शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

विनोबांनी शिवाजीराव भावे यांचे केलेले मूल्यांकन दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:19 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांचा लेख

महाराष्ट्राच्या संत परंपरेत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेवांची एक अद्भुत त्रयी आहे. 700 वर्षाच्या कालपटानंतर महाराष्ट्र देशी असे नवल पुनरपि वर्तले. कोकणातल्या गागोदे गावी विनायक नरहर भावे, बालकृष्ण नरहर भावे आणि शिवाजी नरहर भावे या तीन बंधुंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्म वाटेवर वाटचाल केली. मोक्ष त्यांचे लक्ष होते. ब्रrाजिज्ञासा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. अध्यात्मनिरूपण त्यांची जीवनशैली होती. महात्मा गांधी त्यांचा जीवनाधार होते. ते सतत आत्मतत्त्वाचे विवरण करत. गीता ग्रंथ त्यांच्या चिंतनाचे बलस्थान होते. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वरांचे विचारधन त्यांचे पाथेय होते. शिवाजीराव भावे शिवबा धुळ्याच्या महात्मा गांधी तत्त्वज्ञान मंदिरात स्थिरावले. बाबा, तात्या आणि आबा या कौटुंबिक संबोधनांनी तिघे महाराष्ट्राला ज्ञात आहेत. कोकणातला कुलाबा जिल्हा. गाव गागोदे, नदी बाळगंगा, डोंगराचा सभोवताल. ताम्हणात पूजेसाठी देव घ्यावे तसा गाव. श्री नरसिंह कृष्णराव भावे हे आदिपुरुष. नरसिंह कृष्णराव यांचे आजोबा शिवाजी नारायण भावे. भावे कुलवृत्तांत एवढा समजतो. शिवाजीराव भावेंनी याचे वर्णन केलेय. शंभूरावांचे चार पूत्र. नरहरपंत तिस:या क्रमांकाचे चिरंजीव. त्यांचे पूत्र विनोबा, बाळकोबा, शिवाजीराव आणि कन्या शांता. शिवाजीरावांची आई कर्नाटकच्या. त्यांचे गाव हावनूर. कानडी-मराठीतील अगणित भजने आईला पाठ होती. शिवाजीरावांचे वडील नरहर पंत योगी होते. अखंड ज्ञानोपासक होते. त्यांनी आयुष्यात द्रव्यलोभ मनी धरला नाही. त्यांची एक प्रयोगशाळा होती. आपल्या अखेरच्या आजारात ते बडोदा येथे होते. विनोबांच्या सांगण्यावरून धाकटे बंधू शिवाजीराव त्यांना धुळे येथे घेऊन गेले. 29 ऑक्टोबर 1978 रोजी योग्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला. अंगणातच एके ठिकाणी विनोबांनी अस्थि-विसजर्न केले. तुळशीचे रोप लावले. वृंदावन बनवले. त्यावर लिहिले. ‘अवघेचि सुखी असावे ही वासना’. एक विनोबा तर गांधी आश्रमात निघाले. पाठोपाठ मधले भाऊ-बाळकृष्ण- बाळकोबा निघाले. वध्र्याच्या घास बंगल्यात शिवाजीराव दाखल झाले. एक शेड बांधायची होती. सुताराच्या हाताखाली विनोबांनी शिवाजीरावांची नेमणूक केली. शिवाजीराव 1923 च्या ङोंडा सत्याग्रहात सामील झाले. ब्रrाविद्या मंदिर स्थापन झाले. शिवाजीराव ब्रrाविद्या- मंदिरच्या भगिनींसोबत होते. विनोबा 7 सप्टेंबर 1935 रोजी आपल्या वडिलांना लिहितात- ‘‘पूजनीय बाबांचे सेवेशी, शिवबा अखंड प्रचार करीत बाहेर हिंडत असतो आणि चातुर्मासात येथे येत असतो. गीता आणि गीताई यांचे सूक्ष्म अध्ययन करून तद्विषयक टाचणे करून ठेवणे हे त्याचे चालले आहे. त्याशिवाय थोडे फार शिकवणे. शिवबाची स्थिती ह्या 2-3 वर्षात फार पालटली आहे. पहिल्यापासून त्याचा ज्ञानाकडे कल होताच पण तो आता गीताईच्या निमित्ताने अधिक अंतमरुख झालेला आहे. प्रकृती साधारण बरी राखतो. बाळकोबाच्या तब्येतीकडे डोळ्यात तेल घालून पहात असतो. अशाप्रकारे दोघे जपा तपाला आणि ज्ञानाला वाहिले असता माङया वाटेला कर्माचा भाग आलेला आहे.’’