शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर शहरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:41 IST

पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

ठळक मुद्देजॅकवेल उघड्या पडल्याचा परिणामशहराच्या पाणीपुरवठ्याला फटकादोन-तीन दिवसाआड होणार पाणीपुरवठाकूपनलिकांचे पाणीही उतरले

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. काही भागात अपूर्ण पाणीपुरवठा होत असून, संभाव्य टंचाई लक्षात घेता शहरात दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची दवंडी नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.दुसरीकडे संभाव्य टंचाईस तोंड देण्यासाठी दोन विहिरी अधिग्रहित करणयात आल्या आहेत तर शहरात ३४ हातपंप करण्यात येणार असून बुधवारी जळगाव भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे दोन पथक शहरात दाखल झाले आहे. या पथका कडून पाहणी अंती हातपंप करण्या साठी संभाव्य ठिकाणे शोधून दिली जाणार आहे. पथकाने ठरवून दिलेल्या ठिकाणावर हातपंप केले जाणार आहेत.पूर्णा नदीचा विस्तीर्ण जलसाठा असूनही ‘पाणी उशाशी आणि कोरडा घशाशी’ अशी अवस्था शहरात दर वर्षी उन्हाळ्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक दृष्ट्या नियोजनातील अभावामुळे उन्हाळा व पावसाळ्यात शहराला कृत्रिम पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. आजही शहरात पूर्णा नदी सह अन्य ४ ठिकाणच्या विहिरी अशा पाचपेक्षा अधिक उद्भवावरून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काळात तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण पाणीपुरवठा योजना झाली असती तर दरवर्षी येणारे टंचाई संकट टळले असते.दरम्यान, यंदा पूर्णा पत्रातील जलपातळी झपाट्याने खालावली असून, नदी पात्रात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या सर्वच जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. दर वर्षी नदीपात्रात गाळ मोठ्या प्रमाणात वाढत असून विस्तीर्ण पत्रात पाणी उथळ अवस्थेत आले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. अशात हतनूर धरणातून आवर्तन सोडल्याने पाणी पातळी चिंताजनक स्तरावर घसरली आहे. यातून विहिरींचे जलस्तर प्रचंड खालवले असून शेती शिवारासह गावातील विहिरी टप्प्यावर आल्या आहेत. तसेच कूपनलिकांचे पाणीही उतरले आहे. शहरात अनेक खासगी घरगुती कूपनलिका पाणी उतरल्याने बंद पडल्या आहेत.शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपंचायती च्या वतीने करण्यात आहे. नळांना तोट्या बसवियाचे आवाहनही नगरपंचायतीने केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर