शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

सव्वादोन लाख लाभार्थीचे मोफत धान्य थांबल्याने भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी भटकंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 15:49 IST

शेतीकामाच्या ओहोटीमुळे रोजंदारीचा मोठा प्रश्न भेडसावणारा असून मोफत धान्याऐवजी वाढता भार पडणार असल्याने जीवनाचा रहाटगाडा ओढण्याचे संकट आवासून राहणार आहे. 

ठळक मुद्देरावेर : नऊ महिन्यांच्या कोरोनाच्या महामारीतील धान्याचा पुरवठा आता थांबणार असल्याने लाभार्थी चिंतीत रोजंदारीचा प्रश्न आवासून असल्याने चिंतेचे सावट

किरण चौधरीरावेर : कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनपासून ते अनलॉकच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील रावेर तालुक्यातील ५१ हजार ८२१ कार्डधारक असलेल्या २ लाख २४ हजार ४२५ लाभार्थीना गहू, तांदूळ व चणा डाळीचा पुरवठा आता शासनाकडून थोपवण्यात येणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या हातमजुरांना भाकरीचा चंद्र शोधण्याची चिंता भेडसावत आहे. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून ते नोव्हेंबर दरम्यानच्या नऊ महिन्यांत लॉकडाऊन व अनलॉकचे टप्प्याटप्प्याने झालेल्या मार्गाक्रमणात सर्व उद्योग, व्यापार व व्यवसाय ठप्प झाले. तथा कालांतराने उघडत असल्याने गरजू व गरीब अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांना केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीना तर अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिकार्डधारकांना ३५ किलो धान्य मोफत वितरीत करण्याचा मोठा दिलासा दिला होता.रावेर तालुक्यातील ५१ हजार ८२१ कार्डधारक असलेल्या २ लाख २४ हजार ४२५ लाभार्थीना तर जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील १ लाख ३७ हजार ७४९ कार्डधारक तर प्राधान्य कुटुंब योजनेतील २२ लाख ६३ हजार ५५ अशा एकूण अंदाजे ३२ लाख २७ हजार लाभार्थीना  तब्बल ८७ हजार २५० मेट्रिक टन धान्याचे मोफत वितरण करण्यात आले. मार्च महिन्याचे वितरण एप्रिलमध्ये झाल्याने नोव्हेंबर महिन्याचे मोफत नियतनाचे अद्यापही वितरण सुरू आहे. त्यात २९ हजार ८०० मेट्रिक टन गहू, ५७ हजार ६०० मेट्रिक टन तांदूळ तर दोन ते तीन नियतनात उपलब्ध झालेली ८५० मेट्रिक टन तूरडाळ वितरीत करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर व हातमजुरांची चिंता मिटली होती.           गत नऊ महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या या आधारामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उदरनिर्वाह चालवणे कोरोनाच्या संकटातही सुकर झाले होते. आता मात्र नऊ महिन्यांपासून मिळणारा आधार अचानक थांबणार असल्याने रोजंदारीचा प्रश्न आवासून असल्याने चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे नऊ महिन्यांत मायबाप सरकारने ३५ किलो धान्य मोफत देण्याचा दिलेला मदतीचा हात भाकरीचा चंद्र शोधण्याची चिंता मिटवणारा ठरला होता. गहू, तांदूळ व तूरडाळीमुळे निम्मे बोझा हलका होत असल्याने तिखट, मीठ, तेल अन् भाजीची चिंता असायची. अधूनमधून मिळणाऱ्या शेतमजुरीच्या कामांवर उर्वरित तिखट, मीठ, तेल अन् भाजीची व्यवस्था करून घेता येत होती. मात्र आता हा मदतीचा हात थांबणार असल्याने व रब्बी हंगामात शेतमजुरांना लागणार्‍या शेतीकामाच्या ओहोटीमुळे रोजंदारीचा मोठा प्रश्न भेडसावणारा असून मोफत धान्याऐवजी वाढता भार पडणार असल्याने जीवनाचा रहाटगाडा ओढण्याचे संकट आवासून राहणार आहे. - पंडित रामचंद्र चौधरी, शेतमजूर, खानापूर, ता.रावेर 

पतीच्या अकाली निधनानंतर मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न व वृद्ध सासू सासर्‍यांचे संगोपन करण्याचे शिवधनुष्य पेलायचे आव्हान क्रूर नियतीने उभे केले असताना कोरोनाच्या महामारीचे संकट दुष्काळात तेरावा महिना म्हणून उभे राहिले. दरम्यान, मायबाप सरकारने हाताला काम नसताना मोफत धान्य देवून कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी मदतीचा हात दिल्याने गरीब व गरजू कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. मात्र, या महिन्यापासून सरकारने मोफत धान्य वितरण थांबवण्याचा दंडुका उगारल्याने व रब्बी हंगामातील हातमजुरीचे कामे रोडावल्याने हा कुटुंबाचा रहाटगाडा हाकण्याचे मोठे संकट आवासून आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी हातमजूरीसाठी भटकंती करण्याचा यक्षप्रश्न आहे. -सविताबाई चौधरी, शेतमजूर, खानापूर, ता.रावेर. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आपल्या नियमीत अंत्योदय व प्राधान्य कुटुब योजनेतील लाभार्थीना मार्च ते नोव्हेंबर महिन्यात मोफत धान्याचे नियतन सुरळीत व सुकरपणे पार पडले. आता डिसेंबरपासून नियमित नियतन पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेप्रमाणेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीनाही दिवाळीच्या सणानिमित्त साखरेचे वितरण करण्यात आले. -हर्षल पाटील, तालुका पुरवठा निरीक्षक, रावेर  

टॅग्स :GovernmentसरकारRaverरावेर