शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बाराही महिने १० दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: February 23, 2017 01:15 IST

धरणगाव : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्याची गरज

धरणगाव : पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या पाच झोनचे एकेक झोन वाढत जाऊन ते पन्नासपर्यंत पोहोचल्याने धरणगाववासीयांना १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती केवळ आजची नसून, बाराही महिने ही स्थिती कायम असते. यामुळे नागरिक कंटाळले आहेत. नियमित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.पूर्वीपासून शहरवासीयांच्या नशिबी असलेले पाण्याचे दुर्भिक्ष १४ कोटींची तापी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर तरी कमी होईल, असे वाटत होते. मात्र ही योजना कार्यान्वित झाल्यानंतरसुद्धा पाणी असो वा नसो ‘१० दिवसाआड’ शहराला पाणीपुरवठा होतो. याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील मुख्य पाच झोनचे गल्लोगल्ली झालेले ५० उपझोन होय. या उपझोनमुळे एका झोनला दोन दिवस पाणीपुरवठा करावा लागतो. पर्यायाने रोटेशन फिरण्यास १० दिवस लागतात. त्यामुळे शहरासाठी नव्याने जलवाहिन्या टाकण्याची नितांत गरज असून यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नूतन नगराध्यक्षांनी मंत्र्यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर करून घेतल्यास शहराची पाणीपुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार     आहे.योजना झाली, पण...धरणगाव शहराला १४ कोटींची पाणीपुरवठा योजना १९९८ ला मंजूर झाली होती. या योजनेच्या कामाला १७-१८ वर्षे लोटली गेली. योजना पूर्ण होऊन शहराला पाणीही मिळाले. मात्र ‘जलशुद्धीकरण’ केंद्राचे काम अद्याप रखडलेलेच आहे. तापी योजनेचे अशुद्ध पाणी शहरवासीयांना जादा झोनमुळे १० दिवसाआड मिळत आहे.जलवाहिन्या बदलणे हा एकच पर्याय शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी या योजनेंतर्गत नागपूर येथील ए.डी.सी.सी. कंपनीतर्फे नवीन जलवाहिन्या टाकण्यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे. या सर्व्हेचा डीपीआर कंपनीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविला असून, जीवन प्राधिकरण इस्टिमेट तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तरच शहरातील पाणी समस्या दूर होणार आहे. यासाठी मतदारसंघाचे मंत्री गुलाबराव पाटील, शहराचे नूतन नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन व सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. (वार्ताहर)लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून वाढले उपझोन४पूर्वी धरणगाव शहरात पाच झोनद्वारे पाणीपुरवठा होत असे. कालांतराने पाच झोनचे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव उपझोन वाढत गेले अन् वाढता वाढता पन्नासवर उपझोन झाले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ४एक झोन व त्याच्या उपझोनला पाणीपुरवठा करण्यास दोन दिवस लागत असल्याने रोटेशन फिरता फिरता १० दिवस उलटून जातात. त्यामुळे शहरवासीयांना १० दिवसाआड पाणी मिळत आहे.४झोन वाढल्यामुळे शहरवासीयांना पाणी मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. अजून फेब्रुवारी सुरू आहे. एप्रिल-मे महिना काढायचा आहे, तेव्हा काय हाल होतील या चिंतेत नागरिक आहेत.धरणगाव शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलविण्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत.           राज्याचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. जेणेकरून धरणगाववासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करून         देण्याचे आमचे प्रयत्न               आहेत.-सलीम पटेल, नगराध्यक्ष, धरणगाव