शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

तोंडापूर धरणातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांकडून पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 18:29 IST

जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पिकांना पाणी देण्याचा उद्योग काही शेतकºयांनी सुरू केला असून अधिकारी, कर्मचाºयांनी मात्र डोळ्यांवर कातडे पांघरले आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधरणाच्या भिंतीला गुपचूपपणे पाडले भगदाडतोंडापूर धरणातून होतो अजिंठा लेणीला पाणी पुरवठा.धरणात केवळ नऊ टक्के जलसाठा शिल्लक.

लोकमत आॅनलाईनतोंडापूर ता. जामनेर, दि.२० : मे महिन्यातील कडक ऊन आणि त्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या संपूर्ण जिल्ह्यात भेडसावत आहे. पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण जनता वणवण भटकत आहे, अशा कठीण वातावरणात तोंडापूर येथील काही शेतकºयांना मात्र आपली पिके वाचविण्याची फिकीर पडली आहे. त्यासाठी त्यांनी तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पाणी चोरण्याचा संतापजनक प्रकार निदर्शनास आला आहे. तथापि धरणावरील अधिकारी आणि कर्मचाºयांनी याबाबत डोळ्यांवर कातडे पांघरल्यामुळे बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु आहे.तोंडापूर तेथील मध्यम प्रकल्पात सद्या मृतसाठा सोडून केवळ नऊच टक्के जलसाठा शिल्लक असतांना दहा ते पंधरा शेतकºयांकडून पाईपलाईन टाकून धरणातून पाणी उचलून त्याचा वापर शेतीसाठी सुरू केला आहे. धरणाच्या पाण्यात विद्युत पंप (पाणबुडी) बसवून आणि कोणाच्याही नजरेस पडू नये म्हणून पाईप व वायर जमीनीत गाडून पाणी चोरण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि राजरोसपणे सुरू असलेल्या या पाणी चोरीकडे शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.अजिंठा लेणीसाठी याच धरणातून राखीव असलेल्या साठ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो. तर तोंडापूर गावात सद्या पाण्याची भीषण समस्या असतांना गावातीलच दहा ते पंधरा शेतकºयांनी धरणाची सहजासहजी नजरेस येणार नाही, अशा ठिकाणी भिंत फोडून पाईपलाईन केल्याचे निदर्शनास आले.पगारी कर्मचाºयांकडून दूर्लक्षशासनाने या धरणाच्या निगराणीसाठी तीन कर्मचाºयांना पगारी नियुक्त केले असले तरी हे कर्मचारी धरणाकडे फिरकूनही पाहत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.दरम्यान, या पाणी चोरीबाबत सिंचन विभागाचे कर्मचारी शंकर निकम यांच्याशी संपर्क साधला असता शेतकºयाने फक्त पाइपलाईन धरणात नेली आहे. त्याने मोटार बसविल्यास कारवाई करु असे सांगून जुन्या शेतकºयांना परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.म्हणे कारवाई करू, पण केव्हा...?सिंचन शाखेचे अधिकारी चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नविन पाईपलाईन टाकणाºयांना आम्ही नोटीस दिली आहे. त्यांनी वेळेत पाइप न काढल्यास आम्ही स्वत: काढून फेकू. तसेच जुन्या विद्युत पंपाचे पंचनामे केले असून शेतकºयांनी ते वेळेत न काढल्यास विद्युत पंपदेखील जप्त केले जातील. याबाबत तोंडापूरचे सरपंच प्रकाश सपकाळ यांना दोनवेळा फोनवर संपर्क केला असता त्यांनी फोनच उचलला नाही. 

टॅग्स :Waterपाणी