शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

देवाचे गावच आपले मूळगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:51 IST

ज्याप्रमाणे तुमचे-आमचे गाव असते, त्याचप्रमाणे देवाचेही गाव आहे .त्या गावाचे नाव ‘वैकुंठ लोक’ आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याबद्दल एवढ्याच ...

ज्याप्रमाणे तुमचे-आमचे गाव असते, त्याचप्रमाणे देवाचेही गाव आहे .त्या गावाचे नाव ‘वैकुंठ लोक’ आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याबद्दल एवढ्याच करिता उत्सुक असायला हवे कारण आपणही तेथूनच आलो आहोत. थोडक्यात म्हणजे जे देवाचे गाव आहे तेच आपलेही मूळगाव. म्हणून स्वत:च्या गावाला जाण्याविषयी उत्सुकता असण्यात काहीच गैर नाही परंतु विचित्र परिस्थिती अशी दिसून येते की बहुतेक लोकांना जीवनाचे ध्येय काय आहे, हेच माहीत नाही.आपल्या जीवनाचे ध्येय पुन्हा एकदा भगवद् धर्मात जाणे हे आहे, पण लोकांना वैकुंठ लोकातील आपल्या खऱ्या घराबद्दल काहीच कल्पना नाही. आधुनिक मानवाने ज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली असली तरी वैकुंठ लोकांबद्दल त्याला काहीच ज्ञान नाही. जर कोणाचा मृत्यू झाला तर आपण तो स्वर्गवासी झाला असे म्हणतो पण तुम्हाला वैकुंठात जायचे आहे का? असे जर कोणाला विचारले तर तो कदाचित, काय भलतेच अभद्र बोलता, असेही म्हणेल.पुण्यसंचयच्या जोरावर जरी एखाद्याने या ब्रम्हांडातील सर्वोच्च ग्रहावर प्रवेश मिळविला तरी पुण्य क्षीण होताच त्याला परतीची वाट धरावी लागेल. ज्याप्रमाणे एखादी अंतराळ यान आकाशात खूप उंच गेले असले तरी इंधन संपताच त्याला पुन्हा खाली यावे लागते. आयुष्यात इतकी दु:खे संकटे व क्लेश पाहून एखादा म्हणेल की खरे सुख प्रेम किंवा आनंद कुठेच अस्तित्वात नाही का?याचे उत्तर असे आहे की खरा आनंद किंवा खरे प्रेम निश्चितच अस्तित्वात आहे परंतु ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी शोधत आहात. एकदा एक मनुष्य रस्त्यावरील दिव्याखाली काहीतरी शोधत होता, हे पाहून त्याच्या मित्राने विचारले, काय रे काहीतरी हरवले आहे का? यावर पहिल्याने उत्तर दिले, होय, माझी सोन्याची अंगठी बाजूच्या बागेत कुठेतरी पडली आहे, ती शोधत आहे हे एकूण मित्र म्हणाला, अरे मुर्खा अंगठी पडली असली तरी येथे रस्त्यावर ती कशी काय मिळेल? तेव्हा पहिल्याने उत्तर दिले ,पण, इथे प्रकाशात मी नीट पाहू शकतो ; बागेत तर खूपच अंधार आहे. यातील विनोदाचा भाग सोडला तर आपले सध्याचे जीवन पहिल्या मनुष्याच्या विक्षिप्त वागण्यासारखेच आहे भौतिक व्यक्तीच्या झगमगाटात आपण खº्या सुखाचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहोत. पण जिथे आपल्याला खरे प्रेम व सुख लाभेल त्याविषयी आपल्या हृदयात दाट अंधकार आहे.- चैतन्य जीवन दास (अध्यक्ष, इस्कॉन जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव