शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

हमी भाव जाहीर झाले, ते पदरी पडतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:05 IST

शेतकऱ्यांचा सवाल

जळगाव : केंद्र सरकारने खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी ती कधीही मिळालेली नाही. वर्षानुवर्षापासून असेच सुरू असल्याने त्या बाबत शाश्वती नाही. त्यामुळे यंदाही हमी भाव जाहीर झाले असले तरी ते पदरी पडतील की नाही, असा सवाल शेतकरी, शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षासाठी खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली. यात तेलबिया व्यतिरिक्त सर्व पिकांची किंमत ही प्रतिक्विंटल ६० ते २०० रुपये वाढ झाली. १९६६-६७ पासून आतापर्यंत साधारणपणे दरवर्षी २ ते ३ टक्केच वाढ देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या तुलनेत दरवर्षी रासायनिक खते, वीज, वाहतूक मजुरीचे दर वर्षाला किमान १० ते १५ टक्के वाढत आहेत. यात घट कधीच झाली नाही. म्हणजेच दरवर्षी १० ते १२ टक्के उत्पादन खर्च हा किमान आधारभूत किंमत पेक्षा जास्त होत आहे व शेती ही तोट्यात जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तरी कृषी मंत्री उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के भाव जास्त जाहीर केला, असे म्हणत असले तरी ही बाब खोटी तर आहेच, सोबतच शेतकºयांचा अपमान करणारीदेखील असल्याचा आरोप या निमित्ताने केला जात आहे.हमी अंमलबजावणी होणे गरजेचेसरकारने शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्याची योजना म्हणून हे भाव जाहीर केले. मात्र या हमी भावांची अंमलबजावणी होत नाही, हे दु:ख असल्याचाही सूर शेतकरी, व्यापाºयांमधून आहे. सरकार एकीकडे हमी भाव जाहीर करते व दुसरीकडे विदेशातून मालाची आयात करते. त्यामुळे शेतीमाला भाव कसा मिळू शकतो, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत ५० ते २०० टक्के नफा देऊन भाव जाहीर केल्याचे कृषिमंत्री सांगत असले तरी हा शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. शेतकºयांनी ज्या विश्वासार्हतेने भाजप सरकारला निवडून दिले त्यांनीच शेतकºयांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली आहे. सोबतच ज्यांना शेती कळत नाही त्यांच्या मनात शेतकºयाविषयी गैरसमज पसरविण्याच प्रकार आहे.- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती.सरकार हमी भाव वाढवून देते, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ काळाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मात्र जाहीर झालेला हमी भाव शेतकºयास मिळाला पाहिजे. दरवर्षी त्यापेक्षाही भाव कमी मिळतात. त्यासाठी बाजारपेठ व जाहीर हमी भाव यांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे.- प्रेम कोगटा, डाळ उद्योजक.हमी भाव जाहीर होतात. मात्र बाजारपेठेत प्रत्यक्ष हे भाव पोहचत नाही. त्यामुळे व्यापाºयांनाही त्रास होतो. याकडे सरकारने लक्ष द्यावे.- शशी बियाणी, व्यापारी.एकीकडे हमी भाव जाहीर होत असले तरी बाजारपेठेतील तफावत पाहता शेतकºयांना तेवढा भाव मिळत नाही. यात बºयाच वेळा व्यापाºयांनाही नुकसान सहन करावे लागते. योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.- संजय शहा, व्यापारी.गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव पाहता हमी भाव जाहीर झाले तरी ते शेतकºयांना मिळत नाही. बाजारपेठेतील भावाशी त्याचा ताळमेळ असावा. तरच शेतकºयांना त्याचा लाभ होईल.- स्वप्नील चौधरी, शेतकरी.हमी भाव जाहीर झाल्यानंतर त्याच भावात शेतीमाल खरेदी होण्यासाठी यंत्रणा असावी. तरच त्याचा लाभ होऊ शकेल. फळ पिकांबाबतही विचार होणे गरजेचे आहे.- डॉ. सत्वशील जाधव, शेतकरी.

टॅग्स :Jalgaonजळगाव