शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पाण्याअभावी लावलेली रोपे मरणाला ‘टेकली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ...

मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती मनपाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेली रोपे सध्या पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजून मरणावस्थेला आली आहेत, तर दुसरीकडे मनपाकडून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कुठलीही देखभाल करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे मेहरुन तलावाच्या अस्तित्वासाठी मनपाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. तत्कालीन महापौर भारती सोनवणे यांनी या झाडांना पाणी देण्यासाठी एका मक्तेदाराची नियुक्तीही केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी संबंधित मक्तेदारातर्फे उन्हाळ्यात नियमित या रोपांना पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली. मात्र, यंदा संबंधित मक्तेदारातर्फे कुठल्याही प्रकारचे पाणी अथवा उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे ही झाडे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळत आहेत. त्यामुळे वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात येत असून, मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

झाडांचीही दिवसाढवळ्या कत्तल

या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे झाडांची कत्तल होत असल्याचा प्रकार दिसल्यावर तात्काळ अडविले जाते. मात्र, सध्या उन्हाळा आणि त्यात कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिक दुपारनंतर घराबाहेर निघणे टाळतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेत काही नागरिक मेहरुन तलावाभोवती असलेली झाडे तोडत असल्याचे प्रकार परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. तसेच काही नागरिक झाडांच्या मधोमध कुऱ्हाडीने घाव घालून, झाडांना खड्डे पाडत असल्याने ही झाडे आपोआप काही दिवसांनी पूर्णपणे वाळत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

गेल्या वर्षी मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार नियमितपणे रोपांना पाणी देऊन झाडे जगवली. मात्र, यंदा या ठेकेदाराने झाडांना पाणी देण्याबाबत कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे झाडे वाळत आहेत. तसेच दुसरीकडे मनपाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिक झाडेही तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहराचे हे वैभव टिकण्यासाठी मनपाने लक्ष देणे गरजेचे आहे.

विजय वाणी, सचिव, मराठी प्रतिष्ठान

इन्फो :

ठेकेदार प्रतिसाद देईना

‘लोकमत’ प्रतिनिधीने गेल्या वर्षी या रोपांना नियमित पाणी दिलेल्या ठेकेदाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी मेहरुन तलावाच्या संवर्धनाबाबत लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवासी व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.