शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा वार्षिक योजनेतून शेतशिवार बहरण्यासह गावे लखलखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य देणार असून मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी व पाणीपुरवठा योजनेच्या वितरणासाठी अडचण येऊ नये म्हणून यंदा २२ कोटी रूपयांची विजेची कामे मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे मागील वर्षी १४ कोटी तर यावर्षी २२ कोटी असा २ वर्षात विक्रमी म्हणजे ३६ कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतशिवार बहरून गावेदेखील लखलखण्यास मदत होईल.

जिल्ह्यात वीजविषयक समस्या मोठ्या प्रमाणात उद‌्भवल्या होत्या. यात शेतीचे पंप वारंवार जळणे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उदभवणे, घरगुती, शेती पंप व पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठ्याचा अभाव या समस्यांचा प्रामुख्याने समावेश होता. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वारंवार नवीन ट्रान्सफाॅर्मर बसविण्याबाबत मागणी होत होती. याच्या जोडीला भुसावळ ट्रामा सेंटरला स्वतंत्र ट्रान्सफाॅर्मर बसविणे, खराब झालेले वीज खांब बदलून मिळणे, अपघात होऊ नये म्हणून केबलची कामे करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून डीपीडीसीच्या बैठकीत याबाबत निधीवाढीसाठी चर्चा झाली होती. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ कोटी निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचे निराकरण होणार आहे.

२०१८-१९ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या कामांसाठी वर्षाला केवळ २ कोटी रुपये मंजूर होत होते. मात्र मागील वर्षापासून पालकमंत्री पाटील यांनी मागील वर्षी १९४ कामांसाठी १६ कोटी ५५ लाख निधी मंजूर करून ऊर्जा विभागाकडे वितरित केला होता. तर यावर्षी तब्बल ४३७ कामांसाठी २१ कोटी ९२ लक्ष ६६ हजारांचा निधी मंजूर केला असून मुदतीत व दर्जेदार काम करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.

तालुकानिहाय मंजूर कामे

तालुका - मंजूर कामे - निधी (लाखात)

अमळनेर - १३- ६४.१०

भडगाव - ११ - ५२.७९

पाचोरा - ४० - २१७.९२

भुसावळ -३९ - २१२.५५

बोदवड - ५६ - २८२. ७९

मुक्ताईनगर - १७ - ६५.०२

चाळीसगाव - ११- ५१.०९

चोपडा - २९ - १७२.१३

धरणगाव - ५५ - २१६.०४

जळगाव - ५२ - २७६.१०

जामनेर - ३९ - २१२.५४

एरंडोल - १३ - ७४.५२

पारोळा - ९ - ४४.६३

रावेर- ४१ - १९१.१६

यावल - १५ - ६२.५३

शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक असून पुरेशा विजेअभावी शेतकऱ्यांची कोट्यवधीची हानी होत असते. आता २ वर्षात तब्बल ३६ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून याचा बळीराजाला लाभ होणार आहे, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.