शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

तोंडापूर धरणातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांकडून पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 18:29 IST

जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पिकांना पाणी देण्याचा उद्योग काही शेतकºयांनी सुरू केला असून अधिकारी, कर्मचाºयांनी मात्र डोळ्यांवर कातडे पांघरले आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधरणाच्या भिंतीला गुपचूपपणे पाडले भगदाडतोंडापूर धरणातून होतो अजिंठा लेणीला पाणी पुरवठा.धरणात केवळ नऊ टक्के जलसाठा शिल्लक.

लोकमत आॅनलाईनतोंडापूर ता. जामनेर, दि.२० : मे महिन्यातील कडक ऊन आणि त्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या संपूर्ण जिल्ह्यात भेडसावत आहे. पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण जनता वणवण भटकत आहे, अशा कठीण वातावरणात तोंडापूर येथील काही शेतकºयांना मात्र आपली पिके वाचविण्याची फिकीर पडली आहे. त्यासाठी त्यांनी तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पाणी चोरण्याचा संतापजनक प्रकार निदर्शनास आला आहे. तथापि धरणावरील अधिकारी आणि कर्मचाºयांनी याबाबत डोळ्यांवर कातडे पांघरल्यामुळे बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु आहे.तोंडापूर तेथील मध्यम प्रकल्पात सद्या मृतसाठा सोडून केवळ नऊच टक्के जलसाठा शिल्लक असतांना दहा ते पंधरा शेतकºयांकडून पाईपलाईन टाकून धरणातून पाणी उचलून त्याचा वापर शेतीसाठी सुरू केला आहे. धरणाच्या पाण्यात विद्युत पंप (पाणबुडी) बसवून आणि कोणाच्याही नजरेस पडू नये म्हणून पाईप व वायर जमीनीत गाडून पाणी चोरण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि राजरोसपणे सुरू असलेल्या या पाणी चोरीकडे शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.अजिंठा लेणीसाठी याच धरणातून राखीव असलेल्या साठ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो. तर तोंडापूर गावात सद्या पाण्याची भीषण समस्या असतांना गावातीलच दहा ते पंधरा शेतकºयांनी धरणाची सहजासहजी नजरेस येणार नाही, अशा ठिकाणी भिंत फोडून पाईपलाईन केल्याचे निदर्शनास आले.पगारी कर्मचाºयांकडून दूर्लक्षशासनाने या धरणाच्या निगराणीसाठी तीन कर्मचाºयांना पगारी नियुक्त केले असले तरी हे कर्मचारी धरणाकडे फिरकूनही पाहत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.दरम्यान, या पाणी चोरीबाबत सिंचन विभागाचे कर्मचारी शंकर निकम यांच्याशी संपर्क साधला असता शेतकºयाने फक्त पाइपलाईन धरणात नेली आहे. त्याने मोटार बसविल्यास कारवाई करु असे सांगून जुन्या शेतकºयांना परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.म्हणे कारवाई करू, पण केव्हा...?सिंचन शाखेचे अधिकारी चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नविन पाईपलाईन टाकणाºयांना आम्ही नोटीस दिली आहे. त्यांनी वेळेत पाइप न काढल्यास आम्ही स्वत: काढून फेकू. तसेच जुन्या विद्युत पंपाचे पंचनामे केले असून शेतकºयांनी ते वेळेत न काढल्यास विद्युत पंपदेखील जप्त केले जातील. याबाबत तोंडापूरचे सरपंच प्रकाश सपकाळ यांना दोनवेळा फोनवर संपर्क केला असता त्यांनी फोनच उचलला नाही. 

टॅग्स :Waterपाणी