शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साकेगावजवळ जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 19:41 IST

भुसावळ शहराजवळील साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाच्या खोदकामामुुळे जलवाहिनी फुटण्याचे सत्र नियोजनाअभावी सातत्याने सुरूच आहे.

ठळक मुद्देखोदकामापूर्वी नियोजन महत्त्वाचेमहामार्गासाठी खोदकाम करताना फुटते जलवाहिनीदोन दिवसातील सातत्याने दुसरी घटना

भुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाच्या खोदकामामुुळे जलवाहिनी फुटण्याचे सत्र नियोजनाअभावी सातत्याने सुरूच आहे.सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम काम करत असताना ज्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आली आहे त्या ठिकाणची तांत्रिक माहिती व जलवाहिनी टाकलेल्या मार्गाची माहिती घेऊन खोदकाम गरजेचे आहे. मात्र नियोजनाअभावी ३०-४० फुटांनंतर नंतर पुन्हा पुन्हा जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच आहे. साकेगाव महामार्गावर बसस्थानक चौकांमध्ये एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी अतिउच्च दाबाच्या जलवाहिनी फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी साकेगाव वाय पॉईंटजवळ जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीची जी जोडणी दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी झाली व त्यानंतर त्याच्या वीस फूट पुढे परत त्याच रांगेत पुन्हा जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटण्याचे सत्र सातत्याने सुरूच आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये हजारो लीटर शुद्ध पाण्याची यामुळे नासाडी होत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचे तळेच्या तळे साचलेले आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात खोदकाम करताना चार दिवसांपूर्वी साकेगाव बसस्थानकाजवळ उच्च दाबाने जळगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. ती जोडली. त्यानंतर परत वाय पॉर्इंटजवळ नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणारी छोटी जलवाहिनी फुटली. यापुढेही दोन-तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण फिरत असताना हजारो लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याचे संबंधित त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.खोदकामापूर्वी नियोजन महत्त्वाचेमहामार्ग चौपदरीकरणासाठी खोदकाम सुरू असून, पुढेही खोदकाम चालू राहणार आहे. ज्या ज्या ठिकाणी जलवाहिनी गेलेली आहे त्या ठिकाणची तांत्रिक माहिती घेऊन व प्लंबरची टीम घेऊन जलवाहिनी चुकून फुटल्यावर लगेच त्याची वेळेवर दुरुस्ती करता यावी यासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जलवाहिनी जरी फुटली तरी वेळेवरच ती जोडली जाईल व पाण्याची नासाडी होणार नाही. यासाठी खोदकाम पूर्वी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ