शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

सात्री गावाला पाण्याचा वेढा : २० दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 21:34 IST

रेशनसह मूलभूत सुविधा रखडल्या

अमळनेर : तापी, बोरी आणि चिखली या नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या सात्री गावाचा तालुक्यापासून संपर्क २० दिवसांपासून तुटला आहे. गावात जाण्यासाठी नदी ओलांडायला पूल नसल्याने मूलभूत सुविधा ठप्प झाल्या आहेत. वेळेवर उपचाराअभावी येथील एक मजुराचा पाय कापावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तालुक्यात १०७ टक्के पाऊस झाला असून तापी, बोरी आणि चिखली नदीला पूर आला आहे. तालुक्याच्या उत्तरेला तिन्ही नद्यांच्या खोºयात असलेले सात्री हे ९०० लोकसंख्येचे गाव. या गावाला नदी पार करण्यासाठी साधा पूल झालेला नाही. परिणामी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या २० दिवसांपासून सात्री गावाला पाडळसरे धरणाच्या तापी नदीचे बॅक वॉटर, बोरी आणि चिखली नदीच्या पाण्याने वेढा पडला आहे. ग्रामस्थांना थोडे पाणी कमी होताच पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. मात्र बोरी नदीला दररोज पूर कमी जास्त होत असल्याने यावर्षी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत गाव जाहीर झाल्याने या गावचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गावाला १० वर्षांपासून विकास निधी बंद झाला.दरवर्षी गावकरी लोकसहभागातून नदीपात्रात एसटी येण्यासाठी व शेतमाल वाहून नेण्यासाठी माती टाकून कच्चा रस्ता तयार केला जातो. पण यासाठी शासनाने एक रुपयादेखील दिलेला नाही, असे जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी सांगितले.सध्या डांगरी गावापर्यंत बस येत असून पाण्याचा उतार पडला की काही लोक धाडस करून पाण्यातून ये-जा करतात. मात्र जुन्या गावापासून रस्ता २ किमी अंतरावर आहे. चिखल, नाल्या-ओढ्यांना पार करीत जावे लागते. सातत्याने शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने गाव मागासलेले राहिले आहे.उपचाराअभावी पाय गेलासात्री येथील ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील हा मजुरीसाठी डांगरी येथे गेला होता. नदीपात्रातून येताना त्याच्या पायाला काटा टोचल्याने तो जखमी झाला. तसेच वेळेवर उपचार घेऊ शकला नाही. जखमेला बराच वेळ उलटल्याने त्याला गँगरीन झाले.