शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

लोकसहभागातून होणार गावागावात जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 11:48 IST

पंतप्रधानांचे सरपंचांना पत्र

जळगाव : दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे व्हावी, यासाठी जनजागृती व कामे वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पत्र दिले असून ते जिल्ह्यातील सरपंचांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. पाटील यांनी दिली. या पत्राचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार असून श्रमदानातून जलसंवर्धनाची कामे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जलपातळी घटत जावून दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने श्रमदानातून जलसंधारणाची कामे वाढावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातही पंतप्रधानांच्या संदेशाचे पत्र आले असून ते जिल्ह्यातील जवळपास सर्वच सरपंचांना पोहचविण्यात आले आहे. हे पत्र ग्रामसभेत ग्रामस्थांसमोर वाचन करावे, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर बैठक घेण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत.जमिनीत अधिकाधिक पाणी साठविणे, जलसंधारणाची कामे करणे, वृक्षारोपणावर अधिक भर देणे, या सर्व बाबीत लोकसहभाग वाढल्यानंतरच दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे़ यासाठी गावागावात, शाळांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे वरिष्ठ पातळीवरून आदेश आहे़ त्यानुसार पंतप्रधानांनी सर्वांना उद्देशून लिहिले पत्र ग्रामसभेत वाचण्याचा सूचना आहेत़ या पत्राच्या कलर प्रिंट सर्व गटविकास अधिकाºयांना वाटप करण्यात आल्या़ त्यानंतर स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठकी घेऊन त्यांना सूचना द्याव्यात व २२ जूनपर्यंत ग्रामसभा घेऊन या पत्राचे वाचन करावे व कामांवर भर द्यावा, अशा सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहे़ ३० जूनपर्यंत या ग्रामसभांचे छायाचित्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याचे आदेशही आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव