शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील मळगाव येथे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 20:10 IST

भडगाव तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संतापउपाययोजनेकामी प्रशासनाचे दुर्लक्षछोटेसे अन् तालुक्याच्या सीमेवरचे दुर्लक्षित गाव

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहीर खोलीकरण, आडवे बोअर करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे दिला आहे. पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावे, अशी सातत्याने मागणी करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रशासनाने तत्काळ पाणीटंचाईवर उपाय योजनाकामी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे त्वरित खोलीकरण काम करणे, विहिरीत आडवे बोअर करणे, दिवसातून पाण्याचे दोन टँकर पिण्यासाठी तत्काळ सुरु करावे, अशी रास्त मागणी मळगाव ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकातून होत आहे.भडगाव तालुक्यातील मळगाव हे छोटेसे अन् तालुक्याच्या सीमेवरचे दुर्लक्षित गाव. गावाचा परिसर बरड अन कोरडवाहू क्षेत्रात, डोंगर परिसरात वसले आहे. त्यामुळे गावाचे क्षेत्र अवर्षण प्रवर्षण भागात येते. पाण्याचे दोन पाझर तलाव आहेत. या पाझर तलावाच्या पाण्यावरच गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस कमी होतो. त्यात पाझर तलावात थोडेफार पाणी साचते तेही खडकाळ व मुरुमाचा परिसर असल्याने पाझर तलावातून पाणी पाझरुन जाते. पाझर तलावात पाणी नसल्याने पाझर तलाव कोरडाठाक बनल्याचे संकटमय चित्र आहे. पाण्याचे साधन नसल्याने गावाला नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर पाझर तलावाजवळ आहे. मात्र पाझर तलावच कोरडा पडला आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर आटत आहे. विहिरीची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहीर कोरडे पडण्याचे संकट समोर उभे आहे.पाणीटंचाईची स्थिती पाहता ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे कामाचे व आडवे, उभे बोअर टाकणे आदी कामांचा प्रस्ताव पंचायत समिती, पाचोरा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आदींकडे दिला आहे. मात्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी प्रयत्न करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? याबाबत नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकर तत्काळ सुरू करण्याचीही मागणी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे जिल्हाधिकारी, भडगावचे नूतन तहसीलदार गणेश मरकड, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी गावाला भेट देवून तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गिरणा नदीवरुन मळगावासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव टाकला आहे. तोही वाºयावर आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाचोरा यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकातून होताना दिसत आहे.गावाला सध्या १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जेमतेम पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना वणवण भटकंती करीत करावा लागत आहे. नागरिकांसह जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच गहन बनत आहे. गावातील छोटे आड कोरडे पडले. कोरडवाहू, डोंंगराळ भाग असल्याने रानावनातील विहिरीही कोरड्या पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे भटकंती करुनही पाणी मिळत नाही. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचीही पाणी पातळी खोलवर गेली आहे. वाढत्या तापमानाची स्थिती पाहता विहीर कोरडी पडण्याच्या वाटेवर आहे. टँकरसाठी पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिक गिरणा काठावर पाणी मिळेल का पाणी यासाठी शेतकºयांना भेटताना दिसत आहेत. तरी पाणी मिळत नाही. पुढे पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या पाणी प्रश्नाचे कसे होईल, जनावरे चारा व पाणीटंचाईत कशी पोसावीत, अशी चिंता नागरि सतावत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. यामुळे ो नाराजीचा सुर उमटत आहे. यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा विहीर खोलीकरण, आडवे व उभे बोअर करणे कामास तत्काळ मंजुरी द्यावी. गावासाठी दोन पाण्याचे टँकर सुरू करावेत. पाणी प्रश्न सोडविण्यास मदत करावी, अशी मागणी मळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांसह नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव