शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हाळे तलावावरून होणार पाणीपुरवठा

By admin | Updated: February 23, 2017 01:13 IST

यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता कमी : भुसावळ तालुक्यातील केवळ सहा गावांना संभाव्य टंचाई

भुसावळ : गेल्या वर्षी  सर्वत्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी टिकून आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी  भुसावळ तालुक्यातील पाणीटंचाई खूपच कमी झाली आहे. येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने जि.प.कडे सादर केलेल्या कृती आराखड्यात केवळ सहाच गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याचे म्हटले आहे. सात लाख ५० हजार रुपये अंदाजित खर्चाच्या कृती आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर टंचाई निवारण्याची कामे हाती घेण्यात येतील, असे संबंधित विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत खंडाळे आणि शिंदी या दोन गावांना वेल्हाळे येथील तलावावरून पाणीपुरवठा करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ती मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. पी. लोखंडे यांनी दिली.मागणी आल्यास टँकरचा वापरदरम्यान, गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले, त्यामुळे भुसावळ तालुक्यातील केवळ सहा गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यात खेडी, चोरवड, शिंदी, टाहाकळी, कंडारी, साकरीफाटा या सहा गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, महादेवमाळ, कंडारी  आणि साकरी फाटा या गावांकडून पाण्याची मागणी करण्यात आल्यास या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.३६ वरून सहा गावेदरम्यान, गेल्या वर्षी व त्याच्या आधीदेखील भुसावळ तालुका टंचाई कृती आराखड्यात सुमारे ३६ गावांचा समावेश असायचा. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर व्हायची. यात दरवेळी कंडारी आणि साकरीफाटा परिसराला कायम स्वरुपी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र,  पाऊस झाल्याने  टंचाईची तीव्रता कमी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील खंडाळे आणि शिंदी  या दोन गावांना योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला आहे.४ या योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील तलावाच्या काठावर दोन ठिकाणी विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यातून पीव्हीसी पाईपलाईन टाकून या दोन गावांमधील विहिरीत पाणी सोडून ते गावांना पुरवण्याची योजना तयार करण्यात आली आहे.भुसावळ तालुक्यातील खंडाळे व शिंदी या गावांसाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात सादर झाला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ही योजना महत्त्वाकांक्षी आहे. वेल्हाळे ते खंडाळे आणि शिंदी या गावांना पीव्हीसी पाईपलाईन वेल्हाळे तलाव ते शिंदी व खंडाळे अशी या क्रॉस कंट्री पद्धतीने पाईपलाईन अंथरून या दोन गावांना पाणीपुरवठा करण्याची मोठी योजना आहे.वेल्हाळे तलावावरून शिंदी या सुमारे २००० हजार लोकसंख्येच्या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही सुमारे ७६ लाख रुपये इतक्या खर्चाची आहे.यात तलावाजवळ विहीर आणि विहिरीपासून गावापर्यंत पीव्हीसी पाईपलाईन अंथरून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत भुसावळ तालुक्यातील खंडाळे या गावाचाही समावेश करण्यात आला आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १ हजार २०० इतकी आहे. या गावातील पाण्याच्या टाकीत वेल्हाळे तलावावरून पीव्हीसी पाईपलाईनद्वारे पाणी वाहून आणून त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. खंडाळे गावासाठीची ही योजना ६४ लाख रुपये इतक्या किमतीची असल्याची माहिती अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली आहे.