शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

गावच्या तक्रारी पोलीस ठाण्यात, तंटामुक्ती केवळ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

जिल्ह्यात ४०४ गावे तंटामुक्त : योजनाच बासनात जळगाव : दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली तंटामुक्त गाव ...

जिल्ह्यात ४०४ गावे तंटामुक्त : योजनाच बासनात

जळगाव : दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली तंटामुक्त गाव योजना जळगाव जिल्ह्यात कागदावरच आहे. परिणामी गावाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तंटामुक्त गाव योजना ही कागदावरच राहिल्याचे अधोरेखित होत आहे.

जळगाव जिल्ह्यात ११५१ गावे असून २०१६-१७ मध्ये ११४८ गावांनी तंटामुक्त गाव योजनेत सहभाग घेतला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये सर्वच ११५१ गावांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ४०४ गावे तंटामुक्त झाली होती. त्यानंतर ही योजना बासनात गुंडाळण्यात आली. तंटामुक्त गावांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींपैकी ७० टक्के तक्रारी या ग्रामीण भागातीलच आहेत. त्यात मग शेजाऱ्यांचा वाद असो, कौटुंबिक किंवा शेतीवरून वाद आदी कारणे आहेत. यामुळे तक्रारदार यांचा वेळ व पैसा खर्च होत आहे. न्यायालयाचेही खेटे मारावे लागत आहेत. ही योजना सुरू झाली तर किमान गावाच्या तक्रारी गावातच मिटतील, याच उद्देशाने दिवंगत गृहमंत्र्यांनी योजना सुरू केली होती.

*तंटामुक्त गावांना भरघोस बक्षिसे*

शासनाने तंटामुक्त गाव योजना जाहीर केली तेव्हा तंटामुक्त झालेल्या गावांना लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली, इतकेच नाही तर जिल्हा पातळीवर वर्षातून एकदा कार्यक्रम घेऊन या गावांना बक्षिसेही देण्यात आली होती. या बक्षिसातून गावांमध्ये लोकहिताची कामे केली जात होती. आता मात्र ना योजनांना, ना बक्षीस अशी स्थिती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.

कोट...

तंटामुक्त योजना सुरू असायला हवी. आमच्या गावातून अंतर्गत वादाचे एकही प्रकरण पोलीस ठाण्यात गेलेले नाही. चोरीच्या घटनांचीच नोंद पोलीस ठाण्यात झालेली आहे. गावातील वाद गावातच मिटविण्यात आले आहेत.

- धनराज वसंत पाटील, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, जळके

कोट...

गेल्या दहा वर्षांपासून एकही प्रकरण पोलीस ठाण्यात गेलेले नाही. साधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंददेखील झालेली नाही. गावात तशा वादाच्या घटना घडलेल्या नाहीत. झाल्याच तर आपसात मिटविल्या जातात.

- आनंदा भिका गोपाळ, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, जवखेडा, ता.जळगाव

जिल्ह्यातील एकूण तंटामुक्त गावांची संख्या : ४०४

तालुका. २०२० दाखल तक्रारी

जळगाव - २९

अमळनेर- ३६

भुसावळ - २५

यावल - २१

रावेर - ३१

मुक्ताईनगर- २७

चोपडा- ३३

जामनेर- ३६

चाळीसगाव -४१

पाचोरा- ३१

भडगाव- १९

पारोळा- २६

एरंडोल- २६

धरणगाव-१४

बोदवड- ०९