शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पाण्याचा निचरा होण्यासाठी बोगदा न केल्याने शेतकऱ्यांच्या शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दळणवळणाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने शिरसोलीच्या पुढे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दळणवळणाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने शिरसोलीच्या पुढे दापोरा शिवारात पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा न उभारल्याने रविवारी झालेल्या पावसाचे सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऐन हंगामात आता पीकपाणी कसे घ्यायचे, असा प्रश्न येथील शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा शिरसोलीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाला आहे. शिरसोलीच्या पुढे तिसरा मार्ग उभारण्यासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रेल्वे प्रशासनातर्फे या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शेतातील पाण्याचा निचरा होणारा जुना बोगदा बुजवून त्या ठिकाणी पुन्हा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी रूळ टाकल्यानंतर नवीन बोगदा मात्र उभारलाच नाही. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार ना बोगदा नसल्यामुळे हे पाणी शेतातच तुंबत आहे.

इन्फो :

पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतात तुंबले पाणी

रविवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याला शेतातून बाहेर पडायला जागाच नसल्यामुळे हे पाणी शेतातच तुंबले होते. यामुळे पुंडलिक सुरवाडे, नाना गवंदे, बापू गवंदे, बापू मराठे, माणिक गवंदे या शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतातील दोन ते तीन एकरचा भाग या पाण्याखाली आला आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकरी बांधवांनी टाकलेली खते या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आता पिकांची पेरणी करता येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे यंदा शेती कशी करायची, असा प्रश्न या शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याचीही मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

इन्फो :

तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांगूनसुद्धा, शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार किंवा बोगदा तयार केलेला नाही. पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरत आहे, त्यामुळे आता शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.

गोपाळ काळे, शेतकरी

तिसरी रेल्वेलाइन टाकताना संबंधित ठेकेदाराने पूर्वीचा या ठिकाणी असलेला बोगदा बुजविला आहे. मात्र, तिसऱ्या लाइनचे काम झाल्यानंतर अद्यापही बोगदा न केल्यामुळे या पाण्याला बाहेर पडायला जागा राहिलेली नाही. या सर्व प्रकाराला ठेकेदार जबाबदार असून, त्याच्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाई करायला हवी.

गोकुळ तांदळे, शेतकरी

तिसऱ्या रेल्वे मार्गावरील दापोरा शिवारातील नेमक्या कुठल्या ठिकाणी शेतात पाणी जात आहे, याची अद्याप तक्रार आलेली नाही. याबाबत माहिती घेऊन, योग्य ती उपाययोजना करतो.

पंकज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग