शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:54 IST

गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे.

ठळक मुद्देबोदवड तालुक्यातील चित्रतालुक्यात पाण्यासाठी दाही दिशाझोपडपट्टी भागात तर भयावह स्थितीपाणी रे पाणी तेरा रंग कैसा

बोदवड, जि.जळगाव : गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे.अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या बोदवड तालुक्यात घोटभर पाण्यासाठी मैलभर फिरण्याचे दृश्य नित्याचेच झाले आहे. एकमेव ओडीएच्या पाण्यावर लाईफ लाईन जिवंत असून, ज्या दिवशी ओडीएच्या पाईप लाईनला पाणी येते त्या दिवशी, तालुक्यात पाण्यासाठी लहान सहान बालकासह बाया बापडे दिवसभर रोजगार सोडून उन्हा-तान्हात पाण्याचे चेंबर तसेच पाण्याच्या व्हॉल्वमधून थेंब थेंब पाणी गोळा करून घेतात व मैला मैलाची पायपीट करून वाहतूक करतात, तर काही ठिकाणी बैलगाडीने पाणी वाहतूक करून रानाशेतातून आणावे लागत आहे.आजच्या स्थितीत तालुक्यातील जामठी, एणगाव, शेलवड, बोदवड, नाडगाव, राजूर ह्या गावात भीषण पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी रोजगारावर पाणी फिरवून मुलांना छटाकभर जीव आणि किलोभर पाण्याचे ओझे डोक्यावर घेऊन ही पायपिट करावी लागण्याचे चित्र पहावयास मिळते. त्यांना कोणत्याच राजकारणाशी काहीही घेणे नाही. बस पिण्याला पाणी मिळाले पाहिजे, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे.नाडगाव येथील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था पाहता बोदवड येथील काही समाजसेवकांनी एकत्र येत पिण्याच्या पाण्याचे टँकर गावात पाठवले असून, प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाण्यासाठी टँकरसमोर लांब रांगा लागल्या होत्या. त्यांनी टँकरने पाणी पुरवणाऱ्या समाजसेवींचे आभारही व्यक्त केले. सदर यासाठी जितेंद्र झांबड, उमेश चोपडा, विनय बाफना या तरुणांनी पुढाकार घेतला आहे, तर ग्रामस्थ त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.तर पाणीटंचाईबाबत विरोधी गट नेता देवेंद्र खेवलकर यांची प्रतिक्रिया घेतली असता शहरातील सर्व विहिरींनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. फक्त ओडीएच्या भरवशावर शहर व तालुक्यातील लाभ घेणाऱ्या गावांची तहान भागत आहे, तर सत्ताधारी पक्षांनी योजना मार्गी लावली असती तर ही अवस्था राहिली नसती.अशीच परिस्थिती बोदवड शहरातील झोपडपट्टी भाग, इंदिरा नगर प्लॉट परिसरात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड