शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील पाणीयोजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 20:33 IST

प्रमोद पाटील कासोदा, ता. एरंडोल , जि.जळगाव : येथे सुमारे वर्षभरापूर्वी ११ कोटी रुपये खर्चाची कायमस्वरूपी योजना मंजूर झालेली ...

ठळक मुद्देएक वर्षापूर्वीच मंजूर पाणी योजनेला मुहूर्त कधी मिळणारपाण्याविना नागरिकांचे हालकाम का रेंगाळले : कासोदेकरांना पडलेला प्रश्न

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे सुमारे वर्षभरापूर्वी ११ कोटी रुपये खर्चाची कायमस्वरूपी योजना मंजूर झालेली आहे, परंतु हे काम का रेंगाळले आहे, या योजनेतून गावाला कधी पाणीपुरवठा होईल याबाबत गावकऱ्यांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. यंदा तर दुष्काळाच्या झळा तीव्र होणार आहेत,त्यामुळे प्रशासनाने या योजनेला आतापासूनच गती द्यावी, अशी मागणी होत आहे.कासोदा गावापासून अंजनी धरणापर्यंतही पाईप लाईन येणार आहे. धरण परिसरात तीन विहिरी असून १० इंची पाईपलाईनद्वारा कासोदा ग्रामपंचायतीजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहे. पूर्ण गावात नव्याने पाईपलाईन होणार आहे. त्यामुळे आपल्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल ही तमाम गावकºयांची स्वप्न आहेत. पण ती कधी प्रत्यक्षात साकार होईल या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी दिसत नाही, अशीदेखील चर्चा आहे.सन १९९० सालापासून हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी कायम चर्चेत आहे. घरात गरजेच्या सामानापेक्षा पिण्याच्या पाण्याची साठवणूक करणारी भांडी जास्त असतात, अशी परिस्थिती आहे. एकदा जर नळाला पाणी आले तर ते किमान आठ ते दहा दिवस साठवून ठेवावे लागते, कधी वीज बिलामुळे तर कधी पाईप लाईन फुटल्यावर जर नियमित पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला तर १५ ते २० दिवसांनंतरदेखील पाणी मिळते, ज्या गावात पाणीटंचाई जास्त असेल त्या सगळ्याच गावापेक्षा येथील नागरिकांनी पाणीटंचाईचे जास्त चटके सोसले आहेत. सहनशिलता पण गावकºयांची वाढली आहे. पण आता आशेचा किरण दिसतो आहे. कायमस्वरूपी पाणीटंचाईपासून मुक्तता मिळाली. मिळणारी योजना मंजूर आहे पण काम कासव गतीने सुरू असल्याने हे काम कधी पूर्ण होईल याकडे गावकºयांचे लक्ष लागून आहे.कासोदा ते एरंडोल रस्त्यावरील अंजनी धरणापर्यंत सुमारे सात-आठ किलोमीटर अंतरावर पाईप टाकून पडले आहेत. १० इंची हे पाईप आहेत. गावाची हल्ली ४० हजारावर लोकसंख्या आहे. गाव झपाट्याने वाढत आहे. पुढील दहा-पंधरा वर्षात ही लोकसंख्या आणखी वाढणार आहे. एकदा झालेली योजना पुन्हा पुन्हा होत नाही. कालांतराने या योजनेतील पाणी गावासाठी अपूर्ण पडू नये, यासाठी हे पाईप जास्त मोठ्या व्यासाचे असायला हवे होते, अशीदेखील काही जाणकारांकडून चर्चा होत आहे. दरम्यान, कासोदा सरपंचाशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.-पैसा आहे, इतर कुठलीच तांत्रिक अडचण नाही, एक वर्षापूर्वीच योजना मंजूर आहे, आतापर्यंत काम पूर्ण झाले पाहिजे होते. पण काय अडचण येते आहे हे माहीत नाही, कोण शुक्राचार्य आडवा येतो आहे यासाठी आम सभेतदेखील हा विषय घेतला होता. लक्षवेधी व कपात सूचनेद्वारे याविषयाचे गांभीर्य सभागृहात मांडले आहे.गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी सोळागाव योजनेचे ३५ लाख रुपये जिल्हा परिषदेने तातडीने दिले असते, तर इतके दिवस वीज कपात झाली नसती, पर्यायाने जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते. आमदाराने जरी गाव दत्तक घेतले असले तरी ते घरून वीज बिल भरणार नाहीत. कासोद्यासाठी तातडीची योजना स्वत: एक लाख रुपये खर्च करून सुरू करून घेतली होती, हे गावकºयांना चांगले माहीत आहे.-आमदार डॉ.सतीश पाटीलदिवाळी ची सुटी होती, पण आता काम सुरू झाले आहे. ठेकेदाराने जास्त विलंब केला तर मुंबईत जावून मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे हे गाºहाणे मांडणार आहे. गावाला पाणीटंचाई जाणवू नये यासाठी सोागाव योजनेचे जिल्हा परिषदने वीज बिल भरले आहे. १६ लाख रुपये पाईप लाईन दुरूस्ती, लिकेज काढणे व जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी दिले आहे. अभियंता नरवाडे यांना या पाईपलाईनची दुरूस्ती व लिकेजची पाहणी करण्यासाठी पाठवणार आहे. ग्रामपंचायतने योग्य नियोजन केल्यास कायमस्वरूपी योजना सुरू होईपर्यंत सोळागाव योजनेचे पाणी गावाला अपूर्ण पडणार नाही.-उज्ज्वला पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, जळगावकाम संथ गतीने सुरू आहे. तीन विहिरींचे काम ९० टक्के झाले आहे. पाईप येवून पडले आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आर्किटेक्टकडून डिझाईन येणार आहे, ते आल्यावर काम सुरू होईल, पण ठेकेदाराला मार्च २०२० ही मुदत असल्याने तो मुदतीच्या आत काम पूर्ण करणार आहे.-बी.जे.पाटील, उपअभियंता, जीवन प्राधिकरण. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल