शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

जिल्हा वार्षिक योजनेतून शेतशिवार बहरण्यासह गावे लखलखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य देणार असून मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी व पाणीपुरवठा योजनेच्या वितरणासाठी अडचण येऊ नये म्हणून यंदा २२ कोटी रूपयांची विजेची कामे मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे मागील वर्षी १४ कोटी तर यावर्षी २२ कोटी असा २ वर्षात विक्रमी म्हणजे ३६ कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतशिवार बहरून गावेदेखील लखलखण्यास मदत होईल.

जिल्ह्यात वीजविषयक समस्या मोठ्या प्रमाणात उद‌्भवल्या होत्या. यात शेतीचे पंप वारंवार जळणे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उदभवणे, घरगुती, शेती पंप व पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठ्याचा अभाव या समस्यांचा प्रामुख्याने समावेश होता. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वारंवार नवीन ट्रान्सफाॅर्मर बसविण्याबाबत मागणी होत होती. याच्या जोडीला भुसावळ ट्रामा सेंटरला स्वतंत्र ट्रान्सफाॅर्मर बसविणे, खराब झालेले वीज खांब बदलून मिळणे, अपघात होऊ नये म्हणून केबलची कामे करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून डीपीडीसीच्या बैठकीत याबाबत निधीवाढीसाठी चर्चा झाली होती. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ कोटी निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचे निराकरण होणार आहे.

२०१८-१९ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या कामांसाठी वर्षाला केवळ २ कोटी रुपये मंजूर होत होते. मात्र मागील वर्षापासून पालकमंत्री पाटील यांनी मागील वर्षी १९४ कामांसाठी १६ कोटी ५५ लाख निधी मंजूर करून ऊर्जा विभागाकडे वितरित केला होता. तर यावर्षी तब्बल ४३७ कामांसाठी २१ कोटी ९२ लक्ष ६६ हजारांचा निधी मंजूर केला असून मुदतीत व दर्जेदार काम करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.

तालुकानिहाय मंजूर कामे

तालुका - मंजूर कामे - निधी (लाखात)

अमळनेर - १३- ६४.१०

भडगाव - ११ - ५२.७९

पाचोरा - ४० - २१७.९२

भुसावळ -३९ - २१२.५५

बोदवड - ५६ - २८२. ७९

मुक्ताईनगर - १७ - ६५.०२

चाळीसगाव - ११- ५१.०९

चोपडा - २९ - १७२.१३

धरणगाव - ५५ - २१६.०४

जळगाव - ५२ - २७६.१०

जामनेर - ३९ - २१२.५४

एरंडोल - १३ - ७४.५२

पारोळा - ९ - ४४.६३

रावेर- ४१ - १९१.१६

यावल - १५ - ६२.५३

शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक असून पुरेशा विजेअभावी शेतकऱ्यांची कोट्यवधीची हानी होत असते. आता २ वर्षात तब्बल ३६ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून याचा बळीराजाला लाभ होणार आहे, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.