शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

हमी भाव जाहीर झाले, ते पदरी पडतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:00 PM

शेतकऱ्यांचा सवाल

जळगाव : केंद्र सरकारने खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी ती कधीही मिळालेली नाही. वर्षानुवर्षापासून असेच सुरू असल्याने त्या बाबत शाश्वती नाही. त्यामुळे यंदाही हमी भाव जाहीर झाले असले तरी ते पदरी पडतील की नाही, असा सवाल शेतकरी, शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षासाठी खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली. यात तेलबिया व्यतिरिक्त सर्व पिकांची किंमत ही प्रतिक्विंटल ६० ते २०० रुपये वाढ झाली. १९६६-६७ पासून आतापर्यंत साधारणपणे दरवर्षी २ ते ३ टक्केच वाढ देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या तुलनेत दरवर्षी रासायनिक खते, वीज, वाहतूक मजुरीचे दर वर्षाला किमान १० ते १५ टक्के वाढत आहेत. यात घट कधीच झाली नाही. म्हणजेच दरवर्षी १० ते १२ टक्के उत्पादन खर्च हा किमान आधारभूत किंमत पेक्षा जास्त होत आहे व शेती ही तोट्यात जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तरी कृषी मंत्री उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के भाव जास्त जाहीर केला, असे म्हणत असले तरी ही बाब खोटी तर आहेच, सोबतच शेतकºयांचा अपमान करणारीदेखील असल्याचा आरोप या निमित्ताने केला जात आहे.हमी अंमलबजावणी होणे गरजेचेसरकारने शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्याची योजना म्हणून हे भाव जाहीर केले. मात्र या हमी भावांची अंमलबजावणी होत नाही, हे दु:ख असल्याचाही सूर शेतकरी, व्यापाºयांमधून आहे. सरकार एकीकडे हमी भाव जाहीर करते व दुसरीकडे विदेशातून मालाची आयात करते. त्यामुळे शेतीमाला भाव कसा मिळू शकतो, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत ५० ते २०० टक्के नफा देऊन भाव जाहीर केल्याचे कृषिमंत्री सांगत असले तरी हा शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. शेतकºयांनी ज्या विश्वासार्हतेने भाजप सरकारला निवडून दिले त्यांनीच शेतकºयांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली आहे. सोबतच ज्यांना शेती कळत नाही त्यांच्या मनात शेतकºयाविषयी गैरसमज पसरविण्याच प्रकार आहे.- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती.सरकार हमी भाव वाढवून देते, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ काळाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मात्र जाहीर झालेला हमी भाव शेतकºयास मिळाला पाहिजे. दरवर्षी त्यापेक्षाही भाव कमी मिळतात. त्यासाठी बाजारपेठ व जाहीर हमी भाव यांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे.- प्रेम कोगटा, डाळ उद्योजक.हमी भाव जाहीर होतात. मात्र बाजारपेठेत प्रत्यक्ष हे भाव पोहचत नाही. त्यामुळे व्यापाºयांनाही त्रास होतो. याकडे सरकारने लक्ष द्यावे.- शशी बियाणी, व्यापारी.एकीकडे हमी भाव जाहीर होत असले तरी बाजारपेठेतील तफावत पाहता शेतकºयांना तेवढा भाव मिळत नाही. यात बºयाच वेळा व्यापाºयांनाही नुकसान सहन करावे लागते. योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.- संजय शहा, व्यापारी.गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव पाहता हमी भाव जाहीर झाले तरी ते शेतकºयांना मिळत नाही. बाजारपेठेतील भावाशी त्याचा ताळमेळ असावा. तरच शेतकºयांना त्याचा लाभ होईल.- स्वप्नील चौधरी, शेतकरी.हमी भाव जाहीर झाल्यानंतर त्याच भावात शेतीमाल खरेदी होण्यासाठी यंत्रणा असावी. तरच त्याचा लाभ होऊ शकेल. फळ पिकांबाबतही विचार होणे गरजेचे आहे.- डॉ. सत्वशील जाधव, शेतकरी.

टॅग्स :Jalgaonजळगाव