शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

भडगाव तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:11 IST

भडगाव तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटल्याने पाणीटंचाईचा फटका बसल्याने कनाशी, देव्हारी गावाला बसला आहे. तब्बल १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्दे१० दिवसाआड होतोय पाणीपुरवठाविहीर खोलीकरण व आडवे बोअर करणे कामे प्रशासनाने तातडीने करण्याची गरजपाणीटंचाईचा फटका, नागरिक त्रस्त

भडगाव, जि.जळगाव - तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटल्याने पाणीटंचाईचा फटका बसल्याने कनाशी, देव्हारी गावाला बसला आहे. तब्बल १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा विहिरीचे कामे मंजूर करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांतून होत आहे.कनाशी व देव्हारी गृप ग्रामपंचायत आहे. गिरणा नदी काठावर बोदर्डे शिवारात कनाशी व देव्हारी गावाला पाणीपुरवठ्यासाठी विहीर आहे. जमिनीत पाण्याची पातळी खालावल्याने पाणीपुरवठा करणारी विहीरी आटली आहे. परिणामी नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.गिरणा काठावरुन गावात पाईपलाईनद्धारा पाणी आणले जाते. कनाशी व देव्हारी गावासाठी पाणीपुरवठा करणाºया विहिरीवरून येणाºया दोन स्वतंत्र पाईपलाईन आहेत. मात्र विहीर गिरणा काठावर असूनही पाण्याने तळ गाठला आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.कनाशी गावात ग्रामपंचायत बाजुच्या चौकालगतच्या पाण्याच्या छोट्या सार्वजनिक टाकीवर तसेच देव्हारी गावाजवळ रस्त्यालगतच्या व्हॉलजवळ नागरिक व महिला पाण्यासाठी रांगेत हंडा, बादल्या घेऊन धावपळ करताना नेहमी नजरेस पडतात, तर काही नागरिक, महिला व लहान मुले शेतांमधील खासगी विहिरीवरुन हंडा व बादलीने पाणी आणताना नजरेस पडत आहेत. नागरिकांचे पाण्याप्रमाणेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिक संकटात सापडले असून, पाण्यासाठी शेत शिवारात भटकंती करावी लागत आहे.श्री.क्षेत्र कनाशी येथे मंदिरावर भारतातून दर्शनासाठी भाविक नियमीत येत असतात. नागरिकांसोबतच भाविकांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. भाविकांसाठी ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी बांधून कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणीही भाविकातून होत आहे.शासनाने विहीर खोलीकरण व आडवे बोअर प्रस्ताव मंजूर करावाकनाशी व देव्हारी ग्रुप ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांसाठी गिरणा नदीकाठी पाणीपुरवठा विहीर एकच आहे. सध्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी समस्या उग्ररुप घेत आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाईत पाणीपुरवठा विहिरीचा खोलीकरण कामाचा व आडवे बोअर करणे या कामाचा पंचायत समिती, पाणीपुरवठा जिल्हा परिषद विभाग पाचोरा यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला आहे. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव अद्यापही मंजूर केलेला नाही आणि इकडे गावाला पाणीटंचाईमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तालुका दुष्काळी असूनही हा प्रस्ताव का मंजूर झाला नाही? याबाबत ग्रामपंचायतीसह नागरिकांतून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. सध्या दुष्काळी स्थिती आहे. तरी प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरण व आडवे बोअर करणे आदी कामे तत्काळ मंजूर करावे, अशी मागणी कनाशी देव्हारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांसह नागरिकांतून होत आहे.सध्या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटत आहे. पाणीटंचाईमुळे गावात १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. विहीर खोलीकरण व आडवे बोअर करणे कामाचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला आहे. तो शासनाने तत्काळ मंजूर करावा.-लीलाबाई कैलास पाटील, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, कनाशी-देव्हारी, ता.भडगावपाणीटंचाईमुळे गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. सध्या १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शासनाने विहीर खोलीकरण, आडवे बोअर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी.-हर्षल संजय पाटील, नागरिक, कनाशीसध्या पाणीटंचाईमुळे गावाच्या पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाने विहीर खोलीकरणासह आडवे बोअर करण्याच्या कामास तत्काळ मंजुरी द्यावी. विहिरीचे काम झाल्यावर गावाला पाणीपुरवठा करण्यास सोयीचे ठरणार आहे.-वसंत आधार पाटील, नागरिक, कनाशीसध्या गावात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरण व आडवे बोअर आदी कामे झाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.-समाधान गुणवंत भोपे, नागरिक, कनाशी

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव