शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर शहरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:41 IST

पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

ठळक मुद्देजॅकवेल उघड्या पडल्याचा परिणामशहराच्या पाणीपुरवठ्याला फटकादोन-तीन दिवसाआड होणार पाणीपुरवठाकूपनलिकांचे पाणीही उतरले

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. काही भागात अपूर्ण पाणीपुरवठा होत असून, संभाव्य टंचाई लक्षात घेता शहरात दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची दवंडी नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.दुसरीकडे संभाव्य टंचाईस तोंड देण्यासाठी दोन विहिरी अधिग्रहित करणयात आल्या आहेत तर शहरात ३४ हातपंप करण्यात येणार असून बुधवारी जळगाव भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे दोन पथक शहरात दाखल झाले आहे. या पथका कडून पाहणी अंती हातपंप करण्या साठी संभाव्य ठिकाणे शोधून दिली जाणार आहे. पथकाने ठरवून दिलेल्या ठिकाणावर हातपंप केले जाणार आहेत.पूर्णा नदीचा विस्तीर्ण जलसाठा असूनही ‘पाणी उशाशी आणि कोरडा घशाशी’ अशी अवस्था शहरात दर वर्षी उन्हाळ्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक दृष्ट्या नियोजनातील अभावामुळे उन्हाळा व पावसाळ्यात शहराला कृत्रिम पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. आजही शहरात पूर्णा नदी सह अन्य ४ ठिकाणच्या विहिरी अशा पाचपेक्षा अधिक उद्भवावरून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काळात तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण पाणीपुरवठा योजना झाली असती तर दरवर्षी येणारे टंचाई संकट टळले असते.दरम्यान, यंदा पूर्णा पत्रातील जलपातळी झपाट्याने खालावली असून, नदी पात्रात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या सर्वच जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. दर वर्षी नदीपात्रात गाळ मोठ्या प्रमाणात वाढत असून विस्तीर्ण पत्रात पाणी उथळ अवस्थेत आले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. अशात हतनूर धरणातून आवर्तन सोडल्याने पाणी पातळी चिंताजनक स्तरावर घसरली आहे. यातून विहिरींचे जलस्तर प्रचंड खालवले असून शेती शिवारासह गावातील विहिरी टप्प्यावर आल्या आहेत. तसेच कूपनलिकांचे पाणीही उतरले आहे. शहरात अनेक खासगी घरगुती कूपनलिका पाणी उतरल्याने बंद पडल्या आहेत.शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपंचायती च्या वतीने करण्यात आहे. नळांना तोट्या बसवियाचे आवाहनही नगरपंचायतीने केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर