शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

रामदेववाडी येथे पाणीप्रश्नी धडकला हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:03 IST

आॅनलाइन लोकमतशिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे ...

ठळक मुद्देअन्यथा रास्तारोकोग्रामसेविका रडकुंडीला

आॅनलाइन लोकमतशिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, सीईओ यांना देण्यात आले आहे.जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडी हे गाव वसले असून गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात आहे. या गावात गेले ५ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कुठलीही पर्यायी सुविधा नसल्याने येथील महिलांना एका हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. या गावातील बहुतांश लोक हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. परंतु गावात पाणीच मिळत नसल्याने पोटाला चिमटा देऊन दोनशे लीटर पाण्याची टाकी ७० रुपयांत विकत घ्यावी लागत आहे. आपली अधिकारी यांना वारंवार कळवून देखील समस्येचे निवारण होत नसल्याने गावातील महिलांनी एल्गार पुकारून ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत गावाला ५ ते ६ दिवसात पाणी न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला असून त्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या मोर्चात आप्पा राठोड, बाबुलाल राठोड, हिराबाई पवार, शांतीबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, बसंती जाधव, गिरणाबाई जाधव, यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.ग्रामसेविका रडकुंडीलारामदेववाडीत ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेविका या दोन्हीही महिला असल्याने ग्रामस्थ यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यास ग्रामसेविका या तक्रारीचे निवारण न करता रडकुंडीला येतात. यामुळे ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागावा असेही तक्रारीत म्हटले असून ग्रामसेविका व ग्रामपंचायत कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.