंदिर निधी उभारणीसाठी संकल्प केला. शनिवारी पांझरापोळ येथे श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जळगाव जिल्ह्यातील साधू-संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे संत संमेलन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली, बेलदारवाडी, श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह. भ. प. भगवान महाराज, अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव, गोरक्षनाथ आखाड्याचे धर्मशास्त्र विभागप्रमुख योगी दत्तनाथजी महाराज, श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, आडगावचे देव गोपाल शास्त्री, चाळीसगाव वारकरी शिक्षण संस्थेचे ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज, नंदगावचे जितेंद्र योगी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेदमंत्रांच्या उद्घोषात शंखनाद करण्यात आला. वेदमंत्रांच्या उद्घोषात दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक एकात्मतेच्या मंत्राने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी संतांचे औक्षण करून स्वागत केले. प्रास्ताविक देवेंद्र भावसार यांनी केले.

निधी समर्पण समितीचे अध्यक्ष ह. भ. प. प्रसाद महाराज यांनी पाठविलेले आर्शिवचन सर्वांना एेकविण्यात आले. योगी दत्तनाथ महाराज यांनी राम मंदिरासाठी अनेकांनी केलेल्या बलिदानाचा इतिहास सांगितला. सर्व संतांनी रामसेवक बनून प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याचे आवाहन केले.

जितेंद्र योगी यांनी सर्व संतांना राम मंदिर उभारणीसाठी संकल्प करण्याचे आवाहन केले. देवगोपाल शास्त्री यांनी प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर हे माझे आहे, ही भावना प्रत्येकात असावी, यासाठी हे अभियान असल्याचे सांगितले. ह. भ. प. सुखदेव महाराज, ह. भ. प. जगन्नाथ महाराज सोनटक्के यांनीही मनोगत व्यक्त केले.

या संमेलनाचा समारोप श्री श्री १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाने झाला. ते म्हणाले की, हे अभियान अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत असून, राष्ट्र मंदिराचे आधारस्तंभ होण्याचे भाग्य आहे. त्यामुळे सर्व समाजाने यात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. सूत्रसंचालन ह. भ. प. संदीप महाराज वाघळीकर यांनी केले. सामूहिक पद्य अंजली हांडे यांनी तर पसायदान अंजली सोनवणे यांनी सादर केले. संतांचा परिचय ॲड. श्रीराम बारी यांनी करुन दिला तर हरिष कोल्हे यांनी आभार मानले.

या संमेलनाच्या यशस्वितेसाठी राकेश लोहार, दीपक दाभाडे, समाधान पाटील, ह. भ. प. योगेश महाराज कोळी, कवी कासार, ह. भ. प. संदीप महाराज महाजन, संध्या तिवारी, कांचन माने, वृषाली जोशी, सपना वानखेडे, जितू राजपूत, सागर माळी, स्नेहल विसपुते, सागर दुसाने, राहुल राजपूत, बापू माळी यांनी परिश्रम घेतले.