शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

डोलारखेडा येथील रखडलेल्या पाणी योजनेसाठी रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:23 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आठ वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण झाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देभारत निर्माण योजनेंतर्गत आहे योजना मंजुरयोजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोपनिवेदनावर ९० ग्रामस्थांच्या आहेत सह्या

मुक्ताईनगर, जि. जळगाव : तालुक्यातील डोलारखेडा येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम तब्बल आठ वर्षापासून रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही. येत्या आठ दिवसात गावातील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही तर १६ आॅगस्ट पासून समस्या सुटेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा डोलारखेडा येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.डोलारखेडा या गावाचा सुकळी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समावेश असून २०११ -१२ मध्ये या गावासाठी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजना राबविणे कामी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गावाची पाणीपुरवठा योजना रखडवली. या योजनेअंतर्गत गावात पाईपलाइन टाकण्याचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास येत्या १६ आॅगस्टपासून या समस्या सुटेपर्यंत डोलारखेडा येथून पुढे जाणारा रस्ता बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत ९० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदनावर उपसरपंच आशाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळू इंगळे, महेंद्र गरुड, पुंडलिक पाटील, शिवाजी वानखेडे , गजानन कोळी, सुभाष सोनार, महादेव टोंगळे, शंकर भोई, सिद्धार्थ थाटे, मंगेश कोळी, श्रीकृष्ण वनारे, हरिदास सोनार, गजानन दुट्टे यांच्यासह सुमारे ९० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :Waterपाणी