शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पाण्याचा निचरा होण्यासाठी बोगदा न केल्याने शेतकऱ्यांच्या शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दळणवळणाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने शिरसोलीच्या पुढे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दळणवळणाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने शिरसोलीच्या पुढे दापोरा शिवारात पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा न उभारल्याने रविवारी झालेल्या पावसाचे सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऐन हंगामात आता पीकपाणी कसे घ्यायचे, असा प्रश्न येथील शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा शिरसोलीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाला आहे. शिरसोलीच्या पुढे तिसरा मार्ग उभारण्यासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रेल्वे प्रशासनातर्फे या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शेतातील पाण्याचा निचरा होणारा जुना बोगदा बुजवून त्या ठिकाणी पुन्हा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी रूळ टाकल्यानंतर नवीन बोगदा मात्र उभारलाच नाही. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार ना बोगदा नसल्यामुळे हे पाणी शेतातच तुंबत आहे.

इन्फो :

पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतात तुंबले पाणी

रविवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याला शेतातून बाहेर पडायला जागाच नसल्यामुळे हे पाणी शेतातच तुंबले होते. यामुळे पुंडलिक सुरवाडे, नाना गवंदे, बापू गवंदे, बापू मराठे, माणिक गवंदे या शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतातील दोन ते तीन एकरचा भाग या पाण्याखाली आला आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकरी बांधवांनी टाकलेली खते या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आता पिकांची पेरणी करता येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे यंदा शेती कशी करायची, असा प्रश्न या शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याचीही मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

इन्फो :

तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांगूनसुद्धा, शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार किंवा बोगदा तयार केलेला नाही. पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरत आहे, त्यामुळे आता शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.

गोपाळ काळे, शेतकरी

तिसरी रेल्वेलाइन टाकताना संबंधित ठेकेदाराने पूर्वीचा या ठिकाणी असलेला बोगदा बुजविला आहे. मात्र, तिसऱ्या लाइनचे काम झाल्यानंतर अद्यापही बोगदा न केल्यामुळे या पाण्याला बाहेर पडायला जागा राहिलेली नाही. या सर्व प्रकाराला ठेकेदार जबाबदार असून, त्याच्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाई करायला हवी.

गोकुळ तांदळे, शेतकरी

तिसऱ्या रेल्वे मार्गावरील दापोरा शिवारातील नेमक्या कुठल्या ठिकाणी शेतात पाणी जात आहे, याची अद्याप तक्रार आलेली नाही. याबाबत माहिती घेऊन, योग्य ती उपाययोजना करतो.

पंकज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग