शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पारोळ्यात महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:58 IST

जोरदार स्वागर पारोळ्यात प्रवेश करताना मोंढले प्र.अ. येथे स्वागत करण्यात आले. तसेच पारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळून फडणवीस यांच्या स्वागताला ५०० मोटारसायकलींसह भव्य रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने समाजाच्या व नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष करण पाटील यांनी स्वागत केले. बालाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून संस्थेचे अध्यक्ष यू.एच.करोडपती, मुख्याध्यापक हेमंत पाटील, विजय बडगुजर आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे फुगे व फुले उधळून स्वागत केले. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी फटकांची आतषबाजी केली.

पारोळा (जि. जळगाव) : पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जो विकास केला नाही तो पाच वर्षांत भाजपच्या सरकारने सर्व क्षेत्रात साधला आणि जो विकास साधला तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली. पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मला तसेच पालकमंत्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष करण पाटील यांना आशीर्वाद द्यावेत, असे आहवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.पारोळा-अमळनेर रोडवर खुल्या पटांगणावर शुक्रवारी दुपारी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ते म्हणाले की, पारोळा शहराला नव्याने बोरी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दिले. तसेच यापुढेही शहराला पाणी अपूर्ण पडू दिले जाणार नाही. शेतकरी कर्जमाफी दिली. मराठा आरक्षण आजपर्यंत कोणी दिले नाही, ते या युती शासनाने दिले. पाच वर्षांत ४० लाख परिवारांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले. जनता ही दैवत आहे, अशी भावना व्यक्त करीत नव्याने भाजपाला जनादेश द्याल का, असा प्रश्न विचारीत पुन्हा आम्हला आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, सभापती नंदू महाजन, सुरेंद्र बोहरा, अ‍ॅड.अतुल मोरे, मनोहर महाजन, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पाटील, सभापती अंजली पवार, दीपक अनुष्ठान, पंचायत समिती सदस्या सुजाता पाटील, वर्षा पाटील, पी.जी.पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, गटनेते बापू महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शैलेश पाटील यांनी केले.