शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:41 IST

गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत्तमंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडूंब भरला.

ठळक मुद्देहातपंपाचे काम तत्काळ व चांगले केल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे सत्कारकौतुकास्पद : गुरांच्या पाण्याची सोय झाल्याने पशुपालकांमध्ये समाधानग्रामस्थांची सहनशिलतातहसीलदारांनी भर उन्हात गाठले कळमसरे गाव

घनश्यामदास टाककळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत्तमंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडूंब भरला. हाळात पाणी पाहून गुरंढोरं दूरवरूनच सैरावैरा धावू लागली अन पशुपालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला.गावात पाणीटंचाई असल्याने नागरिकांच्या पाण्याची सोय तर कशीतरी होत असताना गुरांना पाणी मिळणे खूपच कठीण होते. ही बाब लक्षात घेता रमेश चौधरी यांनी गुरांसाठी पाणी उपलब करुन दिले.तहसीलदारांची धडक कार्यवाहीकळमसरे बसस्थानकाच्या मागील न्यू प्लॉट आदिवासी वसाहतीत २० वर्षापूर्वीचे हातपंप नादुरूस्त असल्याची तक्रार हिरालाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापर्यत पोहचविली. तेव्हा रखरखत्या उन्हात देवरे यांनी सेवानिवृत्त अनुभवी तांत्रिक कारागिरासह कळमसरे गाठले.दोन्ही हातपंप दुरूस्त होऊन पाणी बाहेर पडेपर्यत देवरे स्वत: ठाण मांडून बसल्या. तत्पर व चांगले काम केल्याबद्दल तहसीलदारांनी त्या निवृत्त तांत्रिक कारागिराचा तर ग्रामस्थांनी तहसीलदार देवरे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांनी इतर समस्या मनमोकळेपणाने तहसीलदारांकडे मांडल्या. या समस्यांची लवकरच पूर्तता करण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले.ग्रामस्थांची सहनशिलतासतत अवर्षण प्रवण व डार्क झोनमुळे कळमसरे गावाला तीव्र पाणीटंचाई ही नित्याचीच बाब होऊन लोकांच्या अंगवळणी पडली आहे. २२ दिवसांपर्यत पाणी मिळत नाही तरी परिस्थितीशी जुळवून घेतले जाते.दरम्यान, ग्रामस्थांनी गल्लोगल्ली सामूहिकपणे विंधन विहीर करण्याचा अनोखा प्रयोग करून पाहिला. पण फारसा उपयोग झाला नाही. न्यू प्लॉट वसाहतीत शब्बीर खाटीक हे त्यांच्या विंधन विहीरवरून निम्मे गावास मोफत पाणी पुरवितात तर धरणग्रस्त नवीन पुर्नवसित पाडळसे गाव कळमसरे गावाला पाणी पुरवून मोठे औदार्य दाखवित आहे.मात्र सुमारे पाच हजार लोकवस्तीचे कळमसरे गाव स्वत:च्या हक्काच्या कायमस्वरूपी मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आतूर आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर