शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

कैरी बाजारालाही पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:32 IST

तीन आठवडे उलटूनही हवी तशी मागणी नाही

जळगाव : पावसाने दडी मारल्याचे परिणाम सर्वच घटकांवर जाणवताना दिसत आहे़ लोणच्याच्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत मात्र, पाऊस नसल्याने या कैऱ्यांना हवी तशी मागणीच नसल्याचे कैरी विक्रेत्यांनी सांगितले़ शनिवारी जळगावात आठवडे बाजारात छोट्या मोठ्या अशा सुमारे दोनशे कैरी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, मात्र फारसी ग्राहकीच नसल्याचे चित्र होते.जून महिन्याचा शेवटचा आठवड उजाडत असला तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे़ गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यामुळे आधीच पाणी संकट बिकट झाले असून पावसाला होणारा विलंब अनेक समस्यांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे़ दरवर्षी साधारण पहिला पाऊस पडल्यानंतर गृहीणींचा ओढा लोणचे टाकण्याकडे असतो़ मात्र यंदा पाऊस लांबल्यामुळे हे नियोजनही कोलमडल्याचे चित्र आहे़ शनिवारच्या बाजारात सकाळी साडे अकराच्या सुमारास काही प्रमाणात गर्दी पाहायवयास मिळाली़ सकाळपासूनच सात ते आठ टेप्मो व अन्य छोटे छोटे विक्रेते कैºया विक्री करीत होते़ एका वाहनात साधारण तीन ते चार टन कैºया असतात,अशा किमान सहा ते सात वाहने कैºयांची विक्री म्हणजेच वीस ते तीस टन कैºयांची शनिवारच्या बाजारात विक्री होईल, असा अंदाज काही विक्रेत्यांनी वर्तविला़ यापेक्षा पुढील शनिवारी अधिक उलाढाल होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे़ २५ ते ४० रूपये किलोपर्यंत कैºयांची विक्री होत आहे़ यासह लोणच्यासाठी लागणारे अन्य साहित्य विक्रीची लगबग वाढली आहे़कैºयांचे विविध प्रकार बाजारात उपलब्धराजापुरी, सरदार, वनराज असे विविध कैºयांचे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत़ यात सरदार व राजापुरीला सर्वाधिक मागणी असल्याचे धरणगाव येथून आलेले कैरी विक्रेते लक्ष्मण भोई यांनी सांगितले़ राजापूरी २५ रूपये किलो तर सरदार कैरी ३० रूपये किलोप्रमाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ कैºयांची आवक ही गुजरात राज्यातून होत असते़ तर आपण गेल्या तीन आठवड्यांपासून दुकान थाटत आहोत मात्र, यंदा पाऊस नसल्याने हवी तशी मागणी नसल्याचे विक्रेते भीवा भोई यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव