शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

भडगाव तालुक्यातील मळगाव येथे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 20:10 IST

भडगाव तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संतापउपाययोजनेकामी प्रशासनाचे दुर्लक्षछोटेसे अन् तालुक्याच्या सीमेवरचे दुर्लक्षित गाव

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहीर खोलीकरण, आडवे बोअर करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे दिला आहे. पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावे, अशी सातत्याने मागणी करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रशासनाने तत्काळ पाणीटंचाईवर उपाय योजनाकामी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे त्वरित खोलीकरण काम करणे, विहिरीत आडवे बोअर करणे, दिवसातून पाण्याचे दोन टँकर पिण्यासाठी तत्काळ सुरु करावे, अशी रास्त मागणी मळगाव ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकातून होत आहे.भडगाव तालुक्यातील मळगाव हे छोटेसे अन् तालुक्याच्या सीमेवरचे दुर्लक्षित गाव. गावाचा परिसर बरड अन कोरडवाहू क्षेत्रात, डोंगर परिसरात वसले आहे. त्यामुळे गावाचे क्षेत्र अवर्षण प्रवर्षण भागात येते. पाण्याचे दोन पाझर तलाव आहेत. या पाझर तलावाच्या पाण्यावरच गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस कमी होतो. त्यात पाझर तलावात थोडेफार पाणी साचते तेही खडकाळ व मुरुमाचा परिसर असल्याने पाझर तलावातून पाणी पाझरुन जाते. पाझर तलावात पाणी नसल्याने पाझर तलाव कोरडाठाक बनल्याचे संकटमय चित्र आहे. पाण्याचे साधन नसल्याने गावाला नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर पाझर तलावाजवळ आहे. मात्र पाझर तलावच कोरडा पडला आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर आटत आहे. विहिरीची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहीर कोरडे पडण्याचे संकट समोर उभे आहे.पाणीटंचाईची स्थिती पाहता ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे कामाचे व आडवे, उभे बोअर टाकणे आदी कामांचा प्रस्ताव पंचायत समिती, पाचोरा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आदींकडे दिला आहे. मात्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी प्रयत्न करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? याबाबत नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकर तत्काळ सुरू करण्याचीही मागणी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे जिल्हाधिकारी, भडगावचे नूतन तहसीलदार गणेश मरकड, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी गावाला भेट देवून तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गिरणा नदीवरुन मळगावासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव टाकला आहे. तोही वाºयावर आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाचोरा यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकातून होताना दिसत आहे.गावाला सध्या १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जेमतेम पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना वणवण भटकंती करीत करावा लागत आहे. नागरिकांसह जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच गहन बनत आहे. गावातील छोटे आड कोरडे पडले. कोरडवाहू, डोंंगराळ भाग असल्याने रानावनातील विहिरीही कोरड्या पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे भटकंती करुनही पाणी मिळत नाही. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचीही पाणी पातळी खोलवर गेली आहे. वाढत्या तापमानाची स्थिती पाहता विहीर कोरडी पडण्याच्या वाटेवर आहे. टँकरसाठी पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिक गिरणा काठावर पाणी मिळेल का पाणी यासाठी शेतकºयांना भेटताना दिसत आहेत. तरी पाणी मिळत नाही. पुढे पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या पाणी प्रश्नाचे कसे होईल, जनावरे चारा व पाणीटंचाईत कशी पोसावीत, अशी चिंता नागरि सतावत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. यामुळे ो नाराजीचा सुर उमटत आहे. यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा विहीर खोलीकरण, आडवे व उभे बोअर करणे कामास तत्काळ मंजुरी द्यावी. गावासाठी दोन पाण्याचे टँकर सुरू करावेत. पाणी प्रश्न सोडविण्यास मदत करावी, अशी मागणी मळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांसह नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव