शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यातही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:58 IST

तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत.

ठळक मुद्देअमळनेरात तीन पुलांची वाहतूक बंद, आपत्ती पथक सज्जसावखेडा, बेटावद , वालखेडा पूल बंदअमळनेर तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन पथक केले रवानाजिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचनासर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. बेटावदजवळील पुलालाही, सावखेडा, मुडी वालखेडा धोका असल्याने चोपडा, शिंदखेडा, शिरपूर, सोनगीर, नंदुरबारकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.पांझरा नदीतून ५९ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे तर तापी नदीला दीड लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, संततधार पावसाने नालेदेखील वाहू लागले आहेत. यामुळे तापी नदी पाणी स्वीकारणार नाही, बॅकवॉटरमुळे पांझरा काठावरील मांडळ कलंबू, बाम्हणे, भिलाली, मुडी, बोदर्डे, शहापूर, तांदळी आदी गावांना धोका संभवतो. गावात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तहसीलदार देवरे यांनी १२ पथके तयार करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर केली आहे. जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तालुक्याची आपत्कालीन समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यात तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग अभियंता, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याचे प्रमुख म्हणून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, तर आपत्कालीन मदत कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी नायब तहसीलदार बी.डी.धिवरे यांची नियुक्ती केली आहे.अनेक ठिकाणी घरे पडलीपातोंडा, बोडर्डे, लोणसीम, लोण चारम तांडा, वावडे, जळोद , शहापूर, बोहरा या गावांना सुमारे १५ घरे पडली आहेत. घरांना ३२०० ते५२०० तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहेतीन गावांना वेढ्याची शक्यतातापी काठावरील कलाली, बोहरा , सात्री आदी गावांना वेढा पडण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पथक सज्ज ठेवले आहे.तीन पूल बंदतालुक्यातील मुडी वालखेडा पूल वाहून गेल्याने सोनगीर, दोंडाईचा वाहतूक बंद झाली आहे. बेटावद येथील पुलालाही धोका असल्याने त्यावरील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर तापी नदीवरील सावखेडा पुलालाही धोका आहे. यामुळे चोपडा, यावल, रावेर, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.बैठकीस पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, एपीआय राहुल फुला, अजयकुमार नष्टे, सुनील मोरे, डी.पी.गांगोडे दुय्यम, डॉ.प्रकाश ताडे, डॉ.विलास महाजन, डॉ.भोई, एस.डी.सूर्यवंशी, बी.व्ही. वारे, संजय चौधरी, पी.डी.धनगर, आर.बी.मंडलिक, एस.एम.गवळी, एस.एम.कुलकर्णी, आर.आर.गांगुर्डे, डी.एस. बाविस्कर, हर्षवर्धन मोरे, पी.एस.पाटील, एन.जी.कोचुरे, डी.पी.बोरसे, एस.जी.पंचभाई, सु.श.मुदिराज, बी.सी.अहिरे, धीरज देशमुख, एन.डी.धनराळे, नी.वा.जाधव, एस.आर.भोसले, एस.के.आढाव, आर.जी.गरुड, संजय पाटील, जितू ठाकूर, वाय.व्ही.पगारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरAmalnerअमळनेर