शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मुंबई विमानसेवेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:19 IST

अमृतसर एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अमृतसर एक्सप्रेस बंद असल्यामुळे, पंजाबमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत ...

अमृतसर एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अमृतसर एक्सप्रेस बंद असल्यामुळे, पंजाबमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच उन्हाळ्यात पंजाब प्रांतात फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचींही गैरसोय होत असून, रेल्वे प्रशासनाने पुन्हा ही गाडी सुरू करण्याची मागणी, नागरिकांमधुन केली जात आहे.

सुभाष चौकात वाहतूक कोंडी

जळगाव : सुभाष चौकापासून बेंडाळे चौकाकडे जाणाऱ्या भुयारी गटारीच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असून, अधून-मधून वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. या कोंडीमुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. तरी मनपा प्रशासनाने तातडीने हे काम करण्याची मागणी होत आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय

जळगाव : कॉग्रेस भवनासमोर रस्त्यावर बेशिस्तपणे प्रवासी रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी नागरिकांना या ठिकाणाहून मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी यामुळे अपघाताचींही शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय

जळगाव : जिल्हा परिषदेकडून रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्यावर रात्री अनेक ठिकाणी पथदिवे बंद राहत आहे. यामुळे स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे, सायंकाळी वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. तरी मनपा प्रशासनाने पादचारी नागरिकांच्या सोयीसाठी या रस्त्यावर सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

जळगाव विभागाला नवीन विभाग नियंत्रकांची प्रतिक्षा

जळगाव : गेल्या आठवड्यात महामंडळाच्या जळगाव विभागातून राजेंद्र देवरे सेवानिवृत्त झाल्या नंतरही, अद्यापही महामंडळातर्फे जळगावसाठी नवीन विभाग नियंत्रकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रशासकीय मान्यतांची कामे रखडत आहेत. सध्या विभाग नियत्रंक पदाचा पदभार मुख्य यांत्रिक अभियंता श्रावण सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.