शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हतनूरमधील साठा निम्म्यावर भुसावळ परिसरावर पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:20 IST

सिंचनासह भुसावळ तालुक्यातील पाणी योजना येणार अडचणीत

ठळक मुद्देमागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होतामार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावरधरणातील चाचणीत गेले १.८ दशलक्ष पाणी वाया

आॅनलाईन लोकमतवरणगाव,ता.भुसावळ, दि.३१ : जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी तापीनदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठा निम्म्या पेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे काही महिन्यातच पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होता.दरवर्षी प्रमाणे पावसाळ्या नंतर हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु धरण पूर्ण भरल्याची आकडेवारी फसवी ठरत आहे.धरणात साठलेल्या गाळामुळे धरणातील पाण्याचा बराचसा भाग गाळाने व्यापला असल्यामुळे वरवर धरण १०० टक्के भरलेले दिसत असल्या वरही प्रत्यक्षात पाणीसाठा ३० टक्क्याहूनही कमीच असतो. मार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कृषी सिंचन आणि धरणावर अवलंबून पाणी पुरवठा योजनेसह औद्योगिक प्रकल्पांना पाणी संकटाचा मोठा सामना करावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे.हतनूर धरणातील साचलेल्या गाळाचे सर्वेक्षण ‘मेरी’ने २००७ साली केले होते. त्यावेळीच धरणात सुमारे २० टक्के गाळ साचला होता. त्यानंतर १५ वर्ष उलटून गेली आहेत. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठ्याची क्षमता घटली आहे. परंतु धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाचा पाटबंधारे विभाग उदासिन असल्याने भुसावळ संकटाची स्थिती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.उपसा योजनेव्दारे तापी नदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी ओझरखेडा साठवण तलावात साठविण्यासाठी उपसा योजना पूर्णत्वास आली आहे. त्या योजनेची चाचणी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. त्या चाचणीत धरणातील १.८ दशलक्ष पाणी वाया गेले. ही चाचणी पावसाळ्यात घेणे अपेक्षित असताना ती हिवाळ्यात घेण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा घटण्यास कारणीभूत ठरत आहे.हतनूर धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी आणि उद्योगासाठी अवलंबून असलेले महत्त्वाचे उद्योग वरणगाव आणि भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प, भुसावळ रेल्वे यासह लष्कर डेपो आणि विविध ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना, भुसावळ शहर या सर्वांना जास्त पाणी लागते.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ