शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

देवाचे गावच आपले मूळगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:51 IST

ज्याप्रमाणे तुमचे-आमचे गाव असते, त्याचप्रमाणे देवाचेही गाव आहे .त्या गावाचे नाव ‘वैकुंठ लोक’ आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याबद्दल एवढ्याच ...

ज्याप्रमाणे तुमचे-आमचे गाव असते, त्याचप्रमाणे देवाचेही गाव आहे .त्या गावाचे नाव ‘वैकुंठ लोक’ आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याबद्दल एवढ्याच करिता उत्सुक असायला हवे कारण आपणही तेथूनच आलो आहोत. थोडक्यात म्हणजे जे देवाचे गाव आहे तेच आपलेही मूळगाव. म्हणून स्वत:च्या गावाला जाण्याविषयी उत्सुकता असण्यात काहीच गैर नाही परंतु विचित्र परिस्थिती अशी दिसून येते की बहुतेक लोकांना जीवनाचे ध्येय काय आहे, हेच माहीत नाही.आपल्या जीवनाचे ध्येय पुन्हा एकदा भगवद् धर्मात जाणे हे आहे, पण लोकांना वैकुंठ लोकातील आपल्या खऱ्या घराबद्दल काहीच कल्पना नाही. आधुनिक मानवाने ज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली असली तरी वैकुंठ लोकांबद्दल त्याला काहीच ज्ञान नाही. जर कोणाचा मृत्यू झाला तर आपण तो स्वर्गवासी झाला असे म्हणतो पण तुम्हाला वैकुंठात जायचे आहे का? असे जर कोणाला विचारले तर तो कदाचित, काय भलतेच अभद्र बोलता, असेही म्हणेल.पुण्यसंचयच्या जोरावर जरी एखाद्याने या ब्रम्हांडातील सर्वोच्च ग्रहावर प्रवेश मिळविला तरी पुण्य क्षीण होताच त्याला परतीची वाट धरावी लागेल. ज्याप्रमाणे एखादी अंतराळ यान आकाशात खूप उंच गेले असले तरी इंधन संपताच त्याला पुन्हा खाली यावे लागते. आयुष्यात इतकी दु:खे संकटे व क्लेश पाहून एखादा म्हणेल की खरे सुख प्रेम किंवा आनंद कुठेच अस्तित्वात नाही का?याचे उत्तर असे आहे की खरा आनंद किंवा खरे प्रेम निश्चितच अस्तित्वात आहे परंतु ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी शोधत आहात. एकदा एक मनुष्य रस्त्यावरील दिव्याखाली काहीतरी शोधत होता, हे पाहून त्याच्या मित्राने विचारले, काय रे काहीतरी हरवले आहे का? यावर पहिल्याने उत्तर दिले, होय, माझी सोन्याची अंगठी बाजूच्या बागेत कुठेतरी पडली आहे, ती शोधत आहे हे एकूण मित्र म्हणाला, अरे मुर्खा अंगठी पडली असली तरी येथे रस्त्यावर ती कशी काय मिळेल? तेव्हा पहिल्याने उत्तर दिले ,पण, इथे प्रकाशात मी नीट पाहू शकतो ; बागेत तर खूपच अंधार आहे. यातील विनोदाचा भाग सोडला तर आपले सध्याचे जीवन पहिल्या मनुष्याच्या विक्षिप्त वागण्यासारखेच आहे भौतिक व्यक्तीच्या झगमगाटात आपण खº्या सुखाचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहोत. पण जिथे आपल्याला खरे प्रेम व सुख लाभेल त्याविषयी आपल्या हृदयात दाट अंधकार आहे.- चैतन्य जीवन दास (अध्यक्ष, इस्कॉन जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव