शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

सात्री गावाला पाण्याचा वेढा : २० दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 21:34 IST

रेशनसह मूलभूत सुविधा रखडल्या

अमळनेर : तापी, बोरी आणि चिखली या नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या सात्री गावाचा तालुक्यापासून संपर्क २० दिवसांपासून तुटला आहे. गावात जाण्यासाठी नदी ओलांडायला पूल नसल्याने मूलभूत सुविधा ठप्प झाल्या आहेत. वेळेवर उपचाराअभावी येथील एक मजुराचा पाय कापावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तालुक्यात १०७ टक्के पाऊस झाला असून तापी, बोरी आणि चिखली नदीला पूर आला आहे. तालुक्याच्या उत्तरेला तिन्ही नद्यांच्या खोºयात असलेले सात्री हे ९०० लोकसंख्येचे गाव. या गावाला नदी पार करण्यासाठी साधा पूल झालेला नाही. परिणामी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या २० दिवसांपासून सात्री गावाला पाडळसरे धरणाच्या तापी नदीचे बॅक वॉटर, बोरी आणि चिखली नदीच्या पाण्याने वेढा पडला आहे. ग्रामस्थांना थोडे पाणी कमी होताच पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. मात्र बोरी नदीला दररोज पूर कमी जास्त होत असल्याने यावर्षी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत गाव जाहीर झाल्याने या गावचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गावाला १० वर्षांपासून विकास निधी बंद झाला.दरवर्षी गावकरी लोकसहभागातून नदीपात्रात एसटी येण्यासाठी व शेतमाल वाहून नेण्यासाठी माती टाकून कच्चा रस्ता तयार केला जातो. पण यासाठी शासनाने एक रुपयादेखील दिलेला नाही, असे जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी सांगितले.सध्या डांगरी गावापर्यंत बस येत असून पाण्याचा उतार पडला की काही लोक धाडस करून पाण्यातून ये-जा करतात. मात्र जुन्या गावापासून रस्ता २ किमी अंतरावर आहे. चिखल, नाल्या-ओढ्यांना पार करीत जावे लागते. सातत्याने शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने गाव मागासलेले राहिले आहे.उपचाराअभावी पाय गेलासात्री येथील ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील हा मजुरीसाठी डांगरी येथे गेला होता. नदीपात्रातून येताना त्याच्या पायाला काटा टोचल्याने तो जखमी झाला. तसेच वेळेवर उपचार घेऊ शकला नाही. जखमेला बराच वेळ उलटल्याने त्याला गँगरीन झाले.