शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा पावसाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे, तसेच यामुळे आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त हवेमुळे हा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा जोर आगामी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस बऱ्यापैकी होण्याचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस हा अरबी समुद्राकडून येणाऱ्या ढगांमुळे होत असतो; मात्र सुरुवातीला अरबी समुद्राकडून येणारी हवेची दिशा थेट उत्तर महाराष्ट्राकडे न सरकत ती गुजरात व मध्यप्रदेशकडे सरकल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. त्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी वाढेल, अशी शक्यता असतानाही जून व जुलैच्या तुलनेतदेखील ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाला आहे.

अरबी समु्द्रातील पाऊस सक्रिय झाल्यानंतरच जोर वाढणार

जिल्ह्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी हा पाऊस बंगालच्या उपसागराकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सुरू झाला आहे. या पावसाचा जोर तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडण्याचीही शक्यता आहे. बंगालचा उपसागरातील पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची गरज असून, हा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.

पावसामुळे केळी, कापसाला फायदा

सोमवारपासून जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारीदेखील जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसामुळे उडीद, मुगाला फारसा फायदा झाला नसला तरी कोरडवाहू कापूस व केळीला काही अंशी फायदा झाला आहे. यासह मका, सोयाबीनलादेखील या पावसामुळे काही प्रमाणात फायदा होणार आहे.

कोट...

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनचा कालावधी हा सप्टेंबरपर्यंत राहतो. अरबी समुद्रातील पाऊस सक्रिय झाला नाही तर परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होऊ शकते.

-रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ