शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड , जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ...

ठळक मुद्देअजून आठ दिवस पाणीपुरवठा होणे अशक्यपाण्यासाठी दुष्काळात वसुली सुरू, साडेसहा लाख गोळालोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबोदवड, जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना बसत आहेत. अजून किमान आठ दिवस ओडीएचा पाणीपुरवठा सुरू होणे अशक्य आहे.१२ रोजी बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ या तिन्ही तालुक्यातील ८० गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा (ओडीए) योजनेचे वीज बिल थकल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर बिल भरण्यास जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे निधी नसल्याने या योजनेच्या संबंधित गावांना पाणीपट्टी वसुली करून निधी गोळा करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार ते कामाला लागले आहेत.आजपावेतो बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांनी बोदवड तालुक्यातील राजूर, कोल्हाडी, निमखेड, जामठी, शेलवड, विचवा, येवती या गावातून एक लाख २५ हजार गोळा करून जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा केले आहेत, तर बोदवड नगर पंचायतीने पाच लाखांचा धनादेश दिल्याचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी सांगितले. असे एकूण सहा लाख २५ हजार अद्यापपावेतो जमा झाले आहेत. अजून पाणीपट्टी गोळा करणे सुरू असल्याचे गटविकास अधिकारी वाघ यांनी सांगितले.१६ रोजी ओडीएच्या जलशुद्धीकरणच्या सारोळा केंद्रावरून वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे रोहित्र चोरून नेल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. आजघडीला बोदवड शहरात १७ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. ९० टक्के ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बोदवड शहरात काही प्रभागात १७ ते १८ दिवस उलटत आले आहेत. नळाला पाणी आले नाही तर नगरपंचायत शहरातील विहिरीचे पाणी गोळा करून पुरवत आहे. पण या विहिरीच्या पाण्यावर शहराची तहान दोन महिनेही सलग भागणे अवघड आहे.सोशल मीडियावर मात्र राजकारण सुरू झाले, पण पाण्यासाठी कोणीच पुढे येण्यास तयार नाही. लोक प्रतिनधींनाही पाणी टंचाईबाबत काहीच घेणे-देणे नसल्याचे चित्र दिसत आहे.१० दिवस उलटूनही जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ८० गावे पाण्यासाठी वणवण करीत आहे, तर लोकप्रतिनिधीही गप्प का, हे समजेनासे झाले आहे, तर खासदारही पाहण्यास तयार नाही व नागरिक घटकाभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जिल्हा परिषदेचे साकडे, बैठक निष्फळओडीएचे चोरीस गेलेले रोहित्र घेण्यासाठी व या योजनेचे थकीत बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अधिकारी (अभियंता) साधना नरवाडे यांनी १९ रोजी नाशिक येथील जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. वरिष्ठांना या योजनेचे रोहित्र चोरीस गेले असून, नवीन रोहित्र अथवा दुरुस्तीसाठी व वीज बिलसाठी साकडे घातले. परंतु त्यांनीही सदर नवीन रोहित्रासाठी टंचाईच्या निधीत मागणी करावी, असे सांगून जीवन प्राधिकरणकडे तजवीजसाठी नकार दिला आहे. आता टंचाईग्रस्त निधीत जिल्हा परिषद रोहित्रसाठी निधी मागणार असल्याचे या योजनेच्या कार्यकारी अधिकारी साधना नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अडीअडचणीटंचाईग्रस्तमधून निधी मिळाला तरी या योजनेसाठी लागणारे ३१५ अश्वशक्तीचे रोहित्र वीज वितरण कंपनीकडे नाही. यासाठी टेंडर करावे लागेल तोपर्यंत वीज बिल भरूनही फायदा नाही, तर नवीन रोहित्र किती दिवसात मिळते यावर सर्व अवलंबून आहे. तोपर्यंत पाणी मिळणे अशक्य आहे तर पाण्यासाठी नागरिक पायपिट करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड