शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गाळ्यांच्या ठरावावर महापौरांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेची महासभा होऊन १५ दिवस उलटले असले तरी अद्यापपर्यंत मुदत संपलेल्या मार्केटमध्ये गाळेधारकांबाबत महासभेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेची महासभा होऊन १५ दिवस उलटले असले तरी अद्यापपर्यंत मुदत संपलेल्या मार्केटमध्ये गाळेधारकांबाबत महासभेत झालेल्या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी झालेली नाही. या ठरावाला मान्यता मिळण्यासाठी महापौरांची स्वाक्षरी आवश्यक असून, ठरावाबाबत विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मान्यता दिली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १२ मे रोजी झालेल्या महासभेत मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरीही महापौर जयश्री महाजन यांनी या ठरावावर अद्यापपर्यंत स्वाक्षरी न केल्यामुळे हा ठराव महापौरांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेतच आहे. महापौरांची स्वाक्षरी न मिळाल्यामुळे प्रशासनाकडून होणारी पुढील प्रक्रिया देखील थांबली आहे. दरम्यान, या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याआधी महापौरांनी काही कायदेशीर बाबी तपासण्यासाठी कायदे तज्ज्ञांकडून अभिप्राय मागविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर या ठरावावर महापौरांकडून स्वाक्षरी केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, १२ मे रोजी झालेल्या महासभेत एकूण ७७ विषयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ७६ विषयांच्या ठरावांना महापौरांचीही मंजुरी मिळाली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, गाळे प्रश्नावरील ठरावाला आत्तापर्यंत मंजुरी मिळाली नाही.

कारवाईची प्रक्रिया लांबत जाण्याची भीती

महापालिका प्रशासनाकडून गाळे प्रश्नी लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी फेब्रुवारी महिन्यातच आपला प्रस्ताव सादर करून महासभेपुढे ठेवला होता; मात्र तत्कालीन सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव महासभेत येऊ दिला नव्हता. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेने या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली; मात्र महापौरांच्या स्वाक्षरीसाठी हा ठराव रखडून पडला आहे. या ठरावाला जोपर्यंत मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत मनपा प्रशासनाकडून देखील पुढील प्रक्रिया करण्यास विलंब होणार आहे. मनपा प्रशासनाने नूतनीकरणासाठी पात्र व अपात्र ठरणाऱ्या गाळेधारकांच्या निर्णयाबाबत आपली तयारी पूर्ण केली आहे. मात्र जोपर्यंत ठरावावर स्वाक्षरी होणार नाही तोपर्यंत ही प्रक्रियादेखील लांबत जाण्याची शक्यता आहे.

कोट...

या ठरावाबाबत काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी विधी तज्ज्ञांचा सल्ला मागविला होता. तो आता मिळाला असून, दोन दिवसात या ठरावावर स्वाक्षरी करून हा ठराव मंजूर करण्यात येईल.

- जयश्री महाजन, महापौर