शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

हतनूरमधील साठा निम्म्यावर भुसावळ परिसरावर पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:20 IST

सिंचनासह भुसावळ तालुक्यातील पाणी योजना येणार अडचणीत

ठळक मुद्देमागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होतामार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावरधरणातील चाचणीत गेले १.८ दशलक्ष पाणी वाया

आॅनलाईन लोकमतवरणगाव,ता.भुसावळ, दि.३१ : जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी तापीनदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठा निम्म्या पेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे काही महिन्यातच पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होता.दरवर्षी प्रमाणे पावसाळ्या नंतर हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु धरण पूर्ण भरल्याची आकडेवारी फसवी ठरत आहे.धरणात साठलेल्या गाळामुळे धरणातील पाण्याचा बराचसा भाग गाळाने व्यापला असल्यामुळे वरवर धरण १०० टक्के भरलेले दिसत असल्या वरही प्रत्यक्षात पाणीसाठा ३० टक्क्याहूनही कमीच असतो. मार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कृषी सिंचन आणि धरणावर अवलंबून पाणी पुरवठा योजनेसह औद्योगिक प्रकल्पांना पाणी संकटाचा मोठा सामना करावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे.हतनूर धरणातील साचलेल्या गाळाचे सर्वेक्षण ‘मेरी’ने २००७ साली केले होते. त्यावेळीच धरणात सुमारे २० टक्के गाळ साचला होता. त्यानंतर १५ वर्ष उलटून गेली आहेत. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठ्याची क्षमता घटली आहे. परंतु धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाचा पाटबंधारे विभाग उदासिन असल्याने भुसावळ संकटाची स्थिती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.उपसा योजनेव्दारे तापी नदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी ओझरखेडा साठवण तलावात साठविण्यासाठी उपसा योजना पूर्णत्वास आली आहे. त्या योजनेची चाचणी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. त्या चाचणीत धरणातील १.८ दशलक्ष पाणी वाया गेले. ही चाचणी पावसाळ्यात घेणे अपेक्षित असताना ती हिवाळ्यात घेण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा घटण्यास कारणीभूत ठरत आहे.हतनूर धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी आणि उद्योगासाठी अवलंबून असलेले महत्त्वाचे उद्योग वरणगाव आणि भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प, भुसावळ रेल्वे यासह लष्कर डेपो आणि विविध ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना, भुसावळ शहर या सर्वांना जास्त पाणी लागते.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ