शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

गळत्यांकडे दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:24 IST

मनपाचा ढिम्म कारभार

ठळक मुद्देतीन दिवसाआड पाण्याचे नियोजन करताना गळतीकडे लक्ष देण्याची गरज

जळगाव : वाघूर धरणात यंदा कमी जलसाठा असल्याने शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन मनपाकडून केले जात आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या दुर्लक्षामुळे शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनीत झालेल्या गळत्यांमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मनपाने तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यापेक्षा जर गळत्यांमधून वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले तर शहरात सध्या सुरु असलेल्या नियोजनानुसार पाणी पुरवठा केला तरी पावसाळ्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा होवू शकतो.यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून शहरात या महिन्यापासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे नियोजन करताना गळ्त्यांमधून वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ज्या उपाययोजना मनपाकडून होणे अपेक्षित होते. त्या उपाययोजना मनपाकडून होताना दिसून येत नाही. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.गरजेपेक्षा जास्त पाण्याची मागणीसध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दररोज शहरात ४५ मिनीटे पाणी पुरवठा केला जातो, शहराला दररोज ८० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी असलेल्या गळत्यांमुळे २० ते ३० एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. कारण शहरात असलेल्या गळत्यांमुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. तसेच असे असतानाही याबाबत मनपा प्रशासनाला कुठलेही गांभिर्य दिसून येत नाही.चार महिन्यात कमी झाला १८ टक्के जलसाठासप्टेंबर अखेरपर्यंत वाघूर धरणात ४८ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यानंतर चार महिन्यात तब्बल १८ टक्के जलसाठा कमी झाला असून, सध्यस्थितीत धरणात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. तसेच सिंचनासाठी देखील धरणातून एखादे आवर्तन सोडल्यास मे पर्यंत पुरेल इतका जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे मनपाने गळत्या रोखाव्यात.मनपाच्या दुर्लक्षामुळेच निर्माण होईल ‘पाणी टंचाई’नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन मनपाकडून केले जात आहे. मात्र, मनपाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यापेक्षा आपल्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनाच जर हे आवाहन केले असते तर बरे झाले असते. कारण शहरात नागरिकांच्या दुर्लक्षामुळे नाही तर मनपाच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे भविष्यात शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यास केवळ मनपा प्रशासनच जबाबदार राहणार आहे. त्यामुळे मनपाने आताच शहरात होणाºया पाणी गळतीविषयी उपाययोजना करण्याची गरज आहे.गळती दिसल्यास ‘लोकमत’ ला कळवाशहरात कुठल्याही भागात गळती आढळल्यास त्या बद्दलची माहिती अजय पाटील (८८८८२६११८९) यांच्या व्हॉटस्अ‍ॅपला पाठवावी, याबाबत योग्य ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.गळत्यांवर तकलादू दुरुस्तीवाघूर धरणातून येणाºया पाईपलाईनला असलेल्या गळत्यांबाबत ‘लोकमत’ ने १० जानेवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपाने गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, ही दुरुस्ती केवळ तकलादू ठरत आहे. रायपूूर, कंडारीला गळत्या सुरुच आहे. यासह शहरातील भागांमध्ये किरकोळ गळत्या या कायमच आहे. काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून गळती सुरुच आहे. यामध्ये शिवकॉलनी उड्डाणपुलच्या खालील रस्त्यालगत, विद्या इंग्लिश स्कू ल, मेहरुण भागात कायमच गळती सुरु असते. महाबळ कॉलनीतही गळती कायम असते.