शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लोकसहभागातून होणार गावागावात जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 11:48 IST

पंतप्रधानांचे सरपंचांना पत्र

जळगाव : दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे व्हावी, यासाठी जनजागृती व कामे वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पत्र दिले असून ते जिल्ह्यातील सरपंचांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. पाटील यांनी दिली. या पत्राचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार असून श्रमदानातून जलसंवर्धनाची कामे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जलपातळी घटत जावून दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने श्रमदानातून जलसंधारणाची कामे वाढावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातही पंतप्रधानांच्या संदेशाचे पत्र आले असून ते जिल्ह्यातील जवळपास सर्वच सरपंचांना पोहचविण्यात आले आहे. हे पत्र ग्रामसभेत ग्रामस्थांसमोर वाचन करावे, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर बैठक घेण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत.जमिनीत अधिकाधिक पाणी साठविणे, जलसंधारणाची कामे करणे, वृक्षारोपणावर अधिक भर देणे, या सर्व बाबीत लोकसहभाग वाढल्यानंतरच दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे़ यासाठी गावागावात, शाळांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे वरिष्ठ पातळीवरून आदेश आहे़ त्यानुसार पंतप्रधानांनी सर्वांना उद्देशून लिहिले पत्र ग्रामसभेत वाचण्याचा सूचना आहेत़ या पत्राच्या कलर प्रिंट सर्व गटविकास अधिकाºयांना वाटप करण्यात आल्या़ त्यानंतर स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठकी घेऊन त्यांना सूचना द्याव्यात व २२ जूनपर्यंत ग्रामसभा घेऊन या पत्राचे वाचन करावे व कामांवर भर द्यावा, अशा सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहे़ ३० जूनपर्यंत या ग्रामसभांचे छायाचित्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याचे आदेशही आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव