शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

वाढत्या तापमानातही वृक्षारोपण केलेल्या रोपांना देतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:28 IST

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.

ठळक मुद्देसावखेडा येथील युवकांचा पर्यावरण पूरक उपक्रमएकता नवयुवक मंडळातील तरुण रोपांना देतात बाटल्यांद्वारे पाणी

योगेश सैतवाल  सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.येथील एकता नवयुवक मंडळातील २५ ते ३० तरुणांनी गेल्या वर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी सुमारे ३०० रोपांचे वृक्षारोपण केले होते. तेव्हापासून या तरुणांनी या वृक्षारोपण केलेल्या झाडांकडे लक्ष देऊन त्यातली काही रोपे जगवली. मे महिन्यातील वाढत्या तापमानातही या तरुण मंडळी टाकाऊ, रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून या रोपट्यांना पाणी पुरवत आहे. त्या अनुषंगाने ही तरुण मंडळी टाकाऊ पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यात पाणी भरून आठ ते दहा दिवसांनी त्या झाडांजवळ ठेवत आहे. जेणेकरून या झाडांभोवती ओलावा टिकून राहील व झाडे नष्ट होणार नाही. तसेच आठ ते दहा दिवसांनी ट्रॅक्टरद्वारे सातपुडा पायथ्याशी जाऊन झाडांना पाणी देत आहेत.खºया अर्थाने सावखेडा येथील नवयुवक तरुण मंडळांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केल्याने समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्या अनुषंगाने ही २५-३० युवक मंडळी आठ ते दहा दिवसांनी एकत्र येऊन ट्रॅक्टरद्वारे टाक्यांमधून पाणी नेऊन रानातील या झाडांना पाणी पुरवत आहेत.या तरुणांमध्ये गोपाळ पाटील, नीलेश महाजन, चेतन चौधरी, प्रफुल महाजन, पवन महाजन, हर्षल बढे, प्रांजल महाजन, नीलेश पाटील, रुपेश चौधरी, गौरव महाजन, निखिल महाजन, डालू महाजन, रुपाल महाजन, जयेश बढे, धीरज महाजन, मयूर महाजन, मयूर बढे, अमित महाजन, कल्पेश महाजन, देवेंद्र महाजन व अन्य तरुण मंडळींचा समावेश आहेतसेच गावांमधील इतर तरुणांनीदेखील या तरुणांचा आदर्श घेऊन ‘झाडे लावा - झाडे जगवा व त्यांचे संगोपन करा’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक देश घडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :environmentवातावरणRaverरावेर