शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाकोद परिसरात जा रे जा पावसा म्हणण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:21 IST

वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़. -गणेश भील, शेतकरी, वाकोद

अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे. गेल्या सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.या हंगामात सुरूवातीपासून पावसाने विलंब जरी केलेला असला तरी सतत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने यंदा पिकांची स्थिती उत्तम होती. अधूनमधून बरसणाºया रिमझिम पावसाच्या भरवशावर बळीराजाने मोठ्या हिमतीने तडजोड करीत पैसा लावून पीके घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात येवून हातातोडांशी आलेला घास हिरावला आहे़ काही तरी पदरात पडेल म्हणून आशेवर बसलेल्या बळीराजाचा पुन्हा एकदा बळी गेला आहे़ दरवर्षी होणाºया नुकसानीमुळे व नापिकीमुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मका पिकांची लाणी केली असून खाली पडलेल्या कंसाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली मकाच्या कंसाना मोठ मोठी कोबंटे फुटलेली आहे. तर कापूस फुटलेली बोंड पाण्याने खराब झालेले आहे तसेच काही ठिकाणी कापसातील सरकीला देखील कोबंटे फुटले असल्याने कापुस पिक देखील हातातून जाताना दिसत आहे. तर काही ठिकाणी पिके कुजत चालली आहे त्यातच सततच्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. तसेच जनावराचा चारा वाया गेला आहे. चाºयाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे शेतकºयाचे कबंरडे मोडले आहे. वरूणराजा आता तरी थांब म्हणण्याची वेळ सर्वावर आली आहे. बियाण्यासह खते, फवारणी, रोजंदारी साठी झालेला हजारो रुपये खर्चही निघणे अवघड झाले आहे.अहोरात्र मेहनत घेऊन शेतातील पिके वाचविण्यासाठी व लागलेला खर्च काढण्यासाठी प्रयत्न केला़ मात्र या झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने हाती आलेले उत्पन्न हिरावून घेतले आहे़ शेतातील मका, कापुस पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़.-गणेश भील, शेतकरी, वाकोदसततच्या होणाºया अवकाळी पावसामुळे मका कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढलेल्या मक्याच्या कणसांना जागेवर मोड आल्याने नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे सडण्यास सुरुवात झाली आहे. त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी.-ईश्वर कोळी, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर 

टॅग्स :RainपाऊसJamnerजामनेर