शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यावलला केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत जलअभियान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:32 IST

जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देरावेर-यावल तालुक्याची पाणीपातळी उंचावण्यासाठी विविध घटकांशी चर्चाउपाययोजनांवर झाली चर्चा

यावल, जि.जळगाव : येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत जिल्ह्यातील रावेर-यावल तालुक्याची घटलेली पाणी पातळी उंचावण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा झाली.जिल्ह्यातील रावेर-यावल तालुक्यातील जलपातळी सतत खालावत आहे. ती उंचावण्यासाठी तालुक्यातील नागरिक , विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून काय उपाययोजना करता येतील यावर विविध घटकांशी चर्चा केली. शेतकरी तसेच सामाजिक संस्थांंची मते जाणून घेतली.अभियानाचे समन्वयक तथा कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, देशातील ३६ राज्यातील १५०० दुष्काळग्रस्त तालुके त्यात राज्यातील आठ जिल्ह्यांमधील पाणी समस्या बिकट असल्याने त्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी जलशक्ती अभियान राबविले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता हे विविध घटकांची मते जाणून केंद्र शासनास अहवाल सादर करणार आहेत. जिल्ह्यात रावेर-यावल तालुक्याची पाणीपातळी दरवर्षी एक-एक मीटरने खालावत असल्याने ही चिंतनीय बाब आहे. ती उंचावण्यासाठी नागरिक व सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या माध्यमातून शेततळे, वनतळे, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, विविध प्रकल्पातील गाळ काढणे यासारख्या योजना राबविण्यासाठी चर्चा असल्याचे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल