शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

वेल्हाळे तलावावरून होणार पाणीपुरवठा

By admin | Updated: February 23, 2017 01:13 IST

यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता कमी : भुसावळ तालुक्यातील केवळ सहा गावांना संभाव्य टंचाई

भुसावळ : गेल्या वर्षी  सर्वत्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी टिकून आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी  भुसावळ तालुक्यातील पाणीटंचाई खूपच कमी झाली आहे. येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने जि.प.कडे सादर केलेल्या कृती आराखड्यात केवळ सहाच गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याचे म्हटले आहे. सात लाख ५० हजार रुपये अंदाजित खर्चाच्या कृती आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर टंचाई निवारण्याची कामे हाती घेण्यात येतील, असे संबंधित विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत खंडाळे आणि शिंदी या दोन गावांना वेल्हाळे येथील तलावावरून पाणीपुरवठा करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ती मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. पी. लोखंडे यांनी दिली.मागणी आल्यास टँकरचा वापरदरम्यान, गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले, त्यामुळे भुसावळ तालुक्यातील केवळ सहा गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यात खेडी, चोरवड, शिंदी, टाहाकळी, कंडारी, साकरीफाटा या सहा गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, महादेवमाळ, कंडारी  आणि साकरी फाटा या गावांकडून पाण्याची मागणी करण्यात आल्यास या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.३६ वरून सहा गावेदरम्यान, गेल्या वर्षी व त्याच्या आधीदेखील भुसावळ तालुका टंचाई कृती आराखड्यात सुमारे ३६ गावांचा समावेश असायचा. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर व्हायची. यात दरवेळी कंडारी आणि साकरीफाटा परिसराला कायम स्वरुपी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र,  पाऊस झाल्याने  टंचाईची तीव्रता कमी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील खंडाळे आणि शिंदी  या दोन गावांना योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला आहे.४ या योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील तलावाच्या काठावर दोन ठिकाणी विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यातून पीव्हीसी पाईपलाईन टाकून या दोन गावांमधील विहिरीत पाणी सोडून ते गावांना पुरवण्याची योजना तयार करण्यात आली आहे.भुसावळ तालुक्यातील खंडाळे व शिंदी या गावांसाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात सादर झाला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ही योजना महत्त्वाकांक्षी आहे. वेल्हाळे ते खंडाळे आणि शिंदी या गावांना पीव्हीसी पाईपलाईन वेल्हाळे तलाव ते शिंदी व खंडाळे अशी या क्रॉस कंट्री पद्धतीने पाईपलाईन अंथरून या दोन गावांना पाणीपुरवठा करण्याची मोठी योजना आहे.वेल्हाळे तलावावरून शिंदी या सुमारे २००० हजार लोकसंख्येच्या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही सुमारे ७६ लाख रुपये इतक्या खर्चाची आहे.यात तलावाजवळ विहीर आणि विहिरीपासून गावापर्यंत पीव्हीसी पाईपलाईन अंथरून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत भुसावळ तालुक्यातील खंडाळे या गावाचाही समावेश करण्यात आला आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १ हजार २०० इतकी आहे. या गावातील पाण्याच्या टाकीत वेल्हाळे तलावावरून पीव्हीसी पाईपलाईनद्वारे पाणी वाहून आणून त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. खंडाळे गावासाठीची ही योजना ६४ लाख रुपये इतक्या किमतीची असल्याची माहिती अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली आहे.