शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बाराही महिने १० दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: February 23, 2017 01:15 IST

धरणगाव : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्याची गरज

धरणगाव : पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या पाच झोनचे एकेक झोन वाढत जाऊन ते पन्नासपर्यंत पोहोचल्याने धरणगाववासीयांना १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती केवळ आजची नसून, बाराही महिने ही स्थिती कायम असते. यामुळे नागरिक कंटाळले आहेत. नियमित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.पूर्वीपासून शहरवासीयांच्या नशिबी असलेले पाण्याचे दुर्भिक्ष १४ कोटींची तापी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर तरी कमी होईल, असे वाटत होते. मात्र ही योजना कार्यान्वित झाल्यानंतरसुद्धा पाणी असो वा नसो ‘१० दिवसाआड’ शहराला पाणीपुरवठा होतो. याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील मुख्य पाच झोनचे गल्लोगल्ली झालेले ५० उपझोन होय. या उपझोनमुळे एका झोनला दोन दिवस पाणीपुरवठा करावा लागतो. पर्यायाने रोटेशन फिरण्यास १० दिवस लागतात. त्यामुळे शहरासाठी नव्याने जलवाहिन्या टाकण्याची नितांत गरज असून यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नूतन नगराध्यक्षांनी मंत्र्यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर करून घेतल्यास शहराची पाणीपुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार     आहे.योजना झाली, पण...धरणगाव शहराला १४ कोटींची पाणीपुरवठा योजना १९९८ ला मंजूर झाली होती. या योजनेच्या कामाला १७-१८ वर्षे लोटली गेली. योजना पूर्ण होऊन शहराला पाणीही मिळाले. मात्र ‘जलशुद्धीकरण’ केंद्राचे काम अद्याप रखडलेलेच आहे. तापी योजनेचे अशुद्ध पाणी शहरवासीयांना जादा झोनमुळे १० दिवसाआड मिळत आहे.जलवाहिन्या बदलणे हा एकच पर्याय शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी या योजनेंतर्गत नागपूर येथील ए.डी.सी.सी. कंपनीतर्फे नवीन जलवाहिन्या टाकण्यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे. या सर्व्हेचा डीपीआर कंपनीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविला असून, जीवन प्राधिकरण इस्टिमेट तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तरच शहरातील पाणी समस्या दूर होणार आहे. यासाठी मतदारसंघाचे मंत्री गुलाबराव पाटील, शहराचे नूतन नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन व सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. (वार्ताहर)लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून वाढले उपझोन४पूर्वी धरणगाव शहरात पाच झोनद्वारे पाणीपुरवठा होत असे. कालांतराने पाच झोनचे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव उपझोन वाढत गेले अन् वाढता वाढता पन्नासवर उपझोन झाले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ४एक झोन व त्याच्या उपझोनला पाणीपुरवठा करण्यास दोन दिवस लागत असल्याने रोटेशन फिरता फिरता १० दिवस उलटून जातात. त्यामुळे शहरवासीयांना १० दिवसाआड पाणी मिळत आहे.४झोन वाढल्यामुळे शहरवासीयांना पाणी मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. अजून फेब्रुवारी सुरू आहे. एप्रिल-मे महिना काढायचा आहे, तेव्हा काय हाल होतील या चिंतेत नागरिक आहेत.धरणगाव शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलविण्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत.           राज्याचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. जेणेकरून धरणगाववासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करून         देण्याचे आमचे प्रयत्न               आहेत.-सलीम पटेल, नगराध्यक्ष, धरणगाव