शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वाकोद परिसरात जा रे जा पावसा म्हणण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:21 IST

वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़. -गणेश भील, शेतकरी, वाकोद

अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे. गेल्या सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.या हंगामात सुरूवातीपासून पावसाने विलंब जरी केलेला असला तरी सतत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने यंदा पिकांची स्थिती उत्तम होती. अधूनमधून बरसणाºया रिमझिम पावसाच्या भरवशावर बळीराजाने मोठ्या हिमतीने तडजोड करीत पैसा लावून पीके घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात येवून हातातोडांशी आलेला घास हिरावला आहे़ काही तरी पदरात पडेल म्हणून आशेवर बसलेल्या बळीराजाचा पुन्हा एकदा बळी गेला आहे़ दरवर्षी होणाºया नुकसानीमुळे व नापिकीमुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मका पिकांची लाणी केली असून खाली पडलेल्या कंसाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली मकाच्या कंसाना मोठ मोठी कोबंटे फुटलेली आहे. तर कापूस फुटलेली बोंड पाण्याने खराब झालेले आहे तसेच काही ठिकाणी कापसातील सरकीला देखील कोबंटे फुटले असल्याने कापुस पिक देखील हातातून जाताना दिसत आहे. तर काही ठिकाणी पिके कुजत चालली आहे त्यातच सततच्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. तसेच जनावराचा चारा वाया गेला आहे. चाºयाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे शेतकºयाचे कबंरडे मोडले आहे. वरूणराजा आता तरी थांब म्हणण्याची वेळ सर्वावर आली आहे. बियाण्यासह खते, फवारणी, रोजंदारी साठी झालेला हजारो रुपये खर्चही निघणे अवघड झाले आहे.अहोरात्र मेहनत घेऊन शेतातील पिके वाचविण्यासाठी व लागलेला खर्च काढण्यासाठी प्रयत्न केला़ मात्र या झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने हाती आलेले उत्पन्न हिरावून घेतले आहे़ शेतातील मका, कापुस पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़.-गणेश भील, शेतकरी, वाकोदसततच्या होणाºया अवकाळी पावसामुळे मका कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढलेल्या मक्याच्या कणसांना जागेवर मोड आल्याने नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे सडण्यास सुरुवात झाली आहे. त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी.-ईश्वर कोळी, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर 

टॅग्स :RainपाऊसJamnerजामनेर