शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अमळनेर तालुक्यातही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:58 IST

तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत.

ठळक मुद्देअमळनेरात तीन पुलांची वाहतूक बंद, आपत्ती पथक सज्जसावखेडा, बेटावद , वालखेडा पूल बंदअमळनेर तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन पथक केले रवानाजिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचनासर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. बेटावदजवळील पुलालाही, सावखेडा, मुडी वालखेडा धोका असल्याने चोपडा, शिंदखेडा, शिरपूर, सोनगीर, नंदुरबारकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.पांझरा नदीतून ५९ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे तर तापी नदीला दीड लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, संततधार पावसाने नालेदेखील वाहू लागले आहेत. यामुळे तापी नदी पाणी स्वीकारणार नाही, बॅकवॉटरमुळे पांझरा काठावरील मांडळ कलंबू, बाम्हणे, भिलाली, मुडी, बोदर्डे, शहापूर, तांदळी आदी गावांना धोका संभवतो. गावात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तहसीलदार देवरे यांनी १२ पथके तयार करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर केली आहे. जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तालुक्याची आपत्कालीन समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यात तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग अभियंता, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याचे प्रमुख म्हणून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, तर आपत्कालीन मदत कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी नायब तहसीलदार बी.डी.धिवरे यांची नियुक्ती केली आहे.अनेक ठिकाणी घरे पडलीपातोंडा, बोडर्डे, लोणसीम, लोण चारम तांडा, वावडे, जळोद , शहापूर, बोहरा या गावांना सुमारे १५ घरे पडली आहेत. घरांना ३२०० ते५२०० तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहेतीन गावांना वेढ्याची शक्यतातापी काठावरील कलाली, बोहरा , सात्री आदी गावांना वेढा पडण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पथक सज्ज ठेवले आहे.तीन पूल बंदतालुक्यातील मुडी वालखेडा पूल वाहून गेल्याने सोनगीर, दोंडाईचा वाहतूक बंद झाली आहे. बेटावद येथील पुलालाही धोका असल्याने त्यावरील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर तापी नदीवरील सावखेडा पुलालाही धोका आहे. यामुळे चोपडा, यावल, रावेर, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.बैठकीस पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, एपीआय राहुल फुला, अजयकुमार नष्टे, सुनील मोरे, डी.पी.गांगोडे दुय्यम, डॉ.प्रकाश ताडे, डॉ.विलास महाजन, डॉ.भोई, एस.डी.सूर्यवंशी, बी.व्ही. वारे, संजय चौधरी, पी.डी.धनगर, आर.बी.मंडलिक, एस.एम.गवळी, एस.एम.कुलकर्णी, आर.आर.गांगुर्डे, डी.एस. बाविस्कर, हर्षवर्धन मोरे, पी.एस.पाटील, एन.जी.कोचुरे, डी.पी.बोरसे, एस.जी.पंचभाई, सु.श.मुदिराज, बी.सी.अहिरे, धीरज देशमुख, एन.डी.धनराळे, नी.वा.जाधव, एस.आर.भोसले, एस.के.आढाव, आर.जी.गरुड, संजय पाटील, जितू ठाकूर, वाय.व्ही.पगारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरAmalnerअमळनेर