शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मनपात ठेक्याचे ‘कचरा’ राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

-कचऱ्याचा मक्ता ७५ कोटींचा - अंदाजे वसुली - ९० कोटीपर्यंत - करार - ५ वर्ष लोकमत न्यूज नेटवर्क असे ...

-कचऱ्याचा मक्ता ७५ कोटींचा

- अंदाजे वसुली - ९० कोटीपर्यंत

- करार - ५ वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

असे आहे कचऱ्याचे गणित

इतका उचलला जातो कचरा

एका दिवसात - २७० टन

एका टनसाठी मिळणारी रक्कम - ९७० रुपये

एकूण मजूर - ४००

मजुराची रोजंदारी - ४०० रुपये रोज

मनपाकडून मक्तेदाराला सेवाशुल्क म्हणून मजुरामागे दररोज दिली जाणारी रक्कम - ४९ रुपये

कचरा उचलल्यानंतर मक्तेदाराला मिळणारी रक्कम

एका दिवसात - २ लाख ६१ हजार ९००

महिन्याला - ७८ लाख ५७ हजार

वर्षाला - ९ कोटी ४२ लाख ८४ हजार

५ वर्षांत - ४७ कोटी १४ लाख २० हजार

मजुरांवर होणारा खर्च

एका मजुराला ४०० रुपये रोज

दिवसाला खर्च - १ लाख ६० हजार

महिन्याला - ४८ लाख

वर्ष - ५ कोटी ७६ लाख

५ वर्षांसाठी - २८ कोटी ८० लाख

सेवा सेवा शुल्क

-एका मजुरामागे ४९ रुपये दिवस

-१९ हजार ६०० दिवस

-५ लाख ८८ हजार महिना

-७० लाख ५६ वर्ष

-३ कोटी ५३ लाख ५ वर्षांत

जळगाव - मनपाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत मनपाने २०१८ मध्ये शहराच्या दैनंदिन सफाईसाठी ७५ कोटींचा मक्ता काढला.

२०१९ मध्ये निविदाप्रक्रियेंतर्गत हा मक्ता नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला. मात्र, मक्ता दिल्यानंतर मनपातील सर्व राजकारण कचऱ्याभोवती फिरू लागले आहे. आधीही हे प्रभागनिहाय सफाईचे मक्ते असल्याने या राजकारणाची तितकी चर्चा नव्हती. मात्र, ७५ कोटींच्या ठेक्यानंतर कचऱ्याचे राजकारण पेटू लागले आहे. कचऱ्यात लपलेल्या या अर्थकारणाचे आता सर्वांनाच भुरळ पडली आहे.

लोकप्रतिनिधींची हिस्सेदारी

कचऱ्यात पैसा दिसत असल्याने या ठेक्यांमागे स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सहभाग वाढला आहे. वॉटरग्रेस पहिल्या टप्प्यात काम सुरू केल्यानंतर त्यात मनपातील चार नगरसेवकांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर वॉटरग्रेसचे काम थांबविण्यात आल्यानंतर चार महिने सुरू झालेल्या एस. के. कन्स्ट्रक्शनमध्येदेखील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा सहभाग होता, तर वॉटरग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यात सुनील झंवर यांच्या साई मार्केटिंगसह तीन ते चार नगरसेवकांचाही यामध्ये हिस्सा असल्याचे बोलले जात आहे.

वजनाच्या मापात ‘पाप’

वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती, दगड, वृक्षांच्या फांद्यादेखील टाकल्या जात आहे. मनपाने कचऱ्याचा एका टनासाठी ९७० रुपये दर निश्चित केला आहे. दररोज शहरातून सरासरी २७० टन कचरा उचलला जात आहे. अनेकदा ३०० टनपर्यंत कचरा उचलला जात आहे. कचऱ्याचा मापात ‘पाप’ करून मोठ्या रकमेचे बिलं मनपाकडून वसूल केले जात आहेत. सुरुवातीला नगरसेवकांकडून विरोध होत असल्याने त्यावर काही प्रमाणात अंकुश होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचा विरोध अचानक (?) कमी झाल्याने मक्तेदाराला मोकळे रानच मिळाले आहे.