शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड , जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ...

ठळक मुद्देअजून आठ दिवस पाणीपुरवठा होणे अशक्यपाण्यासाठी दुष्काळात वसुली सुरू, साडेसहा लाख गोळालोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबोदवड, जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना बसत आहेत. अजून किमान आठ दिवस ओडीएचा पाणीपुरवठा सुरू होणे अशक्य आहे.१२ रोजी बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ या तिन्ही तालुक्यातील ८० गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा (ओडीए) योजनेचे वीज बिल थकल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर बिल भरण्यास जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे निधी नसल्याने या योजनेच्या संबंधित गावांना पाणीपट्टी वसुली करून निधी गोळा करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार ते कामाला लागले आहेत.आजपावेतो बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांनी बोदवड तालुक्यातील राजूर, कोल्हाडी, निमखेड, जामठी, शेलवड, विचवा, येवती या गावातून एक लाख २५ हजार गोळा करून जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा केले आहेत, तर बोदवड नगर पंचायतीने पाच लाखांचा धनादेश दिल्याचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी सांगितले. असे एकूण सहा लाख २५ हजार अद्यापपावेतो जमा झाले आहेत. अजून पाणीपट्टी गोळा करणे सुरू असल्याचे गटविकास अधिकारी वाघ यांनी सांगितले.१६ रोजी ओडीएच्या जलशुद्धीकरणच्या सारोळा केंद्रावरून वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे रोहित्र चोरून नेल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. आजघडीला बोदवड शहरात १७ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. ९० टक्के ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बोदवड शहरात काही प्रभागात १७ ते १८ दिवस उलटत आले आहेत. नळाला पाणी आले नाही तर नगरपंचायत शहरातील विहिरीचे पाणी गोळा करून पुरवत आहे. पण या विहिरीच्या पाण्यावर शहराची तहान दोन महिनेही सलग भागणे अवघड आहे.सोशल मीडियावर मात्र राजकारण सुरू झाले, पण पाण्यासाठी कोणीच पुढे येण्यास तयार नाही. लोक प्रतिनधींनाही पाणी टंचाईबाबत काहीच घेणे-देणे नसल्याचे चित्र दिसत आहे.१० दिवस उलटूनही जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ८० गावे पाण्यासाठी वणवण करीत आहे, तर लोकप्रतिनिधीही गप्प का, हे समजेनासे झाले आहे, तर खासदारही पाहण्यास तयार नाही व नागरिक घटकाभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जिल्हा परिषदेचे साकडे, बैठक निष्फळओडीएचे चोरीस गेलेले रोहित्र घेण्यासाठी व या योजनेचे थकीत बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अधिकारी (अभियंता) साधना नरवाडे यांनी १९ रोजी नाशिक येथील जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. वरिष्ठांना या योजनेचे रोहित्र चोरीस गेले असून, नवीन रोहित्र अथवा दुरुस्तीसाठी व वीज बिलसाठी साकडे घातले. परंतु त्यांनीही सदर नवीन रोहित्रासाठी टंचाईच्या निधीत मागणी करावी, असे सांगून जीवन प्राधिकरणकडे तजवीजसाठी नकार दिला आहे. आता टंचाईग्रस्त निधीत जिल्हा परिषद रोहित्रसाठी निधी मागणार असल्याचे या योजनेच्या कार्यकारी अधिकारी साधना नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अडीअडचणीटंचाईग्रस्तमधून निधी मिळाला तरी या योजनेसाठी लागणारे ३१५ अश्वशक्तीचे रोहित्र वीज वितरण कंपनीकडे नाही. यासाठी टेंडर करावे लागेल तोपर्यंत वीज बिल भरूनही फायदा नाही, तर नवीन रोहित्र किती दिवसात मिळते यावर सर्व अवलंबून आहे. तोपर्यंत पाणी मिळणे अशक्य आहे तर पाण्यासाठी नागरिक पायपिट करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड