शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा पावसाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे, तसेच यामुळे आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त हवेमुळे हा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा जोर आगामी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस बऱ्यापैकी होण्याचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस हा अरबी समुद्राकडून येणाऱ्या ढगांमुळे होत असतो; मात्र सुरुवातीला अरबी समुद्राकडून येणारी हवेची दिशा थेट उत्तर महाराष्ट्राकडे न सरकत ती गुजरात व मध्यप्रदेशकडे सरकल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. त्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी वाढेल, अशी शक्यता असतानाही जून व जुलैच्या तुलनेतदेखील ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाला आहे.

अरबी समु्द्रातील पाऊस सक्रिय झाल्यानंतरच जोर वाढणार

जिल्ह्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी हा पाऊस बंगालच्या उपसागराकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सुरू झाला आहे. या पावसाचा जोर तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडण्याचीही शक्यता आहे. बंगालचा उपसागरातील पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची गरज असून, हा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.

पावसामुळे केळी, कापसाला फायदा

सोमवारपासून जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारीदेखील जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसामुळे उडीद, मुगाला फारसा फायदा झाला नसला तरी कोरडवाहू कापूस व केळीला काही अंशी फायदा झाला आहे. यासह मका, सोयाबीनलादेखील या पावसामुळे काही प्रमाणात फायदा होणार आहे.

कोट...

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनचा कालावधी हा सप्टेंबरपर्यंत राहतो. अरबी समुद्रातील पाऊस सक्रिय झाला नाही तर परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होऊ शकते.

-रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ