शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

पाण्याअभावी लावलेली रोपे मरणाला ‘टेकली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ...

मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती मनपाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेली रोपे सध्या पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजून मरणावस्थेला आली आहेत, तर दुसरीकडे मनपाकडून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कुठलीही देखभाल करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे मेहरुन तलावाच्या अस्तित्वासाठी मनपाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. तत्कालीन महापौर भारती सोनवणे यांनी या झाडांना पाणी देण्यासाठी एका मक्तेदाराची नियुक्तीही केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी संबंधित मक्तेदारातर्फे उन्हाळ्यात नियमित या रोपांना पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली. मात्र, यंदा संबंधित मक्तेदारातर्फे कुठल्याही प्रकारचे पाणी अथवा उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे ही झाडे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळत आहेत. त्यामुळे वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात येत असून, मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

झाडांचीही दिवसाढवळ्या कत्तल

या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे झाडांची कत्तल होत असल्याचा प्रकार दिसल्यावर तात्काळ अडविले जाते. मात्र, सध्या उन्हाळा आणि त्यात कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिक दुपारनंतर घराबाहेर निघणे टाळतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेत काही नागरिक मेहरुन तलावाभोवती असलेली झाडे तोडत असल्याचे प्रकार परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. तसेच काही नागरिक झाडांच्या मधोमध कुऱ्हाडीने घाव घालून, झाडांना खड्डे पाडत असल्याने ही झाडे आपोआप काही दिवसांनी पूर्णपणे वाळत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

गेल्या वर्षी मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार नियमितपणे रोपांना पाणी देऊन झाडे जगवली. मात्र, यंदा या ठेकेदाराने झाडांना पाणी देण्याबाबत कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे झाडे वाळत आहेत. तसेच दुसरीकडे मनपाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिक झाडेही तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहराचे हे वैभव टिकण्यासाठी मनपाने लक्ष देणे गरजेचे आहे.

विजय वाणी, सचिव, मराठी प्रतिष्ठान

इन्फो :

ठेकेदार प्रतिसाद देईना

‘लोकमत’ प्रतिनिधीने गेल्या वर्षी या रोपांना नियमित पाणी दिलेल्या ठेकेदाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी मेहरुन तलावाच्या संवर्धनाबाबत लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवासी व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.