शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

रामदेववाडी येथे पाणीप्रश्नी धडकला हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:03 IST

आॅनलाइन लोकमतशिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे ...

ठळक मुद्देअन्यथा रास्तारोकोग्रामसेविका रडकुंडीला

आॅनलाइन लोकमतशिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, सीईओ यांना देण्यात आले आहे.जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडी हे गाव वसले असून गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात आहे. या गावात गेले ५ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कुठलीही पर्यायी सुविधा नसल्याने येथील महिलांना एका हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. या गावातील बहुतांश लोक हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. परंतु गावात पाणीच मिळत नसल्याने पोटाला चिमटा देऊन दोनशे लीटर पाण्याची टाकी ७० रुपयांत विकत घ्यावी लागत आहे. आपली अधिकारी यांना वारंवार कळवून देखील समस्येचे निवारण होत नसल्याने गावातील महिलांनी एल्गार पुकारून ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत गावाला ५ ते ६ दिवसात पाणी न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला असून त्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या मोर्चात आप्पा राठोड, बाबुलाल राठोड, हिराबाई पवार, शांतीबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, बसंती जाधव, गिरणाबाई जाधव, यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.ग्रामसेविका रडकुंडीलारामदेववाडीत ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेविका या दोन्हीही महिला असल्याने ग्रामस्थ यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यास ग्रामसेविका या तक्रारीचे निवारण न करता रडकुंडीला येतात. यामुळे ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागावा असेही तक्रारीत म्हटले असून ग्रामसेविका व ग्रामपंचायत कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.