शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:39 AM

आषाढी वारी दिंडीत प्रतिनिधी म्हणून वारकऱ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे.

ठळक मुद्देवारकऱ्यांच्या भावना आणि परंपरा यांचा आदर करावावारकरी मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची मागणी

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर) यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत श्री पांडुरंगाची आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी भरत असते. अनेक पिढ्यानपिढ्या पायी दिंडीच्या माध्यमातून लाखो वारकरी पायी चालत भक्तीसुखाचा आनंद घेत पंढरपूर येथे येऊन ही उपासना व साधना परंपरा जोपासली आहे. यावर्षी कोरोना रोगाचा प्रसार व महामारीचे आलेले संकट लक्षात घेता व जनहितार्थ गर्दी होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे वारी भरणे अश्यक्य वाटत आहे. परंतु वारी परंपरा जोपासणे व आपली साधना खंडित न होता अखंडित राहणे हेसुद्धा संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याकरिता शासनाने मध्यम मार्ग काढून द्यावा. केवळ पायी दिंडीचे परंपरेचे प्रत्येकी १० प्रतिनिधी यांना आषाढ शु. चतुर्थी ते पौर्णिमा या दहा दिवसांच्या वारीच्या कालावधीत वेळ दिवस निश्चित करून द्यावा. त्यावेळेत वारकरी पंढरपूर येथे आपापल्या वाहनाने जाऊन सर्वांच्या वतीने वारी करून येतील. याबाबत जिल्हावार नियोजन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रीतसर सर्व अटी शर्तीची पूर्तता करून परवानगी द्यावी. वारकरी प्रशासनाचे सर्व नियम पाळतील. दहा दिवस व प्रत्येक दिवसात सोळा तास या नियोजनानुसार पंढरपूर येथे कोणतीही गर्दी होणार नाही. शासनाने वारकरी समुदायाच्या भावनांचा व परंपरांचा आदर राखून तत्काळ नियोजन जाहीर करावे व रीतसर परवानगी मिळावी, अशी विनंती दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर