शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भुसावळात पाणीबाणी, पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 19:25 IST

गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला.

ठळक मुद्देप्रांत कार्यालयावर धडकल्या महिलाडोक्यावर हंडे घेऊन मांडल्या व्यथापाणी नसल्याने महिला झाल्या हतबल पाणी वाटप नियोजन कोलमडले

भुसावळ, जि.जळगाव : गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला.शहरातील पंचशील नगर, गौतम नगर, गौसिया नगर, गंगाराम प्लॉट, पापा नगर व काझी प्लॉट भागात पालिकेच्या नाकर्तेपणामुळे महिना उलटला तरी पाणी नाही. या भागात गोरगरीब राहात असल्याने ते टँकरही आणू शकत नाही. पाणी नसल्याने महिला हतबल झाल्या आहेत. ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.या भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. टॅकरवाल्यांचीही मनमानी सुरू आहे. हतनूर धरणात जलसाठा कमी आह,े हे माहीत असूनही शहरातील विंधन विहिरी व विहिरींंचा शोध घेऊन पाणीटंचाई दूर करता आली असती. परंतु सुस्त प्रशासनामुळे या टंचाईचा सामना करावा लागत आहे. आधीच वाढते तापमान, त्यात पाणीटंचाईने जनता व्याकूळ झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी जनतेची धावाधाव सुरू आहे. या गंभीर प्रश्नाची शासनाने दखल घ्यावी या मागणीचे निवेदन मोर्चाद्वारे प्रांत अधिकाº्यांना देण्यात आले. राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात विक्रम वानखेडे, असगर शेख, आकाश गिरधर, नजीर शहा, पंकज सपकाळे, शहनाज बी, विकास गिरधर, शबानाबी शेख अलियार, आरिफाबी शेख मोहम्मद, सायराबी ईस्माईल, सत्तार बागवान, शबिया बी, जुबेदा बी, रजिया खातून, शेख सलमा शेख रज्जाक यांच्यासह इतरांचा सहभाग होता.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ