शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

मनपात ठेक्याचे ‘कचरा’ राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

-कचऱ्याचा मक्ता ७५ कोटींचा - अंदाजे वसुली - ९० कोटीपर्यंत - करार - ५ वर्ष लोकमत न्यूज नेटवर्क असे ...

-कचऱ्याचा मक्ता ७५ कोटींचा

- अंदाजे वसुली - ९० कोटीपर्यंत

- करार - ५ वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

असे आहे कचऱ्याचे गणित

इतका उचलला जातो कचरा

एका दिवसात - २७० टन

एका टनसाठी मिळणारी रक्कम - ९७० रुपये

एकूण मजूर - ४००

मजुराची रोजंदारी - ४०० रुपये रोज

मनपाकडून मक्तेदाराला सेवाशुल्क म्हणून मजुरामागे दररोज दिली जाणारी रक्कम - ४९ रुपये

कचरा उचलल्यानंतर मक्तेदाराला मिळणारी रक्कम

एका दिवसात - २ लाख ६१ हजार ९००

महिन्याला - ७८ लाख ५७ हजार

वर्षाला - ९ कोटी ४२ लाख ८४ हजार

५ वर्षांत - ४७ कोटी १४ लाख २० हजार

मजुरांवर होणारा खर्च

एका मजुराला ४०० रुपये रोज

दिवसाला खर्च - १ लाख ६० हजार

महिन्याला - ४८ लाख

वर्ष - ५ कोटी ७६ लाख

५ वर्षांसाठी - २८ कोटी ८० लाख

सेवा सेवा शुल्क

-एका मजुरामागे ४९ रुपये दिवस

-१९ हजार ६०० दिवस

-५ लाख ८८ हजार महिना

-७० लाख ५६ वर्ष

-३ कोटी ५३ लाख ५ वर्षांत

जळगाव - मनपाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत मनपाने २०१८ मध्ये शहराच्या दैनंदिन सफाईसाठी ७५ कोटींचा मक्ता काढला.

२०१९ मध्ये निविदाप्रक्रियेंतर्गत हा मक्ता नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला. मात्र, मक्ता दिल्यानंतर मनपातील सर्व राजकारण कचऱ्याभोवती फिरू लागले आहे. आधीही हे प्रभागनिहाय सफाईचे मक्ते असल्याने या राजकारणाची तितकी चर्चा नव्हती. मात्र, ७५ कोटींच्या ठेक्यानंतर कचऱ्याचे राजकारण पेटू लागले आहे. कचऱ्यात लपलेल्या या अर्थकारणाचे आता सर्वांनाच भुरळ पडली आहे.

लोकप्रतिनिधींची हिस्सेदारी

कचऱ्यात पैसा दिसत असल्याने या ठेक्यांमागे स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सहभाग वाढला आहे. वॉटरग्रेस पहिल्या टप्प्यात काम सुरू केल्यानंतर त्यात मनपातील चार नगरसेवकांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर वॉटरग्रेसचे काम थांबविण्यात आल्यानंतर चार महिने सुरू झालेल्या एस. के. कन्स्ट्रक्शनमध्येदेखील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा सहभाग होता, तर वॉटरग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यात सुनील झंवर यांच्या साई मार्केटिंगसह तीन ते चार नगरसेवकांचाही यामध्ये हिस्सा असल्याचे बोलले जात आहे.

वजनाच्या मापात ‘पाप’

वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती, दगड, वृक्षांच्या फांद्यादेखील टाकल्या जात आहे. मनपाने कचऱ्याचा एका टनासाठी ९७० रुपये दर निश्चित केला आहे. दररोज शहरातून सरासरी २७० टन कचरा उचलला जात आहे. अनेकदा ३०० टनपर्यंत कचरा उचलला जात आहे. कचऱ्याचा मापात ‘पाप’ करून मोठ्या रकमेचे बिलं मनपाकडून वसूल केले जात आहेत. सुरुवातीला नगरसेवकांकडून विरोध होत असल्याने त्यावर काही प्रमाणात अंकुश होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचा विरोध अचानक (?) कमी झाल्याने मक्तेदाराला मोकळे रानच मिळाले आहे.